शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले

By वसंत भोसले | Updated: November 17, 2017 00:48 IST

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी आहे. गेल्या दोन वर्षांत सांगली जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्हे, घडामोडी आणि त्यावर पोलिसांनी केलेली कारवाई सर्वच वादग्रस्त आहे. शिवाय या सर्व प्रकरणात वरिष्ठांकडून दिलेल्या आदेशांकडे काहीवेळा दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे स्पष्ट दिसत आहे.पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या खात्यामध्ये अशी बेदिलीचे वातावरण असणे धोकादायक आहे. महसूल, पाटबंधारे किंवा सार्वजनिक बांधकाम, शिक्षण आदी खात्यांमधील प्रशासनात या गोष्टी पूर्वी व्हायच्या. वरिष्ठ अधिकाºयांचा वचक संपल्याने हा गोंधळ वाढला. याचे कारण वरिष्ठ अधिकाºयांचे प्रशासनातील अधिकारच राज्य शासनाने स्वत:कडे घेतले. त्यामुळे बदल्यांचा मोठा व्यवहार होऊन बसला. कोणत्या जागेवर, पदावर कोण अधिकारी कसा आला आहे. त्याला कुणाचा वरदहस्त आणि आश्रय आहे याची उघड चर्चा सुरू झाली. असे अधिकारी आपल्या नजीकच्या वरिष्ठ अधिकाºयास जुमानतच नाहीत. पाटबंधारे किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यातही याची मोठी शिस्त पूर्वी होती. त्यामुळे दर्जेदार काम करणाºया हुशार, चाणाक्ष आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाºयांच्या कामाचे चीज होत असे. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.त्याची लागण पोलीस दलासही झाली आहे. सांगलीच्या प्रकरणाच्या मूळ समस्येकडे गेले तर तेथील पोलीस दलाचे प्रशासन संपलेले आहे, हेच जाणवते. अधीक्षक दत्तात्रय शिंदे किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यास कारणीभूत नाहीत. त्यांनी त्या परिस्थितीत काम कसे करायचे, याचा स्वत:पुरता निर्णय घेतला आहे. त्यातून संपूर्ण व्यवस्था होरपळून निघते आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयास अमूकतमूक नेत्याने (आमदार-खासदार) आणले आहे. त्यासाठी तोडपाणी झाली आहे. परिणामी त्यांनी कसेही वागले तरी काही होणार नाही, अशी चर्चा सर्वसामान्य माणसांमध्ये होत आहे. ती फारच गंभीर आहे. पोलीस दलातील पैशांच्या व्यवहाराची चर्चा तर आता गुपित राहिलेली नाही. एखाद्या अधिका-याने चूक केली तरी त्यास सांभाळून घेतले जाते, असे दिसताच लोकांमध्ये वाईट चर्चा सुरू होते. अनेक पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांच्यात उघडउघड पैशाच्या देवाण-घेवाणीविषयी चर्चा होते. वरिष्ठ अधिकाºयांच्या या व्यवहारांची चर्चा त्यांच्या कार्यालयात सर्वात कनिष्ठ कर्मचाºयांपर्यंत तपशीलवार होते. तेव्हा त्या खात्यातील नैतिकता काय राहत असेल?सांगलीतील काही पोलीस, पोलीस निरीक्षक यांच्या पातळीवर चुका झाल्या आहेत, त्या याच वातावरणाचा परिपाक आहे. हे एक उदाहरण झाले. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या अहवालातही याचेच प्रतिबिंब उमटलेले आहे. त्यावरून कुणावर कारवाई होईल किंवा होणार नाही. मात्र, पोलीस दलाची प्रशासकीय शिस्त, व्यवहार, नैतिकता आणि कामातील जबाबदारीचे गांभीर्य संपले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायला हवी. 

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगलीPoliceपोलिस