शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले

By वसंत भोसले | Updated: November 17, 2017 00:48 IST

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी आहे. गेल्या दोन वर्षांत सांगली जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्हे, घडामोडी आणि त्यावर पोलिसांनी केलेली कारवाई सर्वच वादग्रस्त आहे. शिवाय या सर्व प्रकरणात वरिष्ठांकडून दिलेल्या आदेशांकडे काहीवेळा दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे स्पष्ट दिसत आहे.पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या खात्यामध्ये अशी बेदिलीचे वातावरण असणे धोकादायक आहे. महसूल, पाटबंधारे किंवा सार्वजनिक बांधकाम, शिक्षण आदी खात्यांमधील प्रशासनात या गोष्टी पूर्वी व्हायच्या. वरिष्ठ अधिकाºयांचा वचक संपल्याने हा गोंधळ वाढला. याचे कारण वरिष्ठ अधिकाºयांचे प्रशासनातील अधिकारच राज्य शासनाने स्वत:कडे घेतले. त्यामुळे बदल्यांचा मोठा व्यवहार होऊन बसला. कोणत्या जागेवर, पदावर कोण अधिकारी कसा आला आहे. त्याला कुणाचा वरदहस्त आणि आश्रय आहे याची उघड चर्चा सुरू झाली. असे अधिकारी आपल्या नजीकच्या वरिष्ठ अधिकाºयास जुमानतच नाहीत. पाटबंधारे किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यातही याची मोठी शिस्त पूर्वी होती. त्यामुळे दर्जेदार काम करणाºया हुशार, चाणाक्ष आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाºयांच्या कामाचे चीज होत असे. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.त्याची लागण पोलीस दलासही झाली आहे. सांगलीच्या प्रकरणाच्या मूळ समस्येकडे गेले तर तेथील पोलीस दलाचे प्रशासन संपलेले आहे, हेच जाणवते. अधीक्षक दत्तात्रय शिंदे किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यास कारणीभूत नाहीत. त्यांनी त्या परिस्थितीत काम कसे करायचे, याचा स्वत:पुरता निर्णय घेतला आहे. त्यातून संपूर्ण व्यवस्था होरपळून निघते आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयास अमूकतमूक नेत्याने (आमदार-खासदार) आणले आहे. त्यासाठी तोडपाणी झाली आहे. परिणामी त्यांनी कसेही वागले तरी काही होणार नाही, अशी चर्चा सर्वसामान्य माणसांमध्ये होत आहे. ती फारच गंभीर आहे. पोलीस दलातील पैशांच्या व्यवहाराची चर्चा तर आता गुपित राहिलेली नाही. एखाद्या अधिका-याने चूक केली तरी त्यास सांभाळून घेतले जाते, असे दिसताच लोकांमध्ये वाईट चर्चा सुरू होते. अनेक पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांच्यात उघडउघड पैशाच्या देवाण-घेवाणीविषयी चर्चा होते. वरिष्ठ अधिकाºयांच्या या व्यवहारांची चर्चा त्यांच्या कार्यालयात सर्वात कनिष्ठ कर्मचाºयांपर्यंत तपशीलवार होते. तेव्हा त्या खात्यातील नैतिकता काय राहत असेल?सांगलीतील काही पोलीस, पोलीस निरीक्षक यांच्या पातळीवर चुका झाल्या आहेत, त्या याच वातावरणाचा परिपाक आहे. हे एक उदाहरण झाले. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या अहवालातही याचेच प्रतिबिंब उमटलेले आहे. त्यावरून कुणावर कारवाई होईल किंवा होणार नाही. मात्र, पोलीस दलाची प्रशासकीय शिस्त, व्यवहार, नैतिकता आणि कामातील जबाबदारीचे गांभीर्य संपले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायला हवी. 

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगलीPoliceपोलिस