शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी; ...मराठवाड्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे !

By सुधीर महाजन | Updated: September 7, 2019 13:12 IST

ऑरिकच्या निमित्ताने मराठवाड्याच्या विकासाचा दरवाजा तुम्ही उघडा.

ठळक मुद्देऔरंगाबाद हे जागतिक पर्यटन नकाशावरचे महत्त्वाचे ठिकाण.औरंगाबादची विमानसेवा विस्कळीत झाली. अजिंठा लेणीकडे जाणारा १०० कि.मी. रस्ता वर्षभरापासून खोदून ठेवला आहेगेल्या पाच वर्षांपासून इथला शेतकरी दुष्काळाशी झुंजत आहे.

मा. पंतप्रधाननरेंद्रजी मोदी,स.न.  

संतांच्या भूमीत आपले स्वागत. तुम्हाला पत्र लिहावे की नाही, असा प्रश्न पडला; पण तुमच्याशी संवाद साधण्याचा हाच एक सोपा मार्ग आहे. संतांच्या भूमीत तुम्ही आलात. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरोबा, बहिणाबाई शिऊरकर अशी संतांची मांदियाळी या भूमीतली. मराठवाडा मागास आहे; पण या संतांनी एकतेचा संदेश देत आध्यात्मिक वाट दाखवली, ती भौतिक प्रगतीच्या पलीकडची म्हणावी लागेल. मराठवाड्याच्या नावामागेच हे मागासलेपण शतकानुशतके चिकटले आहे; पण ते अजून तरी हटत नाही. आता ज्या ‘ऑरिक’ सेंटरचे तुम्ही उद्घाटन करणार आहात त्याद्वारे प्रगतीचा अश्व घोडदौड घेईल, अशी अपेक्षा आहे. शिवरायांनी पुण्यात सोन्याचा नांगर चालवला आणि पुण्याचे भाग्य उजळले. आता या ऑरिकचे दरवाजे तुम्हीच उघडता आहात. लॅटिनभाषेत ऑरिक म्हणजे सुवर्ण. यानिमित्ताने मराठवाड्याच्या विकासाचा दरवाजा तुम्ही उघडा. नऊ वर्षांपूर्वी  डीएमआयसी प्रकल्प आला; पण उद्योग आले नाहीत. अँकर प्रोजेक्ट नाही. म्हणजे गुंतवणूक नाही. उद्योगासाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध असणारे हे देशातील एकमेव औद्योगिक क्षेत्र; पण येथे एकही उद्योग येत नाही हे वास्तव आहे.

या कॉरिडॉरची तुलना गुजरातच्या ढोलेरो उद्योग क्षेत्राशी केली जाईल, अशी चर्चा होती आणि आमचीही तीच अपेक्षा आहे. ज्या वेगाने या उद्योग क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. १० हजार एकर जमीन घेतली; पण त्यांचा आराखडा नाही. आपण आल्यामुळे या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. औरंगाबाद हे जागतिक पर्यटन नकाशावरचे महत्त्वाचे ठिकाण. वेरूळ, अजिंठा ही दोन जागतिक वारसा असलेली ठिकाणे येथीलच. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा येथे कायमचा ओघ होता; पण गेल्या वर्षापासून तो आटला आहे. औरंगाबादची विमानसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या रोडावली. शिवाय अजिंठा लेणीकडे जाणारा १०० कि.मी. रस्ता वर्षभरापासून खोदून ठेवला. ते काम ठप्प आहे. यामुळे पर्यटनावर आधारित व्यापार ठप्प झाला. विमानसेवेमुळे उद्योगावरही परिणाम झाला. आता यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे वाटते. मराठवाडा आणि दुष्काळ हे आता एक समीकरण बनले आहे. गेल्या पाच वर्षांपासून इथला शेतकरी दुष्काळाशी झुंजत आहे. आत्महत्या थांबत नाहीत. या वर्षभरात तर आतापर्यंत ५३४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. रोजची आत्महत्या हे विदारक सत्य आहे. हे चित्र कसे बदलता येईल, हे तुम्हीच सांगू शकता. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणीही मिळत नाही. सिंचन नाही. कृष्णेचे पाणी देणार, दमणगंगेचे देणार, फक्त घोषणा होतात; पण केवळ घोषणांनी आमची तहान भागत नाही याचा विचार तुम्हीच करू शकता. कारण तुम्ही नर्मदेचे पाणी थेट कच्छमध्ये नेले आहे. रस्ते हा खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग. तेथेही आमचे नशीब खडतर. 

एक सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग सोडला तर बाकी सारा आनंदच आहे. निधी आणि रस्ते याच्या घोषणा झाल्या. अर्थसंकल्पात तरतुदी दिसतात; पण रस्ते दिसत नाहीत. सोलापूर-धुळे हा महामार्गसुद्धा अजून औरंगाबादच्या पुढे सरकला नाही. शिक्षणाचा विचार केला तर दोन विद्यापीठे, एक कृषी विद्यापीठ, एक विधि विद्यापीठ, अशी परिस्थिती आहे; परंतु आयआयटी, आयआयएमसारखी एकही संस्था नाही. आमचे आयआयएम नागपूरला गेले. त्या बदल्यात येणारी वास्तुशिल्पी संस्था अजूनही प्रतीक्षेत आहे. रेल्वेमार्गाचे आधुनिकीकरण नाही. घोषणा केलेली अहमदनगर-बीड रेल्वे अजून धावली नाही. असे एक ना अनेक प्रश्न आहेत. काही सुटले तर विकासाच्या प्रक्रियेला गती मिळू शकते. तुम्ही थोडे लक्ष घाला, एवढीच माफक अपेक्षा आहे.

- सुधीर महाजन, संपादक, औरंगाबाद 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादprime ministerपंतप्रधानAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी