शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी; ...मराठवाड्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे !

By सुधीर महाजन | Updated: September 7, 2019 13:12 IST

ऑरिकच्या निमित्ताने मराठवाड्याच्या विकासाचा दरवाजा तुम्ही उघडा.

ठळक मुद्देऔरंगाबाद हे जागतिक पर्यटन नकाशावरचे महत्त्वाचे ठिकाण.औरंगाबादची विमानसेवा विस्कळीत झाली. अजिंठा लेणीकडे जाणारा १०० कि.मी. रस्ता वर्षभरापासून खोदून ठेवला आहेगेल्या पाच वर्षांपासून इथला शेतकरी दुष्काळाशी झुंजत आहे.

मा. पंतप्रधाननरेंद्रजी मोदी,स.न.  

संतांच्या भूमीत आपले स्वागत. तुम्हाला पत्र लिहावे की नाही, असा प्रश्न पडला; पण तुमच्याशी संवाद साधण्याचा हाच एक सोपा मार्ग आहे. संतांच्या भूमीत तुम्ही आलात. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरोबा, बहिणाबाई शिऊरकर अशी संतांची मांदियाळी या भूमीतली. मराठवाडा मागास आहे; पण या संतांनी एकतेचा संदेश देत आध्यात्मिक वाट दाखवली, ती भौतिक प्रगतीच्या पलीकडची म्हणावी लागेल. मराठवाड्याच्या नावामागेच हे मागासलेपण शतकानुशतके चिकटले आहे; पण ते अजून तरी हटत नाही. आता ज्या ‘ऑरिक’ सेंटरचे तुम्ही उद्घाटन करणार आहात त्याद्वारे प्रगतीचा अश्व घोडदौड घेईल, अशी अपेक्षा आहे. शिवरायांनी पुण्यात सोन्याचा नांगर चालवला आणि पुण्याचे भाग्य उजळले. आता या ऑरिकचे दरवाजे तुम्हीच उघडता आहात. लॅटिनभाषेत ऑरिक म्हणजे सुवर्ण. यानिमित्ताने मराठवाड्याच्या विकासाचा दरवाजा तुम्ही उघडा. नऊ वर्षांपूर्वी  डीएमआयसी प्रकल्प आला; पण उद्योग आले नाहीत. अँकर प्रोजेक्ट नाही. म्हणजे गुंतवणूक नाही. उद्योगासाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध असणारे हे देशातील एकमेव औद्योगिक क्षेत्र; पण येथे एकही उद्योग येत नाही हे वास्तव आहे.

या कॉरिडॉरची तुलना गुजरातच्या ढोलेरो उद्योग क्षेत्राशी केली जाईल, अशी चर्चा होती आणि आमचीही तीच अपेक्षा आहे. ज्या वेगाने या उद्योग क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. १० हजार एकर जमीन घेतली; पण त्यांचा आराखडा नाही. आपण आल्यामुळे या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. औरंगाबाद हे जागतिक पर्यटन नकाशावरचे महत्त्वाचे ठिकाण. वेरूळ, अजिंठा ही दोन जागतिक वारसा असलेली ठिकाणे येथीलच. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा येथे कायमचा ओघ होता; पण गेल्या वर्षापासून तो आटला आहे. औरंगाबादची विमानसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या रोडावली. शिवाय अजिंठा लेणीकडे जाणारा १०० कि.मी. रस्ता वर्षभरापासून खोदून ठेवला. ते काम ठप्प आहे. यामुळे पर्यटनावर आधारित व्यापार ठप्प झाला. विमानसेवेमुळे उद्योगावरही परिणाम झाला. आता यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे वाटते. मराठवाडा आणि दुष्काळ हे आता एक समीकरण बनले आहे. गेल्या पाच वर्षांपासून इथला शेतकरी दुष्काळाशी झुंजत आहे. आत्महत्या थांबत नाहीत. या वर्षभरात तर आतापर्यंत ५३४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. रोजची आत्महत्या हे विदारक सत्य आहे. हे चित्र कसे बदलता येईल, हे तुम्हीच सांगू शकता. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणीही मिळत नाही. सिंचन नाही. कृष्णेचे पाणी देणार, दमणगंगेचे देणार, फक्त घोषणा होतात; पण केवळ घोषणांनी आमची तहान भागत नाही याचा विचार तुम्हीच करू शकता. कारण तुम्ही नर्मदेचे पाणी थेट कच्छमध्ये नेले आहे. रस्ते हा खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग. तेथेही आमचे नशीब खडतर. 

एक सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग सोडला तर बाकी सारा आनंदच आहे. निधी आणि रस्ते याच्या घोषणा झाल्या. अर्थसंकल्पात तरतुदी दिसतात; पण रस्ते दिसत नाहीत. सोलापूर-धुळे हा महामार्गसुद्धा अजून औरंगाबादच्या पुढे सरकला नाही. शिक्षणाचा विचार केला तर दोन विद्यापीठे, एक कृषी विद्यापीठ, एक विधि विद्यापीठ, अशी परिस्थिती आहे; परंतु आयआयटी, आयआयएमसारखी एकही संस्था नाही. आमचे आयआयएम नागपूरला गेले. त्या बदल्यात येणारी वास्तुशिल्पी संस्था अजूनही प्रतीक्षेत आहे. रेल्वेमार्गाचे आधुनिकीकरण नाही. घोषणा केलेली अहमदनगर-बीड रेल्वे अजून धावली नाही. असे एक ना अनेक प्रश्न आहेत. काही सुटले तर विकासाच्या प्रक्रियेला गती मिळू शकते. तुम्ही थोडे लक्ष घाला, एवढीच माफक अपेक्षा आहे.

- सुधीर महाजन, संपादक, औरंगाबाद 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादprime ministerपंतप्रधानAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी