शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

PM Narendra Modi Birthday: PM मोदींचे मन समर्पित, तन समर्पित आणि जीवनही समर्पित!: जगत प्रकाश नड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 09:15 IST

आपले पंतप्रधान जगातील असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी सर्वसामान्य जनतेशी केवळ राजकीय संबंध जोडले नाहीत, तर भावनिक बंधही निर्माण केले आहेत.

आपले पंतप्रधान जगातील असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी सर्वसामान्य जनतेशी केवळ राजकीय संबंध जोडले नाहीत, तर भावनिक बंधही निर्माण केले आहेत. म्हणूनच,  ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेले आहेत. ते केवळ पंतप्रधान नाहीत, तर जनहितासाठी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि लोकसहभागातून या प्रश्नांवर उपाययोजना करणारे समाजसुधारकदेखील आहेत. उघड्यावर शौचाच्या पद्धतीपासून मुक्ती, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, जल संरक्षण आणि नमामि गंगे अभियानांचे यश याचीच साक्ष देणारे आहे.  ते स्वतःला प्रधानमंत्री नाही, तर ‘प्रधान सेवक’ म्हणवतात. कायमच ते समाजाला पुढे जाण्यासाठी आणि उत्तम आचार-विचार आणि संस्कार अंगी बाणवण्यासाठी प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. राष्ट्रहितासाठी कितीही गुंतागुंतीचे काम असले, तरीही ते डगमगत नाहीत, उलटपक्षी, त्या उद्दिष्टप्राप्तीसाठी ते आपले सर्वस्व पणाला लावतात. त्यांचे संपूर्ण सार्वजनिक आयुष्य निष्कलंक आणि स्वच्छचरित्र आहे. 

त्यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे कलम ३७० संपले आणि  “एक देश, एक संविधान’ या संकल्पनेची स्थापना झाली. जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य घटक राज्य बनले. सर्जिकल आणि हवाई हल्ले यातून, नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला कठोर संदेश देत सांगितले की, भारत आता बदलला आहे. आपल्या सीमा आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता भारत कुठलेही पाऊल उचलू शकतो. श्रद्धेय लाल बहादूर शास्त्रीजी यांच्यानंतर,  मोदीजी एकमेव असे लोकनेते आहेत, ज्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, संपूर्ण देश एक होतो. मोदीजींनी देशाच्या विचारशक्तीचा दर्जा उंचावला आहे. राजकीय कार्यसंस्कृतीत चांगले बदल घडवून आणले आहेत. 

यापूर्वी, राजकारणाला जातीयवाद, घराणेशाही तसेच आश्वासन संस्कृतीसारख्या दुष्ट प्रवृत्तींनी जखडले होते, मोदीजींनी त्याजागी विकासवादाचे राजकारण प्रचलित केले आहे. रखडलेल्या योजना वेगाने पूर्ण करण्यासाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व निश्चित करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधानांनी “सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी” (Proactive Governance And Timely  Implementation) अर्थात ‘प्रगती’ची सुरुवात केली. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या बुधवारी पंतप्रधान ‘प्रगती’ची बैठक घेतात आणि निवडक योजनांचा आढावा घेतात. यामुळे योजनांना होणारा विलंब टळला असून, प्रकल्पाच्या खर्चात होणाऱ्या अवाजवी  वाढीला देखील लगाम लागला आहे. असामान्य वक्तृत्व शैली, जादुई व्यक्तिमत्त्व, इमानदार प्रतिमा, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, सुस्पष्ट दूरदृष्टी, शिस्तबद्ध जीवनशैली, साहसी वृत्ती, नेतृत्व कौशल्य, विनयशीलता आणि देशाच्या नागरिकांसाठी चांगल्या गोष्टी करण्याची ऊर्मी ही आपल्या पंतप्रधानांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील अनुकरणीय मूल्ये आहेत. 

लहानपणी त्यांच्यात जो दृढ निश्चय आणि शिस्त होती, तोच दृढ निश्चय आणि शिस्त त्यांच्यामध्ये आजही आहे. कोणताही निर्णय त्वरित घेण्याची त्यांची खासियत आहे, म्हणूनच ते केवळ योग्य निर्णय घेत नाहीत तर त्याची अंमलबजावणी ही सुनिश्चित करतात. मोदीजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि जीवनाचा प्रत्येक क्षण देशातील खेडे, गरीब, शेतकरी, दलित, पीडित, शोषित, वंचित, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठी समर्पित आहे.ते नियमित योगासने करतात.  कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या योगाभ्यासामध्ये कधीही व्यत्यय येत नाही. म्हणूनच ते या वयातही इतके सक्रिय आणि तंदुरुस्त आहेत. भारतीय जनता पार्टी नेहमीच मोदीजींचा वाढदिवस हा  ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करत आली आहे.  आजच्या दिवशीही आमचे कार्यकर्ते देशाच्या कानाकोपऱ्यात कोविड लसीकरण मोहिमेला चालना देत आहेत. जनतेप्रती पूर्णतः समर्पण, अंत्योदयच्या माध्यमातून सबका साथ, सबका विकास आणि राष्ट्र प्रथम – हे गेल्या २० वर्षांच्या  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभाराचे सूत्र आहे. मन समर्पित, तन समर्पित और यह जीवन समर्पित चाहता हूँ देश की धरती, तुझे कुछ और भी दूं! 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी