शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुक्तीसाठीचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:33 IST

कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की ते करून दाखविणारच, अशी त्यांची ख्याती आहे. आज कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यात भर टाकण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता चंग बांधला आहे तो शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा.

कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की ते करून दाखविणारच, अशी त्यांची ख्याती आहे. आज कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यात भर टाकण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता चंग बांधला आहे तो शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा. त्यादिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.कोल्हापुरी जगात भारी, असा एक वाक्प्रचार बोलीभाषेतून पुढे आला आहे. त्यामध्ये कोल्हापुरी किंवा कोल्हापूरकर असण्याचा एक स्व-अभिमान आहे. त्याचवेळी काहीतरी वेगळे, विधायक करण्याची प्रेरणाही आहे. त्यानुसार सर्वच पातळीवर वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला जातो. कोल्हापुरातील क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन सिटी मुव्हमेंट या संस्थेनेही असाच जगात भारी काहीतरी करून दाखविण्याचा विडा उचलला आहे.परवा रविवारच्या आठवडी बाजारात या संस्थेने २० हजार कापडी पिशव्या भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी आलेल्यांना मोफत वाटल्या. शहराला प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने नेणारे हे आणखी एक पाऊल होते. गेल्या नवरात्रोत्सवावेळी ऐतिहासिक भवानी मंडपात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठीसुद्धा अशीच एक मोहीम राबविण्यात आली होती. छत्रपती घराण्याच्या मोठ्या सूनबाई संयोगिताराजे यांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरातील फळे, फुले, नारळ, कापूर, उदबत्ती, आदी विक्री करणाºयांना एकत्र करून बैठक घेतली. प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्याच विक्रीसाठी ठेवाव्यात आणि पाच रुपये प्रती पिशवी या दराने त्या विकाव्यात असा निर्णय या बैठकीत करण्यात आला. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. भवानी मंडप प्लास्टिकमुक्त झाला. आता कोल्हापुरातील सर्व भाजीपाला बाजारपेठांत ही मोहीम क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन सिटी मुव्हमेंटमार्फत राबविण्यात येत आहे.आपल्याकडे एखादी मोहीम राबविण्याची संकल्पना पटली की, ती यशस्वी करणे अशक्य नाही. कारण मनुष्यबळ भरपूर आहे. तसेच देवाण-घेवाण मोठी असते. जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय अनेकांना रोजगार देऊन जाऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापनात प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंचा फार मोठा अडथळा आहे. ते प्लास्टिक नष्ट करण्याची सोपी पद्धत नाही. शिवाय ते ओल्या कचºयाबरोबर एकत्र आले तर ते वेगळे करणे कठीण असते. पुण्यात १४०० ते १६०० टन दररोज घनकचरा तयार होतो. सोलापुरात ६०० तर सांगली, कोल्हापुरात प्रत्येकी २०० टन घनकचरा प्रतिदिन तयार होतो.या घनकचºयाचे वर्गीकरण घरा-घरांपासून होत नाही. त्यातील प्लास्टिक हा सर्वात मोठा अडसर आहे. नागरिकांनीच प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार केला, तर घनकचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी प्लास्टिकमुक्तीसाठी उचललेले पाऊल फार महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व शहरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्याला नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनीही साथ दिली तर अशक्य काही नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी