शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

प्लास्टिकमुक्तीसाठीचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:33 IST

कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की ते करून दाखविणारच, अशी त्यांची ख्याती आहे. आज कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यात भर टाकण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता चंग बांधला आहे तो शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा.

कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की ते करून दाखविणारच, अशी त्यांची ख्याती आहे. आज कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यात भर टाकण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता चंग बांधला आहे तो शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा. त्यादिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.कोल्हापुरी जगात भारी, असा एक वाक्प्रचार बोलीभाषेतून पुढे आला आहे. त्यामध्ये कोल्हापुरी किंवा कोल्हापूरकर असण्याचा एक स्व-अभिमान आहे. त्याचवेळी काहीतरी वेगळे, विधायक करण्याची प्रेरणाही आहे. त्यानुसार सर्वच पातळीवर वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला जातो. कोल्हापुरातील क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन सिटी मुव्हमेंट या संस्थेनेही असाच जगात भारी काहीतरी करून दाखविण्याचा विडा उचलला आहे.परवा रविवारच्या आठवडी बाजारात या संस्थेने २० हजार कापडी पिशव्या भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी आलेल्यांना मोफत वाटल्या. शहराला प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने नेणारे हे आणखी एक पाऊल होते. गेल्या नवरात्रोत्सवावेळी ऐतिहासिक भवानी मंडपात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठीसुद्धा अशीच एक मोहीम राबविण्यात आली होती. छत्रपती घराण्याच्या मोठ्या सूनबाई संयोगिताराजे यांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरातील फळे, फुले, नारळ, कापूर, उदबत्ती, आदी विक्री करणाºयांना एकत्र करून बैठक घेतली. प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्याच विक्रीसाठी ठेवाव्यात आणि पाच रुपये प्रती पिशवी या दराने त्या विकाव्यात असा निर्णय या बैठकीत करण्यात आला. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. भवानी मंडप प्लास्टिकमुक्त झाला. आता कोल्हापुरातील सर्व भाजीपाला बाजारपेठांत ही मोहीम क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन सिटी मुव्हमेंटमार्फत राबविण्यात येत आहे.आपल्याकडे एखादी मोहीम राबविण्याची संकल्पना पटली की, ती यशस्वी करणे अशक्य नाही. कारण मनुष्यबळ भरपूर आहे. तसेच देवाण-घेवाण मोठी असते. जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय अनेकांना रोजगार देऊन जाऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापनात प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंचा फार मोठा अडथळा आहे. ते प्लास्टिक नष्ट करण्याची सोपी पद्धत नाही. शिवाय ते ओल्या कचºयाबरोबर एकत्र आले तर ते वेगळे करणे कठीण असते. पुण्यात १४०० ते १६०० टन दररोज घनकचरा तयार होतो. सोलापुरात ६०० तर सांगली, कोल्हापुरात प्रत्येकी २०० टन घनकचरा प्रतिदिन तयार होतो.या घनकचºयाचे वर्गीकरण घरा-घरांपासून होत नाही. त्यातील प्लास्टिक हा सर्वात मोठा अडसर आहे. नागरिकांनीच प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार केला, तर घनकचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी प्लास्टिकमुक्तीसाठी उचललेले पाऊल फार महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व शहरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्याला नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनीही साथ दिली तर अशक्य काही नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी