शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्लास्टिकबंदीची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 06:30 IST

प्लास्टिक हे पर्यावरणाला आणि एकूणच मानव जीवनाला हानीकारक आहे, यात दुमत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या सरसकट प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला विरोध असण्याचे कारण नाही

प्लास्टिक हे पर्यावरणाला आणि एकूणच मानव जीवनाला हानीकारक आहे, यात दुमत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या सरसकट प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला विरोध असण्याचे कारण नाही. एखादी चांगली गोष्ट व्हावी असे वाटणे आणि प्रत्यक्षात तसे घडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हे म्हणजे पाळण्याला बाशिंग बांधून पोराच्या सुखी संसाराचे स्वप्न पाहण्यासारखे आहे. स्वप्नरंजनच असते ते. यातून आनंदही मिळतो मात्र तो केवळ क्षणिक असतो. २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीमुळे मुंबईची दाणादाण उडाली. प्लास्टिक पिशव्यांच्या अती वापरामुळे हे घडल्याचे लक्षात आले आणि राज्य शासन जागे झाले. ३ मार्च २००६ मध्ये महाराष्ट्र शासन विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण अध्यादेश (२००६) अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे (उत्पादन व वापर) नियम २००६ अशी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमध्ये राज्याने प्लास्टिक पिशवी संदर्भातील केंद्राचे पूर्वीचे नियम तर घेतलेच पण पिशवीच्या जाडीची मर्यादा ५० मायक्रोनपेक्षा अधिक असणेही बंधनकारक केले. त्याशिवाय अनेक बंधने घातली गेली. सुरूवातीचे तीन-चार महिने प्रभाव दिसला. जवळपास ११ वर्षे उलटली. प्लास्टिकची ही पिशवी हद्दपार झाली नाहीच. उलट बाजारातील अधिकाधिक भाग या प्लास्टिकने आपल्या कवेत घेतला. कोणतीही घोषणा पूर्वतयारीशिवाय केली की त्याचा फज्जा उडतो हे अनुभवातूनही शिकण्यास आम्ही तयार नाही. बंदीनंतर दूध, तेल आणि पाणी आदीचे प्लास्टिकविरहित पॅकिंग कसे होणार? बंदीच्या काळात काचेच्या बाटल्यांचा वापर वाढला तर त्याच्या कचºयाचे विघटन कसे करणार? हे सध्यातरी कोणालाच सांगता येत नाही. शिवाय बंदीनंतर कागदाचा वापरही वाढेल. ओघानेच त्यासाठी जंगलतोडही वाढेल. म्हणजेच आजारापेक्षा औषध भयंकर असा हा प्रकार होऊन बसेल. आपले शेजारी राज्य कर्नाटकही या बंदीतून सध्या मार्ग काढत आहे. मार्च २०१६ मध्ये या राज्याने सरसकट प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. त्याच रात्री एका झटक्यात तेथील ७० हजार लोकांची नोकरी गेली. प्लास्टिक उत्पादन करणाºया कंपन्यांनी गेल्या वर्षभरापासून देणे असलेल्या तीन हजार कोटींमधील एक पैसाही बँकेला दिला नाही. हा कायदा टिकविण्यासाठी या राज्याला केंद्र आणि राष्टÑीय हरित लवादाशी दररोज झगडावे लागत आहे. योगायोग म्हणजे प्लास्टिबंदीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सरकारने याच राज्यात आपले पथक पाठविले आहे. या पथकाच्या नजरेस काय पडेल हे ठाऊक नाही. कारण डोळे असूनही ते बंद ठेवलेल्या माणसाला त्याच्या सोयीचेच दिसत असते. या पथकाचेही तसे होऊ नये म्हणजे मिळविले. आज भारतात ५५ हजारांच्या आसपास प्लास्टिक उत्पादक असून त्याद्वारे सुमारे ५० लाख लोकांना रोजगार मिळतो आहे. यातील ३० टक्के उत्पादक एकट्या महाराष्टÑात आहेत. या बंदीनंतर या उत्पादकांचे काय होणार? ते वेगळा मार्ग निवडतीलही. पण त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे काय? त्यांच्या कुटुंबाचे काय? आणि सर्वात महत्त्वाचे त्यांची उत्पादने वापरणाºया सर्वसामान्यांसमोर इतर पर्याय काय? या प्रश्नांचे उत्तर शोधणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. प्लास्टिकच्या सरसकट बंदीपेक्षा त्याच्या पुनर्वापरावर अधिक भर द्यायला हवा, असाही एक मतप्रवाह आहे. पण यातून मोठे प्रदूषण होते, हेदेखील नाकारून चालणार नाही. प्लास्टिक वापरावर नियंत्रणासाठी १९९९ पासून केंद्र आणि राज्य सरकारने तब्बल चार कायदे आणले, तरी प्लास्टिकच्या विळख्यातून आपली सुटका झाली नाही. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा पाचवा प्रयत्न होत आहे. पाहूया प्लास्टिकबंदीची ही पाचवी गुढी काय साधते?

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी