शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

झाडे जगवायची हमी

By गजानन दिवाण | Updated: August 20, 2018 23:35 IST

औरंगाबाद-पैठण रस्ता रुंदीकरणासाठी १३८ झाडे तोडली गेली. औरंगाबाद-अजिंठा रस्ता चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात आहे. यासाठी जवळपास दोन हजार झाडांवर कु-हाड चालणार आहे. या झाडांच्या बदल्यात नव्याने झाडे लावली गेली, एवढेच उत्तर दिले जाते. ती झाडे कुठे लावली हे मात्र सांगितले जात नाही. त्यातली किती जगली हे तर विचारण्याची सोयच नाही.

राज्यभरात जोरजोरात ढोल बडवीत यंदा १३ कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. यात मराठवाड्याच्या वाट्याला २ कोटी ९१ लाख ७४ हजार वृक्ष आले आहेत. २०१६ मध्येदेखील राज्य सरकारने मोठी मोहीम राबविली होती. राज्यात दोन कोटी रोपटी लावण्यात आली होती. त्यावेळी मराठवाड्यात ५४ लाख १९ हजार ४६५ रोपटी लावली गेली. यातील तब्बल ७४ टक्केरोपटी जगल्याचा दावा नंतर वन विभागाने केला. प्रत्यक्षात किती झाडे जगली हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. यंदाची किती झाडे जगली याचीही टक्केवारी थोड्याच दिवसांत दिली जाईल. त्यातील सत्यता तपासायची कोणी आणि कशी? कारण ही झाडे लावली कोठे, याची नेमकी ठिकाणेच दिली जात नाहीत. त्यामुळे सत्यता तपासायचा प्रश्नच येत नाही. सरकार सांगेल, तेच खरे.

या वृक्षलागवडीचे असेच काहीसे झाले आहे. पर्यावरणाचा -हास करण्यातील कळस म्हणजे एकीकडे कोट्यवधी झाडे लावण्याचा डांगोरा पिटायचा आणि त्याचवेळी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शे-सव्वाशे वयोमानाच्या झाडांवर कु-हाडही चालवायची. या निर्लज्जपणाचे सरकारला काहीच कसे वाटत नाही. सोलापूर-धुळे रा ष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात येडशी ते औरंगाबाददरम्यान तब्बल ११ हजार झाडांवर कु-हाड चालविली गेली. आता दुसऱ्या टप्प्यांत किमान सात हजार झाडे तोडली जाणार आहेत.

औरंगाबाद-पैठण रस्ता रुंदीकरणासाठी १३८ झाडे तोडली गेली. औरंगाबाद-अजिंठा रस्ता चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात आहे. यासाठी जवळपास दोन हजार झाडांवर कु-हाड चालणार आहे. या झाडांच्या बदल्यात नव्याने झाडे लावली गेली, एवढेच उत्तर दिले जाते. ती झाडे कुठे लावली हे मात्र सांगितले जात नाही. त्यातली किती जगली हे तर विचारण्याची सोयच नाही.

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही रस्ता रुंदीकरणाची कामे जोरात सुरू आहेत. तिथे कामाआड येणारी मोठी झाडे तोडली जात नाहीत, तर रुंदीकरणानंतर रस्त्याच्या बाजूलाच त्या झाडांचे पुनर्वसन केले जाते. या झाडांना या पावसाळ्यात नव्याने पालवी फुटली आहे. हा विचार आपल्या महाराष्ट्रात का होत नाही? प्रयोग माहीतच नाही, असेही म्हणता येणार नाही. कारण, औरंगाबादेत महानुभव आश्रम ते लिंक रोडदरम्यान वडांच्या २८ झाडांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे. मग इतर ठिकाणी तसा प्रयोग का केला गेला नाही?

एक झाड तोडून बदल्यात दुसरे झाड लावणे हा उपाय होऊ शकत नाही. एक वडाचे झाड पूर्णत: मोठे होण्यासाठी दोन-दोन पिढ्यांचा काळ लोटावा लागतो. शिवाय लावलेले झाड जगेलच याचीही शाश्वती नाही. मग हा नसता उद्योग कशासाठी? औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने १०० झाडे जगविणार असल्याचा बॉण्ड पेपर लिहून प्राचार्यांना दिला आहे. यासाठी येणारा जवळपास ३५ ते ४० हजारांचा खर्च हे कर्मचारी स्वत: करणार आहेत. लावलेल्या प्रत्येक झाडाची अशी हमी सरकार वा संबंधित अधिकारी देतील काय?

टॅग्स :Marathwadaमराठवाडाenvironmentवातावरणroad transportरस्ते वाहतूक