शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

झाडे जगवायची हमी

By गजानन दिवाण | Updated: August 20, 2018 23:35 IST

औरंगाबाद-पैठण रस्ता रुंदीकरणासाठी १३८ झाडे तोडली गेली. औरंगाबाद-अजिंठा रस्ता चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात आहे. यासाठी जवळपास दोन हजार झाडांवर कु-हाड चालणार आहे. या झाडांच्या बदल्यात नव्याने झाडे लावली गेली, एवढेच उत्तर दिले जाते. ती झाडे कुठे लावली हे मात्र सांगितले जात नाही. त्यातली किती जगली हे तर विचारण्याची सोयच नाही.

राज्यभरात जोरजोरात ढोल बडवीत यंदा १३ कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. यात मराठवाड्याच्या वाट्याला २ कोटी ९१ लाख ७४ हजार वृक्ष आले आहेत. २०१६ मध्येदेखील राज्य सरकारने मोठी मोहीम राबविली होती. राज्यात दोन कोटी रोपटी लावण्यात आली होती. त्यावेळी मराठवाड्यात ५४ लाख १९ हजार ४६५ रोपटी लावली गेली. यातील तब्बल ७४ टक्केरोपटी जगल्याचा दावा नंतर वन विभागाने केला. प्रत्यक्षात किती झाडे जगली हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. यंदाची किती झाडे जगली याचीही टक्केवारी थोड्याच दिवसांत दिली जाईल. त्यातील सत्यता तपासायची कोणी आणि कशी? कारण ही झाडे लावली कोठे, याची नेमकी ठिकाणेच दिली जात नाहीत. त्यामुळे सत्यता तपासायचा प्रश्नच येत नाही. सरकार सांगेल, तेच खरे.

या वृक्षलागवडीचे असेच काहीसे झाले आहे. पर्यावरणाचा -हास करण्यातील कळस म्हणजे एकीकडे कोट्यवधी झाडे लावण्याचा डांगोरा पिटायचा आणि त्याचवेळी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शे-सव्वाशे वयोमानाच्या झाडांवर कु-हाडही चालवायची. या निर्लज्जपणाचे सरकारला काहीच कसे वाटत नाही. सोलापूर-धुळे रा ष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात येडशी ते औरंगाबाददरम्यान तब्बल ११ हजार झाडांवर कु-हाड चालविली गेली. आता दुसऱ्या टप्प्यांत किमान सात हजार झाडे तोडली जाणार आहेत.

औरंगाबाद-पैठण रस्ता रुंदीकरणासाठी १३८ झाडे तोडली गेली. औरंगाबाद-अजिंठा रस्ता चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात आहे. यासाठी जवळपास दोन हजार झाडांवर कु-हाड चालणार आहे. या झाडांच्या बदल्यात नव्याने झाडे लावली गेली, एवढेच उत्तर दिले जाते. ती झाडे कुठे लावली हे मात्र सांगितले जात नाही. त्यातली किती जगली हे तर विचारण्याची सोयच नाही.

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही रस्ता रुंदीकरणाची कामे जोरात सुरू आहेत. तिथे कामाआड येणारी मोठी झाडे तोडली जात नाहीत, तर रुंदीकरणानंतर रस्त्याच्या बाजूलाच त्या झाडांचे पुनर्वसन केले जाते. या झाडांना या पावसाळ्यात नव्याने पालवी फुटली आहे. हा विचार आपल्या महाराष्ट्रात का होत नाही? प्रयोग माहीतच नाही, असेही म्हणता येणार नाही. कारण, औरंगाबादेत महानुभव आश्रम ते लिंक रोडदरम्यान वडांच्या २८ झाडांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे. मग इतर ठिकाणी तसा प्रयोग का केला गेला नाही?

एक झाड तोडून बदल्यात दुसरे झाड लावणे हा उपाय होऊ शकत नाही. एक वडाचे झाड पूर्णत: मोठे होण्यासाठी दोन-दोन पिढ्यांचा काळ लोटावा लागतो. शिवाय लावलेले झाड जगेलच याचीही शाश्वती नाही. मग हा नसता उद्योग कशासाठी? औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने १०० झाडे जगविणार असल्याचा बॉण्ड पेपर लिहून प्राचार्यांना दिला आहे. यासाठी येणारा जवळपास ३५ ते ४० हजारांचा खर्च हे कर्मचारी स्वत: करणार आहेत. लावलेल्या प्रत्येक झाडाची अशी हमी सरकार वा संबंधित अधिकारी देतील काय?

टॅग्स :Marathwadaमराठवाडाenvironmentवातावरणroad transportरस्ते वाहतूक