शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

योजना ‘स्मार्ट’च; पण नियोजनाचे खोबरे!

By किरण अग्रवाल | Updated: June 24, 2021 08:22 IST

smart city : मोदी सरकारने ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हाती घेतलेल्या स्मार्ट सिटी योजनेचेही दुर्दैवाने तसेच काहीसे झालेले दिसत आहे.

- किरण अग्रवाल

सरकारी योजनांच्या निर्धारणामागे हेतू कितीही चांगला असला तरी त्यांच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करता न आल्यास उद्दिष्टपूर्ती गाठणे अवघडच होऊन बसते. यातही योजनेच्या क्रियान्वयनाचा संबंध एकापेक्षा अधिक यंत्रणांशी अगर स्तरावर असतो, तेव्हा त्यात कालापव्यय होण्याबरोबरच मत-मतांतराला अधिक संधी मिळून जाणे स्वाभाविक ठरते; परिणामी योजना रखडते किंवा ती गुंडाळून ठेवणे भाग पडते. मोदी सरकारने ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हाती घेतलेल्या स्मार्ट सिटी योजनेचेही दुर्दैवाने तसेच काहीसे झालेले दिसत आहे.

व्यापार उद्योगासाठी असो, की नोकरी वा मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने; गावातून शहरात येणाऱ्यांचे लोंढे वाढत आहेत. यामुळे शहरे विस्तारत असली तरी वाढत्या नागरिकरणाचा ताण तेथील नागरी सुविधांवर येत आहे. महापालिका असलेली महानगरे असली तरी त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या लगतच्या गावांची अवस्था खेड्यासारखीच असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आढळून येते. अनेक शहरे तर आपला चेहराच हरवून बसल्यासारखी झाली आहेत, म्हणूनच देशातील १०० शहरांची कालसुसंगत प्रगती घडवून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना आणली. 

महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व सोलापूर या प्रमुख दहा शहरांची त्यात निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणवल्या गेलेल्या या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे, मात्र केंद्र, राज्य व स्थानिक यंत्रणेच्या त्रांगड्यामुळे अनेक ठिकाणी या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असल्याने कोणत्याही स्मार्ट सिटी प्रकल्पाची सर्वच्या सर्व म्हणजे शंभर टक्के कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणाल कुमार यांच्यासोबत राज्यातील सर्व संबंधित सीईओ यांची जी ऑनलाइन बैठक झाली, त्यातही हीच बाब पुढे आली.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत जागोजागी कामे खूप घेतली गेलीत; परंतु अपवादवगळता अनेक कामे रेंगाळली आहेत. मुळात या कामासाठी ठिकठिकाणी स्वतंत्र कंपनी नेमण्यात आली असून, त्या कंपनीचे सीईओ व स्थानिक पालिकांचे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात एकवाक्यता नसल्याने मोठी अडचण होत आहे. यातून सदर कंपनी बरखास्त करण्याची मागणी नाशिकच्या महापौरांनी केल्याचे बघावयास मिळाले. इतकेच नाही तर आता कोरोनामुळे महापालिकेचे आर्थिक स्त्रोत मंदावल्यामुळे स्मार्ट सिटी योजनेसाठी राखून ठेवलेला निधी पुन्हा महापालिकेकडे वर्ग करून घेण्याची मागणी केली जात आहे. 

नागपुरातही या कंपनीचे सीईओपद तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतल्यावरून प्रकरण कोर्टात गेल्याचे बघावयास मिळाले होते. इतर ठिकाणी कामातील अनियमितता, गैरव्यवहार व ठेकेदारावरील मेहेरनजर यामुळे वाद घडून आले आहेत. याबाबतीत नाशिकचेच एक उदाहरण बोलके ठरावे, तेथे अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा अवघ्या सुमारे एक किलोमीटरचा रस्ता स्मार्ट करण्यासाठी सुमारे सतरा कोटींचा खर्च केला गेला. तब्बल अडीच वर्ष या रस्त्याचे काम चालले; पण तरी अपेक्षेप्रमाणे तो स्मार्ट ठरलाच नाही. अशी इतर ठिकाणचीही उदाहरणे देता येतील की ज्यामुळे स्मार्ट सिटी योजनेची अधिकतर कामे वादग्रस्तच ठरली.

महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकार, राज्य व स्थानिक महापालिका अशा तिन्ही स्तरावर समन्वयातून या योजनेंतर्गत कामे अपेक्षित आहेत; परंतु त्यातच मोठ्या अडचणी आहेत. कंपनी विरुद्ध स्थानिक महापालिका असे तंटे त्यातून उभे राहिलेले दिसत आहेत. या योजनेत हरित विकास प्रकल्पांतर्गत नियोजनबद्ध शहर वसविण्याचेसुद्धा अपेक्षित आहे, परंतु त्यासाठी लागणारी जागा व त्या जागेस अनेक ठिकाणी होत असलेल्या विरोधामुळेही अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. 

परिणामी जुन्याच कामाचे नूतनीकरण करण्यावर भर दिला जात आहे व त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होऊनदेखील कामे रेंगाळल्यामुळे तक्रारी वाढून गेल्या आहेत. एकूणच स्मार्ट सिटीची योजना चांगली असली व आधुनिक काळाशी सुसंगत सोयी सुविधांयुक्त शहरांचा विकास घडविणारी असली तरी केवळ नियोजनातील गोंधळ व यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे या योजनेचे खोबरे होताना दिसत आहे, त्यामुळे ती लवकरच गुंडाळली गेली तर आश्चर्य वाटू नये.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी