शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

सौंदर्यवादी साहित्याचे ‘फडके युग’

By विजय दर्डा | Updated: August 3, 2018 02:54 IST

लघुनिबंधकार, कथाकार, कादंबरीकार, ना. सी. फडके यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कन्या गीतांजली जोशी ‘साहित्यगंगेच्या काठी’ हा कार्यक्रम पुण्यात ४ आॅगस्टला सादर करत आहेत. त्यानिमित्त...

-विजय बाविस्कर

लघुनिबंधकार, कथाकार, कादंबरीकार, ना. सी. फडके यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कन्या गीतांजली जोशी ‘साहित्यगंगेच्या काठी’ हा कार्यक्रम पुण्यात ४ आॅगस्टला सादर करत आहेत. त्यानिमित्त...लोकप्रिय कादंबरीकार, सौंदर्यवादी साहित्यिक, नारायण सीताराम ऊर्फआप्पासाहेब फडके यांचा जीवनपट विविधरंगी होता. तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे नामवंत प्राध्यापक असलेल्या फडके यांचा जीवनाकडे, कलेकडे व साहित्याकडे पाहण्याचा स्वत:चा असा खास दृष्टिकोन होता.सन १९०४ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी पुण्यात आलेल्या फडक्यांचे शिक्षण पुण्यात झाले अन् नोकरीनिमित्त ते कोल्हापूरमध्ये स्थिरावले. राजाराम महाविद्यालयात दोन तपे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. सन १९१२ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली; परंतु ती लिहिल्यावरही आपण साहित्यिक होणार आहोत अशी त्यांची भावना नव्हती. सन १९१६ मध्ये ‘अल्ला हो अकबर’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर आणि थोडीफार गाजल्यावरदेखील साहित्यिक होण्याची इच्छा त्यांच्या हृदयात उगम पावली नव्हती. पुढे ‘जादूगार’ आणि ‘दौलत’ या दोन कादंबऱ्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी ‘हरिभाऊ आपट्यांनंतर एक नवा कादंबरीकार महाराष्ट्राला मिळाला आहे,’ असं वाचक म्हणू लागले.‘ललित साहित्याची दौलत उधळणारे जादूगार’ अशा शब्दांत बेळगाव येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना शि.म. परांजपे यांनी त्यांचा गौरव केला. मग मात्र साहित्य क्षेत्रात अलौकिक कामगिरी करून दाखविण्याचं जीवितकार्य मानून त्यांनी साहित्यिक होण्याचं ध्येय ठेवलं. त्यानंतर १९७८ पर्यंत ते सतत लिहीतच राहिले. त्यातून ७४ कादंबºया, २७ लघुकथासंग्रह, ७ नाटके, २२ समीक्षणात्मक लेखसंग्रह आणि ८ चरित्रे असा प्रचंड पसारा उभा राहिला.मराठीतील पहिले कथाकार मानले गेलेल्या फडके यांनी लघुकथा आणि समीक्षेच्या क्षेत्रात विशिष्ट परिभाषा रूढ केली. त्यांनी केवळ विवेचन केले नाही, तर तंत्रवाद आणि कलेकरिता कला याबाबत निश्चित अशा भूमिका घेतल्या. आपल्या कथांना आकर्षक शीर्षक देणाºया फडके यांनी वाचकांसमोर उत्तम दर्जाचा आदर्श निर्माण केला. मराठी कादंबरीला त्यांनी बांधेसूद, आधुनिक व तंत्रशुद्ध रूप दिले. विशेषत: बोलीभाषेला जवळची सुटसुटीत, सोपी भाषा दिली. महाराष्टÑातील तत्कालीन महत्त्वाच्या घटना, चळवळी व विचारप्रणालीचा त्यांनी आपल्या कादंबरी लेखनासाठी उपयोग केला व स्वत:ला काळाच्या मागे पडू दिले नाही. लघुनिबंध या पाश्चात्त्यशैलीतले लेखन त्यांनी जाणीवपूर्वक मराठीत वाढवले. मराठी साहित्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यामागे होता.शैलीदार, श्रवणीय, निरुपमेय आनंद देणारा वक्ता म्हणूनही ना.सी. फडके यांनी लौकिक कमावला. त्यांचे अमोघ वक्तृत्व हे मैफलीचा आनंद देणारे होते. असे असले तरी वाङ्मयचौर्य तसेच लेखनातील काहीसे एकसुरीपणअशा टीका त्यांच्यावर होत गेल्या. त्यांचे प्रेमविषयक चिंतन उथळ व ठरावीक ठशाचे असले, तरी त्यांच्या लेखनशैलीची सहजताव रुचिर सौंदर्यदृष्टी यामुळे हे चित्रण वाचकांना आकर्षक वाटत असे. आपल्या लेखनातूनवसंत फुलविणारा युगप्रवर्तक साहित्यिकम्हणून वाचकांच्या मनात त्यांचे एक स्थान निर्माण झाले आणि मराठी साहित्यातीलएका कालखंडाची ‘फडके युग’ म्हणून नोंद घेतली गेली.

टॅग्स :Puneपुणे