शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

वेध - ग्रंथमंदिरातील सभ्यता खुंटीवर !

By admin | Updated: April 1, 2017 00:28 IST

नाशिकच्या साहित्यिक व सांस्कृतिक मिरासदारीचे अंगण असलेल्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक यंदा ज्या पद्धतीने लढली जाते आहे ते पाहता, ग्रंथप्रेमींनी चिंतित होणे अस्वाभाविक ठरू नये.

निवडणुकांचे राजकारण समाजमनाला असे काही व्यापून राहते की, त्याचा प्रभाव अगर परिणाम सहजासहजी सरत नाही. त्यामुळे निवडणूक म्हटली की, ती कोणतीही व कुणाचीही असो, त्यात राजकारण डोकावल्याखेरीज राहत नाही; साहित्य प्रांतही त्याला अपवाद ठरू नये. संपन्न व समृद्धतेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तसेच विमादी पटवर्र्धन, अ.वा. वर्टी, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर व प्रा. वसंत कानेटकरांसारख्या दिग्गजांनी नेतृत्व केलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या होत असलेल्या निवडणुकीकडेही याच संदर्भाने पाहता यावे.नाशिकच्या साहित्य सांस्कृतिकविश्वात मानाचा शिरपेच धारण करून असणाऱ्या व शतकोतरी अमृतमहोत्सवी वाटचालीचा टप्पा पार केलेल्या सार्वजनिक वाचनालयाची (सावाना) यंदाची निवडणूक खुद्द या संस्थेच्या सभासदांनाच नव्हे तर समस्त पुस्तकपे्रमींना व्यथित करणारी ठरली आहे, कारण राजकीय व सहकारी संस्थांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये जे जे काही होते ते ते सारे यात होताना दिसत आहे. विविध पॅनल्सच्या माध्यमातून म्हणायला साहित्य व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उमेदवारी करीत असल्या तरी प्रचारात राजकारणाप्रमाणे जाहीरपणे एकमेकांचे वाभाडे काढण्यापासून ते मंगल कार्यालयात भोजनावळी उठवण्यापर्यंत सारे सुरू आहे. सभासदसंख्या अवघी ३६००, पण चौकाचौकांतील प्रचाराची होर्डिंगबाजी व पत्रकबाजी अशी की एखाद्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भासावी. पातळी सोडून सुरू असलेला प्रचार, त्यात डोकावणारे जातीयवादाचे रंग यामुळे या निवडणुकीतील सभ्यताच खुंटीवर टांगली जाते आहे, पण साहित्य शारदेच्या मंदिरात जाऊ पाहणारे त्याचे भान राखताना दिसू नये हे दुर्दैवी आहे.मुळात ‘सावाना’तील राजकारणाचा चंचूप्रवेश दशकभरापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त होऊन गेला होता. संस्थेतील तत्कालीन धुरिणांनी एका राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपातून काही जणांना सोबत घेऊन निवडणूक लढली होती. तत्पूर्वी राजकारणात असलेल्या काही व्यक्ती या संस्थेत होत्या, नाही असे नाही. पण त्यांनी राजकारण संस्थेत आणले नव्हते. त्यामुळे निवडणुका झाल्या, परंतु त्यात पातळी सोडली गेली नव्हती. निवडणुका संपताच सारे एकदिलाने साहित्यसेवेत लागायचे. परिणामी वाद वैचारिक पातळीपर्यंत मर्यादित असायचा. गेल्या काही वर्षांत मात्र सत्तेच्या राजकारणातून वाद कोर्टापर्यंत गेलेत. माहिती अधिकाराचा वापर करून मिळविल्या गेलेल्या बाबींतून पदाधिकाऱ्यांची लक्तरे वेशीवर टांगण्याचे प्रयत्न झाले. हे सर्व होताना संस्थेच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेलाही गालबोट लागत असल्याची फिकीर बाळगली गेली नाही. खरे तर अतिशय देदीप्यमान वारसा लाभलेली ही संस्था अलीकडे कात टाकून उभी राहिलेली दिसत असतानाच सूडबुद्धीच्या राजकारणाने वेग घेतला. यातून या साहित्य मंदिराचे रूपांतर जणू आखाड्यात होत गेले, ज्यांचे प्रत्यंतर आज होत असलेल्या निवडणुकीत प्रकर्षाने येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, कारभारातील अनागोंदी पुढे आणण्याच्या सबबीखाली ‘सावाना’च्या प्रतिष्ठेची ऐशीतैशी करणारे घटक सत्ताधाऱ्यांचे हात हाती घेऊन निवडणुकीला सामोरे जाताना दिसत असल्याने सभासदांची उद्विग्नता वाढली आहे. तर पर्याय म्हणून पुढे आलेल्यातील काहींचा साहित्यविषयक आवाका संशोधनाचा भाग ठरावा, असा आहे. नगरपालिकेपासून वाचनालयापर्यंतच्या साऱ्या निवडणुकांत उमेदवारी करू पाहणारे काही ‘धरतीपकड’ व पुस्तकांशी फारसा संबंध न आलेल्यांमुळे निवडणूक गाजते आहे खरी, परंतु या निवडणूक प्रक्रियेला सुस्पष्ट आचारसंहिताही नसल्याने विविध आक्षेपांना व आरोप-प्रत्यारोपांना वाव मिळून जाणे स्वाभाविक ठरले आहे. त्यामुळे आता कसोटी सभासदांची आहे. अर्थात, ‘उडदा माजी काळे-गोरे, काय निवडावे बरे’ अशीच एकूण स्थिती असून, शहराचे साहित्यिक सांस्कृतिक वैभव मानली जाणारी संस्था ज्या वळणावर आणून उभी केली गेली ते वेदनादायीच आहे. - किरण अग्रवाल