शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

वेध - क्रिकेटमधील ‘पृथ्वी’चे प्रेमगीत

By admin | Updated: January 9, 2017 00:25 IST

गावसकर नावाचा सूर्य मावळत होता तेव्हा तेंडुलकर नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितिजावर उदयाला आला. तेच आवर्तन पृथ्वीच्या उदयातून जाणवू लागले आहे.

 मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी. मुंबईच्या स्टेडियमवर जाणाऱ्या पब्लिकचं पहिलं प्रेम क्रिकेटवर असतं. इथं हजेरी लावणाऱ्याला क्रिकेट अंतर्बाह्य समजतं. किंबहुना क्रिकेट हा बहुसंख्य मुंबईकरांचा बहिश्चर प्राण आहे. वैभवाचे दिवस हा मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या अभिमानाचा विषय. विजय मर्चंट ते अजित वाडेकर आणि सुनील गावसकर ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेकानेक दैवते या रसिकांनी मनोभावे पुजली. मन:पूत मिरविलीही. पण अगदी काल-परवा संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात भारत जिंकला. तरीही मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या मनाचा एक कंगोरा काजळला होता. फार वर्षांनी एक आक्रित घडलं होतं. अजिंक्य रहाणे जायबंदी झाल्यामुळे तो अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नव्हता. परिणामी मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात एकही मुंबईकर नव्हता.एक काळ होता, जेव्हा निदान अर्धा डझन मुंबईकर भारतीय संघात असायचे. पण या सामन्यात एकही मुंबईकर खेळाडू भारतीय संघात नव्हता. मुंबईचं क्रिकेट संपलं की काय, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. इथल्या क्रिकेटरसिकांची मान खिन्न भावनेनं गुडघ्यात खुपसली गेली. हे चित्र गेल्या गुरुवारी अचानक बदललं. राजकोटमध्ये तामिळनाडू विरुद्ध मुंबई या रणजी सामन्यात अवघ्या सतरा वर्षांच्या मुंबईकरानं पदार्पणातच आक्रमक शतक ठोकून मुंबईसाठी अंतिम सामन्याचा दरवाजा उघडून दिला. रणजी करंडकाच्या सामन्यात पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत तो जाऊन बसला. लहान चणीचा, कमी उंचीचा आणि निरागस भाव असलेला बालिश चेहऱ्याचा पृथ्वी शॉ एका रात्रीत क्रिकेटविश्वातील चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला वा अपघाताने गवसलेला हिरा नाही. सचिन आणि राहुल द्रविडला टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर बघता बघता क्रिकेटच्या, त्यातही बॅटिंगच्या प्रेमात पडलेल्या पृथ्वीची कहाणी जितकी संघर्षाची, तितकीच तळपत्या यशाची आहे. आशेचा किरण मनामनात जागविणारीही आहे. मुंबईतलं क्रिकेट पोसलं जातं, ते शालेय स्तरावर. हॅरीस आणि गाइल्स शील्डच्या आंतरशालेय स्पर्धांमधून. मुंबईतल्या क्रिकेटचं घट्ट नेटवर्क या स्पर्धांमधूनच तर विणलं जातं. सचिन, विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, प्रवीण अमरे अशा अनेकांसारखं पृथ्वीचं नाणंही बावनकशी सोन्याचं असल्याचं आधीच सिद्ध झालं होतं. तीन वर्षांपूर्वी हॅरिस शील्डच्या सामन्यात ५४६ धावांची विक्रमी खेळी करणारा पृथ्वी तेव्हा आकर्षण बिंदू बनला. त्याच्या पाठोपाठ कल्याणच्या प्रणव धनावडेनं हजार धावांची विश्वविक्रमी खेळी केली. शाळेत विक्रमी खेळी केलेल्या पृथ्वीला जेमतेम सतरा वर्षे पुरी होत असताना मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळालं. दिलीप वेंगसरकर आणि राहुल द्रविडच्या त्याच्याविषयीच्या मताचाही त्यात वाटा आहे.प्रश्न एकट्या पृथ्वीचा नाही. श्रीमंतीचं पाठबळ नसलेली मुंबई आणि मुंबईच्या जवळपास शंभर किलोमीटरच्या पट्ट्यातील गुणवत्ताही आपल्या लायकीनुसार मिळकत करू शकते, हे चांगलं लक्षण आहे. अगदी अलीकडे श्रीलंकेत झालेल्या १९ वर्षांखालील युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पृथ्वी भारतीय संघातून खेळला. आक्रमकतेची चुणूक दाखवून गेला. राजकोटमधल्या रणजी सामन्यात पदार्पणात शतक झळकावल्यानंतर मुंबईकर क्रिकेटरसिकांना जणू नवा सचिन सापडल्याचा आनंद झाला. तो तितका कसदार आहे की नाही, अपेक्षांचे ओझे तो चिमुकल्या खांद्यावर वाहू शकेल की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत. ती मिळायची तेव्हा मिळतीलच. पण त्याच्या आगमनाने आशेला नवी पालवी फुटली आहे. गावसकर नावाचा सूर्य मावळत होता तेव्हा तेंडुलकर नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितिजावर उदयाला आला. तेच आवर्तन पृथ्वीच्या उदयातून जाणवू लागले आहे. गुणवत्ता बावनकशी असली की तिला फार काळ झाकता येत नाही. मुंबईतल्या क्रिकेटमधल्या सोन्यासारख्या गुणवत्तेला इथल्या मातीचा सुगंध आहे. त्यातूनच मध्यंतरी निराश झालेली मुंबई नव्या उत्साहात पृथ्वीचे प्रेमगीत गुणगुणायला लागली आहे!- चंद्रशेखर कुलकर्णी