शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वेध - क्रिकेटमधील ‘पृथ्वी’चे प्रेमगीत

By admin | Updated: January 9, 2017 00:25 IST

गावसकर नावाचा सूर्य मावळत होता तेव्हा तेंडुलकर नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितिजावर उदयाला आला. तेच आवर्तन पृथ्वीच्या उदयातून जाणवू लागले आहे.

 मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी. मुंबईच्या स्टेडियमवर जाणाऱ्या पब्लिकचं पहिलं प्रेम क्रिकेटवर असतं. इथं हजेरी लावणाऱ्याला क्रिकेट अंतर्बाह्य समजतं. किंबहुना क्रिकेट हा बहुसंख्य मुंबईकरांचा बहिश्चर प्राण आहे. वैभवाचे दिवस हा मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या अभिमानाचा विषय. विजय मर्चंट ते अजित वाडेकर आणि सुनील गावसकर ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेकानेक दैवते या रसिकांनी मनोभावे पुजली. मन:पूत मिरविलीही. पण अगदी काल-परवा संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात भारत जिंकला. तरीही मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या मनाचा एक कंगोरा काजळला होता. फार वर्षांनी एक आक्रित घडलं होतं. अजिंक्य रहाणे जायबंदी झाल्यामुळे तो अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नव्हता. परिणामी मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात एकही मुंबईकर नव्हता.एक काळ होता, जेव्हा निदान अर्धा डझन मुंबईकर भारतीय संघात असायचे. पण या सामन्यात एकही मुंबईकर खेळाडू भारतीय संघात नव्हता. मुंबईचं क्रिकेट संपलं की काय, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. इथल्या क्रिकेटरसिकांची मान खिन्न भावनेनं गुडघ्यात खुपसली गेली. हे चित्र गेल्या गुरुवारी अचानक बदललं. राजकोटमध्ये तामिळनाडू विरुद्ध मुंबई या रणजी सामन्यात अवघ्या सतरा वर्षांच्या मुंबईकरानं पदार्पणातच आक्रमक शतक ठोकून मुंबईसाठी अंतिम सामन्याचा दरवाजा उघडून दिला. रणजी करंडकाच्या सामन्यात पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत तो जाऊन बसला. लहान चणीचा, कमी उंचीचा आणि निरागस भाव असलेला बालिश चेहऱ्याचा पृथ्वी शॉ एका रात्रीत क्रिकेटविश्वातील चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला वा अपघाताने गवसलेला हिरा नाही. सचिन आणि राहुल द्रविडला टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर बघता बघता क्रिकेटच्या, त्यातही बॅटिंगच्या प्रेमात पडलेल्या पृथ्वीची कहाणी जितकी संघर्षाची, तितकीच तळपत्या यशाची आहे. आशेचा किरण मनामनात जागविणारीही आहे. मुंबईतलं क्रिकेट पोसलं जातं, ते शालेय स्तरावर. हॅरीस आणि गाइल्स शील्डच्या आंतरशालेय स्पर्धांमधून. मुंबईतल्या क्रिकेटचं घट्ट नेटवर्क या स्पर्धांमधूनच तर विणलं जातं. सचिन, विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, प्रवीण अमरे अशा अनेकांसारखं पृथ्वीचं नाणंही बावनकशी सोन्याचं असल्याचं आधीच सिद्ध झालं होतं. तीन वर्षांपूर्वी हॅरिस शील्डच्या सामन्यात ५४६ धावांची विक्रमी खेळी करणारा पृथ्वी तेव्हा आकर्षण बिंदू बनला. त्याच्या पाठोपाठ कल्याणच्या प्रणव धनावडेनं हजार धावांची विश्वविक्रमी खेळी केली. शाळेत विक्रमी खेळी केलेल्या पृथ्वीला जेमतेम सतरा वर्षे पुरी होत असताना मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळालं. दिलीप वेंगसरकर आणि राहुल द्रविडच्या त्याच्याविषयीच्या मताचाही त्यात वाटा आहे.प्रश्न एकट्या पृथ्वीचा नाही. श्रीमंतीचं पाठबळ नसलेली मुंबई आणि मुंबईच्या जवळपास शंभर किलोमीटरच्या पट्ट्यातील गुणवत्ताही आपल्या लायकीनुसार मिळकत करू शकते, हे चांगलं लक्षण आहे. अगदी अलीकडे श्रीलंकेत झालेल्या १९ वर्षांखालील युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पृथ्वी भारतीय संघातून खेळला. आक्रमकतेची चुणूक दाखवून गेला. राजकोटमधल्या रणजी सामन्यात पदार्पणात शतक झळकावल्यानंतर मुंबईकर क्रिकेटरसिकांना जणू नवा सचिन सापडल्याचा आनंद झाला. तो तितका कसदार आहे की नाही, अपेक्षांचे ओझे तो चिमुकल्या खांद्यावर वाहू शकेल की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत. ती मिळायची तेव्हा मिळतीलच. पण त्याच्या आगमनाने आशेला नवी पालवी फुटली आहे. गावसकर नावाचा सूर्य मावळत होता तेव्हा तेंडुलकर नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितिजावर उदयाला आला. तेच आवर्तन पृथ्वीच्या उदयातून जाणवू लागले आहे. गुणवत्ता बावनकशी असली की तिला फार काळ झाकता येत नाही. मुंबईतल्या क्रिकेटमधल्या सोन्यासारख्या गुणवत्तेला इथल्या मातीचा सुगंध आहे. त्यातूनच मध्यंतरी निराश झालेली मुंबई नव्या उत्साहात पृथ्वीचे प्रेमगीत गुणगुणायला लागली आहे!- चंद्रशेखर कुलकर्णी