शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

वेध - देवस्थानांचा सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 01:06 IST

देवस्थानांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, अनेक देवस्थाने याबाबतचा हिशेब जनतेला द्यायला तयार नाहीत. साधा माहिती अधिकाराचा

देवस्थानांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, अनेक देवस्थाने याबाबतचा हिशेब जनतेला द्यायला तयार नाहीत. साधा माहिती अधिकाराचा कायदा आपण देवस्थानांना लागू करु शकलेलो नाही. देवस्थानांसाठीच्या कायद्यात आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या निवडीवरून सध्या वादंग सुरू आहे. समितीवर राजकीय व्यक्ती नकोत, अशी मागणी पुढे आली आहे. असाच वाद पांडुरंगाच्या चरणी पंढरीत आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या पदाधिकाऱ्याची निवड झाल्याने वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शिर्डीतही याच कारणावरून न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेनंतर राजकीय व्यक्तींचा भरणा असलेले विश्वस्त मंडळ एकदा शासनाला बरखास्त करावे लागले. त्यानंतर गतवर्षी नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात आले. अर्थात त्यातही राजकीय व्यक्ती आहेतच. पूर्वी या विश्वस्त मंडळात काँग्रेसचे वर्चस्व होते. आता भाजपच्या नेत्यांचा भरणा आहे एवढाच फरक झाला. तात्पर्य एकच, देवस्थाने ही देखील सत्ता गाजविण्याची ठिकाणे व राजकीय व्यक्तींचा अड्डा बनली आहेत. देवस्थानांच्या तिजोरीचे ‘मोल’ ओळखून या तिजोऱ्या आपल्या ताब्यात ठेवण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. देवाची मूर्ती पुजाऱ्यांच्या ताब्यात अन् तिजोरी विश्वस्तांच्या हातात आहे. काही ठिकाणी मूर्तीसमोर जे पैसे जमा होतात त्यावर पुजाऱ्यांचा अधिकार आहे. या पैशांची मोजदाददेखील होत नाही. भाविकांच्या हाती दर्शन बारी, टाळ, चिपळ्या अन् मृदुंग तेवढा उरलाय. धर्मादाय आयुक्त कार्यालयासह राज्य सरकारानेही याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिर्डीसारखे देवस्थान हे थेट राज्य शासनाच्या नियंत्रणात असल्याने व त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी हा शासकीय अधिकारी असल्याने सरकार तेथे निदान हस्तक्षेप करू शकते. इतर बहुतांश देवस्थानांमध्ये तर खूपच सावळा गोंधळ आहे. आम्हाला माहिती अधिकार कायदादेखील लागू नाही, अशी उत्तरे ही देवस्थाने देत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील मोहटा देवस्थानचे उदाहरण याबाबत खूपच बोलके आहेत. या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या प्रधान जिल्हा न्यायाधीश करतात. जिल्हा न्यायाधीश हे या देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. आर्थिक व्यवहारांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या असतात. त्यांच्याशिवाय तहसीलदार, गटविकास अधिकारी, स्थानिक दिवाणी न्यायाधीश, उपवनसंरक्षक असे चार अधिकारी हे पदसिद्ध विश्वस्त आहेत. देवस्थान विविध कारणांसाठी शासकीय अनुदान देखील घेते. असे असतानाही आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नाही, असे उत्तर हे देवस्थान नागरिकांना देते. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी थेट माहिती आयुक्तांकडे अपील केले. मात्र, तेथेही न्याय मिळाला नाही. राजकारण्यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या देवस्थानांच्या कामकाजाबाबत भ्रष्टाचाराचे आरोप होतात. पण, जेथे न्यायाधीश व शासकीय अधिकारी कार्यरत आहेत, त्याही देवस्थानांचा कारभार जनतेसाठी खुला नाही, हे यावरून दिसते.निदान राजकारण्यांबाबत तक्रारी व ओरड करता येते. मोहटा देवस्थानबाबत कुणी भाष्य केले की लगेच न्यायालयीन अवमानाचा प्रश्न उभा राहतो. याबाबत डिसेंबर २००२ साली विधान परिषदेत देखील चर्चा झाली. देवस्थानवर न्यायाधीश अध्यक्ष असल्याने त्यांच्या कामकाजाबाबत तक्रारी करता येत नाहीत व त्यांची चौकशी करताना धर्मादाय आयुक्त कार्यालयालाही मर्यादा येतात हे खुद्द विधान परिषदेने मान्य केले. या देवस्थानचा कायदा बदलण्याचे आश्वासन त्यावेळी तत्कालीन विधिमंत्र्यांनी दिले. पण, आजतागायत त्याची पूर्ती झालेली नाही. सध्याही या देवस्थानची धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी व न्यायालयीन लढे सुरु आहेत. त्यामुळे प्रश्न केवळ देवस्थानांवरील राजकीय नियुक्त्यांचाच नाही. देवस्थाने ही खऱ्या अर्थाने भाविकांच्या मालकीची राहतील, तेथील पैशांचा हिशेब जनतेला मिळेल, असा सर्वसमावेशक कायदा आवश्यक आहे. - सुधीर लंके