शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

वेध - आदिवासी विकासाचे भ्रामक प्रमाणपत्र!

By किरण अग्रवाल | Updated: September 15, 2017 23:35 IST

आदिवासी विकासात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे मत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने नोंदविले असले तरी, वस्तुस्थिती वेगळी आहे. हे कुपोषण व आदिवासी भागातील बाल व माता मृत्यूच्या वाढत्या प्रमाणावरून लक्षात येणारे आहे.

दुरून डोंगर साजरे, या म्हणीप्रमाणे दिल्लीत बसून महाराष्ट्राकडे बघितले तर काही जणांना काही बाबीत ‘अच्छे दिन’ साकारलेले दिसूही शकतात; पण प्रत्यक्षात ते खरे असेलच असे समजता येऊ नये, किंबहुना तसे नसतेच. राज्यात आदिवासी भागातील कुपोषण, मातामृत्यू व अन्य अनेक प्रश्न कायम असताना किंवा त्यासंबंधातील ओरड दूर होऊ शकलेली नसताना आदिवासी विकासात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे जे मत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने नोंदविले आहे, त्याबद्दल हुरळून जाता येऊ नये ते त्यामुळेच.राज्यातील आदिवासींच्या विकासाकरिता शासनातर्फे शक्य ते सारे प्रयत्न केले जात असले तरी, या वर्गाचे मागासलेपण अद्यापही दूर होऊ शकलेले नाही ही वास्तविकता आहे. दरवर्षी राज्याच्या बजेटमध्ये यासाठी तब्बल ८ ते ९ टक्के निधी राखीव ठेवला जातो. यातील बराचसा निधी अखर्चित राहतो हा भाग वेगळा, पण कोट्यवधीची कामे होऊनही विकास काही दिसत नाहीच आणि याला कारण म्हणजे विकासाची गंगा आदिवासी वाड्या-वस्तीपर्यंत पोहोचविण्यास शासकीय यंत्रणांना येणारे अपयश. साधा शिक्षणाचा विषय घ्या, नाशकात आदिवासी विकास आयुक्तालय असल्याने यासंदर्भातल्या बाबी वारंवार व प्रकर्षाने समोर येत असतात. आश्रमशाळा व वसतिगृहातील समस्यांप्रश्नी या आयुक्तालयावर दूरवरून अनवाणी चालत येणाºया विद्यार्थ्यांचे मोर्चे धडकले नाहीत किंवा कसली आंदोलने झाली नाहीत, असा कोणता महिना जात नाही. आदिवासी वसतिगृहातील भोजनाचे ठेकेदार बदलल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर भोजन मिळत नाही म्हणून अलीकडेच आंदोलन झाले. अनेक आश्रमशाळांच्या इमारतींचे प्रस्ताव २५-२५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शाळांमध्ये शिकतात. त्यांना दिले जाणारे रेनकोट्स पावसाळ्यानंतर, तर थंडीपासून बचावासाठीचे स्वेटर हिवाळा उलटून गेल्यावर हाती पडत असल्याच्या तक्रारीही कायम असून, या साहित्य खरेदीत कोट्यवधींचे घोटाळे झाल्याची तक्रार खुद्द राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडेच करण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र आदिवासी विकासात अग्रेसर असल्याचे प्रशस्तिपत्र या आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साई यांनी त्यांच्या नाशिक भेटीत दिले, हे विशेष.महत्त्वाचे म्हणजे, आदिवासी विकासाच्या कौतुकाचे बोेल एकीकडे ऐकावयास मिळत असताना त्याच दिवशी नाशिकच्या जिल्हा परिषदेत राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी आदी आदिवासी तालुक्यात माता मृत्यू, बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण अन्य ठिकाणच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगत यंत्रणेला धारेवर धरले. गरोदर मातांच्या अमृत आहार योजनेपासून ते विद्यार्थ्यांच्या सकस आहारापर्यंत अनेक योजना असताना त्या खºया गरजूंपर्यंत पोहचतात की नाही, असा प्रश्न करून भुसे यांनी अधिकाºयांना फटकारले. केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्याच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मागे याच म्हणजे आदिवासी विभागातील कंत्राटी नोकर भरतीत तब्बल ३०० कोटींचा भ्र्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता, ज्याची चौकशी अद्यापही सुरू आहे. तरी म्हणे, आपला महाराष्ट्र आदिवासी विकासात अग्रेसर !वनहक्क दाव्यांच्या बाबतीत २००५ पासून कायदा करण्यात आला आहे. या अनुषंगाने वहिवाटीतील जमिनी आपल्या नावे करण्यासाठी जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक आदिवासींनी त्यासंबंधीच्या पुराव्यांसह प्रस्ताव दिले आहेत, पण ९ ते १० वर्षे उलटली तरी त्यापैकी अवघ्या दहा टक्केच प्रकरणांचा निपटारा होऊ शकला आहे. अशा अनेक बाबींची उजळणी करता येणारी आहे, ज्यातून रखडलेला आदिवासी विकास अधोरेखित होणारा आहे. तेव्हा जो काही विकास होतो आहे तो इतरांच्या तुलनेत कदाचित अधिक असूही शकेल; पण म्हणून पाठ थोपटून घेता येऊ नये हे नक्की ! 

टॅग्स :Governmentसरकार