शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 09:55 IST

केवळ दिखावा करून प्रशासन सुधारणार काय ?

- राजू नायकमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जरी एकापाठोपाठ अशा तीन बैठका घेऊन आपण सक्रिय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यावर त्याचा बिलकुल परिणाम झालेला नाही. हा केवळ दिखावा आहे, तो करून प्रशासन सुधारणार काय, असा प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारला आहे. त्यामुळे पर्रीकरांची छापून येणारी छायाचित्रे जनमत बदलण्यास कारण ठरणार नाहीत, असाच एकूण माहौल आहे.पर्रीकरांनी गेल्या तीन दिवसांत सतत तीन बैठका घेतल्या. पहिली बैठक गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाबरोबर, दुसरी तीन महिने खोळंबलेली मंत्रिमंडळ बैठक व गुरुवारी भाजपाच्या गाभा समितीबरोबरची बैठक. भाजपा नेत्यांनाही ते सहा महिने भेटले नव्हते. निरीक्षक मानतात की पर्रीकरांची प्रकृती नाजूक असतानाही त्यांनी या बैठका घेण्याचा अट्टाहास केला, यामागे पक्षश्रेष्ठींचा तगादा असू शकतो. सध्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार चालविला आहे. त्यांच्याकडे एकूण 26 खाती आहेत. ते खात्यांचा ताबा सोडत नाहीत, उपमुख्यमंत्री नेमत नाहीत व स्वत: तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही द्यायला तयार नाहीत. या काळात त्यांच्याच मंत्र्यांनी प्रशासन कोसळल्याची व अधिकारी मुजोर बनून ते कोणाचेच ऐकत नसल्याची टीका केली आहे.काँग्रेस पक्षाने अधिक आक्रमक होऊन 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला' अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतर पर्रीकर यांचे छायाचित्र लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न झाला यात तथ्य आहे; परंतु छायाचित्रातील पर्रीकर अत्यंत मलूल, निष्प्रभ वाटतात. मंत्र्यांनी अपल्या बैठकीनंतर पर्रीकरांची वागणूक व प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा दिला असला तरी ते पर्रीकर हे नाहीत, असे लोक म्हणतात.

पर्रीकरांनी एकेकाळी कठोरपणे राज्यकारभार हाताळला. मंत्र्यांमध्ये शिस्त आणली, अर्थव्यवस्थेला दिशा दिली व राजकारणात नैतिकता निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल धाक निर्माण झाला होता.दुर्दैवाने ते आजारी असतानाच्या गेल्या सात महिन्यांच्या काळात राज्यकारभार संपूर्णत: ढेपाळला असून हे सरकार बरखास्त करणे चांगले, या निर्णयावर जनता पोहोचली आहे. 'लोकमत'ने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यातील जनमताचा कानोसा घेतला असता लोकांनी पर्रीकरांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे व संपूर्णत: बरे होऊनच मुख्यमंत्रिपदी परत यावे, असे सुचविले आहे. भाजपालाही राज्यकारभार कोसळला आहे व या परिस्थितीत भाजपाला लोकांचा प्रचंड रोष सहन करावा लागणार आहे, याचा अंदाज आलेला आहे. तरीही गोव्यात बदल होत नाही, याबद्दल सारेच आश्चर्य व्यक्त करतात.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा