शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 09:55 IST

केवळ दिखावा करून प्रशासन सुधारणार काय ?

- राजू नायकमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जरी एकापाठोपाठ अशा तीन बैठका घेऊन आपण सक्रिय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यावर त्याचा बिलकुल परिणाम झालेला नाही. हा केवळ दिखावा आहे, तो करून प्रशासन सुधारणार काय, असा प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारला आहे. त्यामुळे पर्रीकरांची छापून येणारी छायाचित्रे जनमत बदलण्यास कारण ठरणार नाहीत, असाच एकूण माहौल आहे.पर्रीकरांनी गेल्या तीन दिवसांत सतत तीन बैठका घेतल्या. पहिली बैठक गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाबरोबर, दुसरी तीन महिने खोळंबलेली मंत्रिमंडळ बैठक व गुरुवारी भाजपाच्या गाभा समितीबरोबरची बैठक. भाजपा नेत्यांनाही ते सहा महिने भेटले नव्हते. निरीक्षक मानतात की पर्रीकरांची प्रकृती नाजूक असतानाही त्यांनी या बैठका घेण्याचा अट्टाहास केला, यामागे पक्षश्रेष्ठींचा तगादा असू शकतो. सध्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार चालविला आहे. त्यांच्याकडे एकूण 26 खाती आहेत. ते खात्यांचा ताबा सोडत नाहीत, उपमुख्यमंत्री नेमत नाहीत व स्वत: तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही द्यायला तयार नाहीत. या काळात त्यांच्याच मंत्र्यांनी प्रशासन कोसळल्याची व अधिकारी मुजोर बनून ते कोणाचेच ऐकत नसल्याची टीका केली आहे.काँग्रेस पक्षाने अधिक आक्रमक होऊन 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला' अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतर पर्रीकर यांचे छायाचित्र लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न झाला यात तथ्य आहे; परंतु छायाचित्रातील पर्रीकर अत्यंत मलूल, निष्प्रभ वाटतात. मंत्र्यांनी अपल्या बैठकीनंतर पर्रीकरांची वागणूक व प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा दिला असला तरी ते पर्रीकर हे नाहीत, असे लोक म्हणतात.

पर्रीकरांनी एकेकाळी कठोरपणे राज्यकारभार हाताळला. मंत्र्यांमध्ये शिस्त आणली, अर्थव्यवस्थेला दिशा दिली व राजकारणात नैतिकता निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल धाक निर्माण झाला होता.दुर्दैवाने ते आजारी असतानाच्या गेल्या सात महिन्यांच्या काळात राज्यकारभार संपूर्णत: ढेपाळला असून हे सरकार बरखास्त करणे चांगले, या निर्णयावर जनता पोहोचली आहे. 'लोकमत'ने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यातील जनमताचा कानोसा घेतला असता लोकांनी पर्रीकरांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे व संपूर्णत: बरे होऊनच मुख्यमंत्रिपदी परत यावे, असे सुचविले आहे. भाजपालाही राज्यकारभार कोसळला आहे व या परिस्थितीत भाजपाला लोकांचा प्रचंड रोष सहन करावा लागणार आहे, याचा अंदाज आलेला आहे. तरीही गोव्यात बदल होत नाही, याबद्दल सारेच आश्चर्य व्यक्त करतात.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा