शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या राजकीय समीकरणात पवार-ठाकरेंचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:20 IST

मिलिंद कुलकर्णी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शनिवार, दि.१५ रोजी ...

मिलिंद कुलकर्णीमाजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शनिवार, दि.१५ रोजी खान्देश दौऱ्यावर येत आहेत. दोघे प्रथमच एकत्र खान्देशात येत असून स्वतंत्र कार्यक्रमदेखील त्यांनी स्वीकारले असल्याचे आतापर्यंत प्राप्त झालेल्या दौºयावरुन दिसून येत आहे.पवार यांचे बंधू पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या नावाने जळगावचे जैन इरिगेशन आणि भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठीत असलेल्या या पुरस्कारासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांची निवड करण्यात येते आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि पवार हे उपस्थित असतात, हा पायंडा आहे. तो यंदाही पाळला गेला. गेल्यावेळी पवार होते, परंतु, फडणवीस यांनी दांडी मारली होती.मुक्ताईनगरला शेतकरी मेळाव्यात हे दोन्ही नेते एकत्र असतील. शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद््घाटन त्यांच्याहस्ते होईल. दोन्ही कृषी क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम आहेत. पवार हे कृषीमंत्री होते. महाराष्टÑाचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात शेतीविषयक चांगले निर्णय झाले. शेतकºयांना आधुनिक शेतीसाठी तंत्र आणि मंत्र त्यांनीच दिला. शेतकºयांचा माल निर्यात व्हायला हवा, यासाठी ते आग्रही असतात.मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष असले तरी त्यांना राष्टÑवादीने पुरस्कृत केले होते. मात्र ते मूळ शिवसैनिक आहेत. अनेक वर्षे जिल्हाप्रमुख होते. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत ते सेनेचे उमेदवार असताना ठाकरे त्यांच्या प्रचारासाठी आले होते. यंदा युती असल्याने एकनाथराव खडसे यांच्या कन्येच्या विरोधात अपक्ष म्हणून ते उभे राहिले आणि निवडून आले. दोघांच्या दौºयामागे ही राजकीय पार्श्वभूमी आहे.पवार-ठाकरेंचे दोन स्वतंत्र कार्यक्रमदेखील आहेत. पवार हे चोपडा येथे तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सुतगिरणीचे चेअरमन हे माजी आमदार कैलास पाटील हे आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा पराभव करुन आमदार झालेले हेच ते कैलास पाटील. चोपड्यातील अरुणभाई गुजराथी आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात आघाडीवर असलेल्या पाटील यांनी काँग्रेस, भाजपची मदत घेत नगरपालिकेसह काही संस्था ताब्यात घेतल्या होत्या. हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे प्रा.चंद्रकांत सोनवणे हे निवडून येत आहेत. परंतु, सोनवणे आणि पाटील यांच्यात वितुष्ट आले. आणि यंदाच्या निवडणूक काळात कैलास पाटील आणि इंदिराताई पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली.या सुतगिरणीचे उद्घाटन उध्दव ठाकरे यांच्याहस्ते व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील असलेले पाटील हेच आता सेनेत नसल्याने मुख्यमंत्री असूनही ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. आणि पवार यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होत आहे. राजकारण याला म्हणतात. सेनेतील अंतर्गत राजकारणाची किनार या कार्यक्रमाला राहील, हे निश्चित.तिकडे नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री ठाकरे हे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘शिवबंधन’ बांधले. अक्कलकुवा-धडगावचे सेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांच्यामागे पाठबळ उभे केले. ठाकरे यांची सभादेखील झाली. पण थोड्या मतांनी पाडवी पराभूत झाले. पण शिवसेनेचे अस्तित्व यानिमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झाले. अलिकडे झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ७ जागा जिंकून किंगमेकर ठरलेल्या सेनेची दखल काँग्रेस आणि भाजपला घ्यावी लागली. रघुवंशी यांचे हे यश आहे, म्हणून ठाकरे यांच्या दौºयाला महत्त्व आहे.पवार हे चोपडा येथे साखर कारखान्याच्या उद्घाटनासाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी आले होते. धोंडूअप्पा पाटील यांनी चहार्डीत हा कारखाना उभा केला होता. शेतकºयाच्या कुटुंबाचा विस्तार आणि शेती ़क्षेत्राचा होणारा संकोच लक्षात घेऊन शेतकºयांच्या कुटुंबातील काही मुलांनी पूरक व्यवसाय, नोकरी याकडे वळायला हवे, असे आवाहन पवार यांनी केले होते. पवार हे द्रष्टे नेते आहेत, शेतीची बिकट अवस्था त्यांनी २५ वर्षांपूर्वी ओळखून शेतकºयांना जागे करायचा प्रयत्न केला. आज तर आणखी बिकट स्थिती आहे. कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालये आहेत, पण तीदेखील शेती आणि शेतकºयाला मार्गदर्शन करण्यात, या परिस्थितीतून बाहेर काढण्यात कमी पडत आहेत, हे वास्तव आहे.तीच अवस्था सहकार क्षेत्राची आहे. पवारांनीच उद्घाटन केलेल्या चोपडा साखर कारखान्याची अवस्था दयनीय आहे. मधुकर कारखानादेखील यंदा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. खडका, नगरदेवळा या सुतगिरण्या कधीच बंद पडल्या.शेती आणि सहकारासाठी हे दोन्ही नेते काय भूमिका घेतात, याकडे आता खान्देशचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव