शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पतंगरावजी, आगंतुक जाणं बरं नव्हं...

By राजा माने | Updated: March 12, 2018 00:19 IST

इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके (अर्थात एमके आमीर खानच्या पीकेचा डुप्लिकेट यमगरवाडीचा मनकवडे) आज दु:खी अंत:करणाने महागुरू नारद कोणती असाईनमेंट देणार याची प्रतीक्षा करीत होता. नेहमी व्हॉट्सअ‍ॅपवर आदेश देणाºया नारदांनी त्याला थेट व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगच केले...

इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके (अर्थात एमके आमीर खानच्या पीकेचा डुप्लिकेट यमगरवाडीचा मनकवडे) आज दु:खी अंत:करणाने महागुरू नारद कोणती असाईनमेंट देणार याची प्रतीक्षा करीत होता. नेहमी व्हॉट्सअ‍ॅपवर आदेश देणाºया नारदांनी त्याला थेट व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगच केले... महागुरू काही बोलण्याच्या आधीच यमके बोलू लागला... ‘गुरुदेव आज मी तुमची कुठलीच असाईनमेंट घेणार नाही. उलट आज माझंच तुम्हाला मागणं आहे... आमचा जीवाभावाचा माणूस आगंतुक स्वर्गलोकी निघून गेला आहे. त्यांनाच माझं पत्र पोहोच करा आणि आमच्या मनाची घालमेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा!’ नारदांनी क्षणात यमकेची भावना कुणाबद्दल आहे हे ओळखले. कुलपती स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांना पत्र पोहोच करून शिष्याची इच्छा पूर्ण करण्याचा शब्द दिला. यमकेनेही लगोलग आयपॅडवर विद्युत गतीने बोटे फिरवित आपल्या भावनांना वाट करून दिली... अन् आपले पत्र पूर्ण केले...आदरणीय प्रिय पतंगरावजी, प्रेमपूर्वक साष्टांग नमस्कार, काय लिहू साहेब? हे असं आगंतुक अन् माझ्यासारख्या लाखो स्नेह्यांना चटका लावून स्वर्गलोकी निघून जाणं बरं नव्हं... अहो, मिसरूडही फुटलं नव्हतं तेव्हा विद्यानगरी पुण्यात तुम्ही एका पत्र्याच्या दहा बाय दहाच्या खोलीलाच भारती विद्यापीठ या फलकानं सजवलं... सोनसळच्या मातीत गरिबीने दिलेल्या प्रत्येक चटक्याला तुम्ही समाजाचे दु:ख हलकं करणाºया दागिन्यात रूपांतरित करीत गेलात. यशवंतराव मोहिते-भाऊंचे बोट धरून उभ्या महाराष्टÑात एस.टी. महामंडळाची प्रतिष्ठा वाढवित गेला. लोकनेते वसंतदादांच्या विरोधी गोटात काम करूनही दादांवरचा लळा कधी कमी होऊ दिला नाही. लोकनेते राजारामबापूंवरचंही प्रेम जतन करण्यात कधी कमी पडला नाहीत. १९९५ साली विधानसभा निवडणुकीत तुम्ही पराभवाचं तोंड पाहिलं. पण पुन्हा फक्त मुसंडीच मारली नाही तर महाराष्टÑाच्या राजकारणात सदैव ‘भावी मुख्यमंत्री’ हे मानाचं बिरुद घेऊनच लोकसंग्रह विस्तारत गेलात. मला आठवतं १९९९ च्या निवडणूक प्रचारात भिलवडी परिसरात एका तरुणाने स्वत:च्या रक्ताने तुमचे नाव लिहून तुम्हाला विजयाची खात्री दिली होती. त्यावेळी अश्रूंनी भरलेले तुमचे डोळे आजही आमच्या डोळ्यांसमोर येतात. अरे-तुरे बोलणे हा तर तुमचा स्वभावच! मंत्रालय असो वा मतदारसंघ, मंत्री असो वा अधिकारी अरे-तुरे बोलून ‘जय हो’ म्हणण्याची तुमची शैली आमचा ऊर भरून टाकायची. आलेला माणूस रिकाम्या हातानं जाणार नाही याची काळजी तुम्ही सदैव वाहत आलात. पडत्या काळात मदतीला येणाºया कुठल्याही माणसाचा तुम्हाला कधीच विसर पडत नसायचा. उलट माणूस लहान की मोठा हे न पाहता त्याच्या घरी जाऊन त्याने केलेल्या सहकार्याची तोंड भरून कृतज्ञता व्यक्त करणे ही तुमची खासियत. डोंगराच्या कपारीतून अनेक खाचखळगे पार करीत खळखळ वाहणाºया धबधब्यासारखा तुमचा स्वभाव . प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होताना प्रत्येक क्षणी निर्भेळ प्रेम, माणुसकी आणि सच्चेपणा जतन करणारा आपल्यातला माणूस भेटायचा. साहेब, तुमच्यातला तो माणूस आता आम्ही कुठे शोधायचा... पतंगरावजी असं आगंतुक निघून जाणं बरं नव्हं...- आपला,यमके (इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर) 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र