शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना लगाम

By admin | Updated: August 13, 2016 05:37 IST

भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळेच येथील रस्त्यांवर नियमांचे पालन करणाऱ्यांपेक्षा ते तोडणाऱ्यांचे प्रमाण किती तरी जास्त आहे. सिग्नल तोडून

भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळेच येथील रस्त्यांवर नियमांचे पालन करणाऱ्यांपेक्षा ते तोडणाऱ्यांचे प्रमाण किती तरी जास्त आहे. सिग्नल तोडून सुसाट वेगाने वाहन पळविणे हा जणू जन्मसिद्ध हक्कच समजला जातो. विशेष म्हणजे असे करीत असताना स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घातला जातो याचे भानही वाहनचालकांना राहात नाही. देशात दर वर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचे बळी जातात. बळी जाणाऱ्यांमध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. अगदी बारा-चौदा वर्षांची शाळकरी मुले सुद्धा रस्त्यांवर बेभान गाड्या चालविताना दिसतात. त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण नाही. खरे तर पालकांनी एवढ्या लहान वयात मुलांना गाडीची चावी देऊच नये. पण त्यांनाही याचे भान राहिलेले नाही. परिणामी गाडी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई करून त्यांना लगाम घालण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे आणि तो आवश्यकच आहे. यापुढे एखाद्या अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार ठरवून तीन वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या वाहनाची नोंदणीही कायमस्वरुपी रद्द केली जाणार आहे. रस्त्यांवरील सुरक्षितता वाढविण्यासोबतच अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने मोटार वाहन कायद्यात काही दुरुस्तींना केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजुरी दिली आहे. वाहतुकीला ‘वळण’ देण्याकरिता शासनाला हे कठोर पाऊल उचलावे लागले. पण एवढ्याने भागेल अथवा सार्वजनिक शिस्त पाळली जाईल असे नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेशी वाहतूक पोलीस यंत्रणा असावी लागणार आहे. जी सद्यस्थितीत राज्यात आणि देशातही नाही. याशिवाय शाळाशाळांमधून वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणेही तेवढेच गरजेचे आहे. राज्यात हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही हा निर्णय मागे घेण्यात आला असला तरी दुचाकीवर हेल्मेट सक्तीसाठी प्रभावी उपाययोजना सरकारने केली पाहिजे. एकंदरीतच वाहतूक नियमांबाबत कुणीही फारसे गंभीर असल्याचे जाणवत नाही. काही दिवस हवा असते आणि नंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते. हेल्मेट सक्तीच्या बाबतीत हा अनुभव सर्वांनीच घेतला आहे. सार्वजनिक शिस्त लावण्यासाठी सातत्य असावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी लागेल. प्रत्येक व्यक्तीने रस्त्यावरून जाताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांना निश्चितच आळा बसेल आणि लाखोंचे जीव वाचतील.