शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पाडळसरेचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:50 IST

अमळनेरच नाही तर परिसराला संजिवनी देणारा आणि तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाच्या नावाने अनेक वर्षापासून केवळ राजकारण केले जात आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा आणि त्यासाठी काही हालचाल तरी व्हावी, यासाठी आता गुरुवार ५ एप्रिल रोजी जल आंदोलन समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे.

अमळनेरच नाही तर परिसराला संजिवनी देणारा आणि तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाच्या नावाने अनेक वर्षापासून केवळ राजकारण केले जात आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा आणि त्यासाठी काही हालचाल तरी व्हावी, यासाठी आता गुरुवार ५ एप्रिल रोजी जल आंदोलन समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अमळनेर तालुक्यातील अनेक संघटना सहभागी होणार आहेत. सर्व संघटना आणि सामान्य जनताच या मोर्चात येणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता कुणी किती निधी आणला आणि आणला जाणार आहे, याचा हिशोब मांडायला सुरुवात झाली आहे. पाडळसरे धरणामुळे एकूण ५४९३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ५१९३६ हेक्टर तर धुळे जिल्ह्यातील ३०३५ हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. या प्रकल्पाचा अमळनेरसह चोपडा, धरणगाव, पारोळा, धुळे, शिंदखेडा या तालुक्यांंना लाभ होणार आहे. १९९७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेला हा प्रकल्प प्रत्यक्षात दोन वर्षानी म्हणजे १९९९ मध्ये सुरु झाला. तेव्हापासून या प्रकल्पाला निधीची कमतरता आणि राजकीय घरघर लागली ती अजूनही संपलेली नाही. धरणावरुन अमळनेरात विधानसभेच्या निवडणुका दरवेळी लढल्या गेल्या पण धरणाचे काम आहे तिथेच आहे. धरणाचा सन २०१३ पासून केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेचा प्रस्ताव दिल्ली दरबारी पडून आहे. मात्र गेल्या चार वर्षात कुठलीच हालचाल झाली नाही. राजकारण तेवढे तापत राहिले. जल आयोगाची मान्यता मिळाल्यास पाडळसरे धरणासाठी निधीचा मार्गही मोकळा होणार आहे. निधी मिळाल्यानंतर धरणाचे काम पूर्ण होण्यास कमीत कमी पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे. पण जोपर्यत जल आयोगाची मान्यता मिळणार नाही, तोपर्यत पंतप्रधान सिंचन योजनेत या प्रकल्पाचा समावेश होणार नाही. मध्यंतरी काही निधी आला तो वित्तीय कामासाठी आलेला आहे. दुसरीकडे प्रकल्पाच्या उपसा योजनांसाठी सव्वा सहाशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी आल्यानंतर प्रस्तावित आराखडा तयार करण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. धरणाच्या गेटची डिझाईनही बदलण्यात आली आहे. या गेटच्या संकल्प चित्रालासुद्धा मान्यता नाही. इतका हा प्रकल्प सध्या मागे पडला आहे. प्रकल्प मागे पडला असला तरी यावर राजकारण मात्र सुरु आहे. राजकीय नेते निधी आणल्याचा आव आणत धरण दोन वर्षात पूर्ण करु, अशी फुशारक्या मारीत आहेत. पण विरोधक त्यास अप्रत्यक्षपणे विरोध करीत आहेत. कारण पाडळसरे धरणाचे काम पूर्ण झाल्यास अमळनेरसाठी मग कुठलीही समस्या नसेल. त्यामुळे निवडणुकीसाठी कुठलाच मुद्दा नसेल. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांची इच्छाशक्ती आज तरी नाही कारण त्यांना पुढील वर्षी याच मुद्यावर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे आता जनतेनेच पुढाकार घेतला आहे. जनतेचा हा आवाज दिल्लीपर्यंत नक्कीच पोहचेल... अशी आशा करू या...

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर