शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पाडळसरेचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:50 IST

अमळनेरच नाही तर परिसराला संजिवनी देणारा आणि तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाच्या नावाने अनेक वर्षापासून केवळ राजकारण केले जात आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा आणि त्यासाठी काही हालचाल तरी व्हावी, यासाठी आता गुरुवार ५ एप्रिल रोजी जल आंदोलन समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे.

अमळनेरच नाही तर परिसराला संजिवनी देणारा आणि तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाच्या नावाने अनेक वर्षापासून केवळ राजकारण केले जात आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा आणि त्यासाठी काही हालचाल तरी व्हावी, यासाठी आता गुरुवार ५ एप्रिल रोजी जल आंदोलन समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अमळनेर तालुक्यातील अनेक संघटना सहभागी होणार आहेत. सर्व संघटना आणि सामान्य जनताच या मोर्चात येणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता कुणी किती निधी आणला आणि आणला जाणार आहे, याचा हिशोब मांडायला सुरुवात झाली आहे. पाडळसरे धरणामुळे एकूण ५४९३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ५१९३६ हेक्टर तर धुळे जिल्ह्यातील ३०३५ हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. या प्रकल्पाचा अमळनेरसह चोपडा, धरणगाव, पारोळा, धुळे, शिंदखेडा या तालुक्यांंना लाभ होणार आहे. १९९७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेला हा प्रकल्प प्रत्यक्षात दोन वर्षानी म्हणजे १९९९ मध्ये सुरु झाला. तेव्हापासून या प्रकल्पाला निधीची कमतरता आणि राजकीय घरघर लागली ती अजूनही संपलेली नाही. धरणावरुन अमळनेरात विधानसभेच्या निवडणुका दरवेळी लढल्या गेल्या पण धरणाचे काम आहे तिथेच आहे. धरणाचा सन २०१३ पासून केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेचा प्रस्ताव दिल्ली दरबारी पडून आहे. मात्र गेल्या चार वर्षात कुठलीच हालचाल झाली नाही. राजकारण तेवढे तापत राहिले. जल आयोगाची मान्यता मिळाल्यास पाडळसरे धरणासाठी निधीचा मार्गही मोकळा होणार आहे. निधी मिळाल्यानंतर धरणाचे काम पूर्ण होण्यास कमीत कमी पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे. पण जोपर्यत जल आयोगाची मान्यता मिळणार नाही, तोपर्यत पंतप्रधान सिंचन योजनेत या प्रकल्पाचा समावेश होणार नाही. मध्यंतरी काही निधी आला तो वित्तीय कामासाठी आलेला आहे. दुसरीकडे प्रकल्पाच्या उपसा योजनांसाठी सव्वा सहाशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी आल्यानंतर प्रस्तावित आराखडा तयार करण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. धरणाच्या गेटची डिझाईनही बदलण्यात आली आहे. या गेटच्या संकल्प चित्रालासुद्धा मान्यता नाही. इतका हा प्रकल्प सध्या मागे पडला आहे. प्रकल्प मागे पडला असला तरी यावर राजकारण मात्र सुरु आहे. राजकीय नेते निधी आणल्याचा आव आणत धरण दोन वर्षात पूर्ण करु, अशी फुशारक्या मारीत आहेत. पण विरोधक त्यास अप्रत्यक्षपणे विरोध करीत आहेत. कारण पाडळसरे धरणाचे काम पूर्ण झाल्यास अमळनेरसाठी मग कुठलीही समस्या नसेल. त्यामुळे निवडणुकीसाठी कुठलाच मुद्दा नसेल. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांची इच्छाशक्ती आज तरी नाही कारण त्यांना पुढील वर्षी याच मुद्यावर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे आता जनतेनेच पुढाकार घेतला आहे. जनतेचा हा आवाज दिल्लीपर्यंत नक्कीच पोहचेल... अशी आशा करू या...

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर