शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

ओढवलेला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 04:54 IST

‘जेव्हा संघ चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहून त्यांना पाठिंबा देतो. पण लढत न देता पत्करलेला पराभव निराशाजनक असतो,’ हे कसोटी क्रिकेटचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचे लॉडर््सवरील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतरचे परखड मत पाहिले तर भारताने कसा पराभव ओढवून घेतला, याची कल्पना येते.

‘जेव्हा संघ चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहून त्यांना पाठिंबा देतो. पण लढत न देता पत्करलेला पराभव निराशाजनक असतो,’ हे कसोटी क्रिकेटचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचे लॉडर््सवरील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतरचे परखड मत पाहिले तर भारताने कसा पराभव ओढवून घेतला, याची कल्पना येते. खेळामध्ये जय-पराजय होत असतात हे मान्य; पण अखेरपर्यंत झुंजण्याची, प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याची वृत्ती भारतीय संघात दिसूनच आली नाही. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींच्या मते भारतीय संघ मायदेशात वाघाप्रमाणे खेळतो, पण विदेशात गेल्यावर त्यांचे पानिपत होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकरांची ओळख ‘खडूस’ अशी आहे. कोणत्याही परिस्थितीत सहजासहजी हार पत्करायची नाही, अशी शिकवण देणारी कांगा लीग येथे होते. जागतिक स्तरावर हीच शिकवण इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट देते. पण टी२०च्या वेगात सुसाट धावणाºया ‘बीसीसीआय’ला खेळाडूंना कौंटी क्रिकेट खेळविण्यास पाठविण्याची गरजच भासत नाही. त्याचा किती फटका बसू शकतो, ते इंग्लंड दौºयात दिसून आले. चेतेश्वर पुजारा व इशांत शर्माव्यतिरिक्त सध्याच्या भारतीय संघात कोणीही कौंटी क्रिकेट खेळलेले नाही. मुळात इंग्लिश वातावरणात क्रिकेट खेळणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. या दौºयावरील प्रत्येक संघ तयारीनिशीच येतो. मुख्य मालिका खेळण्याआधी किमान दोन सराव सामने पाहुण्या संघाकडून खेळले जातात. मात्र भारताने एकाच सराव सामन्यावर भर दिला आणि तो सामनाही चार दिवसांवरून तीन दिवस खेळविण्यास भाग पाडले. अशा परिस्थितीमध्ये रवी शास्त्री-विराट कोहली संघाकडून विजयाची अपेक्षा कशी करू शकतात? कसोटी मालिकेसाठी झालेली संघनिवड हाही वादाचा विषय ठरला. त्या चुकांची कबुली आता कोहली देतो आहे. पहिल्या अटीतटीच्या कसोटीत थोडक्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यात कोहलीचा इंग्लिश वातावरणाचा चांगला अनुभव असलेल्या पुजाराऐवजी लोकेश राहुलला संधी देण्याचा निर्णय धक्कादायक होता. दुसºया डावात फिरकी गोलंदाज वरचढ ठरत असतानाही कोहलीने रवीचंद्रन अश्विनऐवजी वेगवान गोलंदाजांकडे चेंडू जास्त वेळ सोपविल्याने सामना अकारण गमवावा लागला. दुसºया कसोटीचा पहिला दिवस पावसाने धुतल्यानंतरही कोहलीने धडा घेतला नाही. परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी पूरक असतानाही त्याने दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच कोहलीच्या नेतृत्वक्षमतेवर मोठे प्रश्न निर्माण झाले. फलंदाज म्हणून कोहली या कसोटी मालिकेत इतरांपेक्षा उजवा ठरला असला, तरी कर्णधार म्हणून त्याने अनेक चुका केल्याने उर्वरित सामन्यांत प्रशिक्षक रवी शास्त्रीसह संपूर्ण संघाची मोठी ‘कसोटी’ लागणार हे निश्चित.

टॅग्स :Cricketक्रिकेटIndia VS Englandभारत विरुद्ध इंग्लंड