शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी कांदा हुंगवावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:00 IST

यावर्षी अतिवृष्टीमुळे ८० टक्के कांदा हा चाळीतच सडला. त्यावेळी २ ते ७ रुपये एवढ्या पडत्या भावात तो शेतक-याला विकावा लागला. आता २० टक्के कांदा शिल्लक असताना आणि भाव ४० रुपयांच्या आसपास जाताच सरकारने का हा निर्णय घेतला.

लहानपणी घुबडाची भीती वाटायची. त्याला दगड मारला तर तो झेलतो आणि झोळीत घालून झोका देत तो दगड झिजवतो तसातसा दगड मारणारा खंगत जातो आणि त्याचा मृत्यू होतो. भीतीचे कारण असे होते. सरकार आणि शेतकऱ्यांच्या संबंधाचा विचार केला, तर ही कथा चपखलपणे लागू पडते. गेल्या पाऊणशे वर्षात शेतकरी झिजतो, खंगतो आहे मग ते सरकार कोणतेही असो. दुसºया अर्थाने म्हातारी मेली नाही काळ मात्र सोकावला आहे हे सरकारच्या कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय पाहून वाटते. सहा महिन्यांपूर्वीच सरकारने निर्यातबंदी करणार नाही असे जाहीर केले होते आणि आज थोडे फार नुकसान भरून निघण्याची शक्यता दिसताच बंदी जाहीर केली. कांद्याचे वास्तव वेगळे आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे ८० टक्के कांदा हा चाळीतच सडला. त्यावेळी २ ते ७ रुपये एवढ्या पडत्या भावात तो शेतकºयाला विकावा लागला. आता २० टक्के कांदा शिल्लक असताना आणि भाव ४० रुपयांच्या आसपास जाताच सरकारने का हा निर्णय घेतला.

आविर्भाव असा की, कोरोनाच्या काळात ‘आॅक्सिजन’ टंचाईने जी घबराट झाली तशी कांद्याच्या भावाने झाली. ही बंदी घालताना जनहिताची साखरपेरणी केली गेली. ३५ ते ४० रुपयाने कांदा खरेदी करण्याची वेळ आली तर जनतेचे हित धोक्यात येते आणि ९० रुपयांचे लिटरभर पेट्रोल लोक खुशीने खरेदी करतात, असा सरकारचा समज दिसतो. ८० टक्के कांदा सडला असताना शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच; पण चार पैसे मिळण्याची वेळ येताच शेतकºयांच्या आशेवर सरकारनेच पाणी फेरले. २० टक्के कांदा विकून शेतकºयाच्या हाती पैसा पडून त्याचे थोडेफार नुकसान भरून काढण्याची संधी आली होती. पुढच्या महिन्यात नवीन कांदा येण्यास सुरुवात होईल आणि आताच भाव पडल्यामुळे या नव्या कांद्याला भाव मिळण्याची शक्यता नाही, म्हणजे आजही नुकसान झाले, पुढेही खड्डाच पडणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी निर्यातबंदी उठवताना जीवनावश्यक वस्तू कायदा हे गुलामीचे प्रतीक या सरकारला वाटत होते आणि आता लगेचच साक्षात्कार झाला का? तर जनतेच्या व्यापक हिताची भाषा ही सरकारची साखरपेरणी आहे. कारण कांदा महाग झाला आणि बिहार आणि बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. वाजपेयींचे सरकार पाडून कांद्याने एकदा भाजपला रडविले आहे आणि नरेंद्र मोदी छोटी-मोठी जोखीम पत्करायला तयार नाहीत. ही निवडणूक विधानसभेची असली तरी प्रतिष्ठेची आहे. दुसरे राजकीय कारण म्हणजे महाराष्ट्र हे कांदा पिकवणारे अग्रणी राज्य. भाव पडले की त्याचे खापर शेतकरी राज्य सरकारवर फोडतो आणि सरकारच्या विरोधात जनमत आपोआप तयार होते. विरोधकाचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी कांदा हे प्रभावी अस्र असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे. शेतमाल हा राज्याच्या अधिकारातील विषय असला तरी शेतमालाचे भाव ठरविण्याचा अधिकार केंद्राला आहे; पण सामान्य माणसाला याची माहिती नसते आणि तो राज्य सरकारलाच दोष देत असतो. आता आपल्या राजकीय हितासाठी अशा कायदेशीर अस्राचा वापर विरोधकांवर करता येतो.

निर्यातबंदीच्या कायद्याचाही असाच वापर केला जातो. खरे तर अशा संकटसमयी सरकारनेच बाजारपेठेत हस्तक्षेप करून भडकणारे किंवा कोसळणारे भाव रोखले पाहिजेत, चीन-पाकिस्तान या शत्रूराष्ट्रांना होणाºया पुरवठ्यावर बंदी घातली असती, तर समर्थनीय म्हणता येईल. बांगलादेशसारख्या शेजारी मित्राशी व्यापार चालू ठेवायला हरकत नसावी. पण या कर्तव्याचा सरकारला विसर पडला आहे. निर्यातबंदी केली की भाव उतरतात. सामान्य माणूस समाधानी होतो; पण उत्पादकाला फटका बसतो. कांदा खरेदी करून भाव पाडण्याचे तंत्र वापरले तर यंत्रणा कामाला लावावी लागते, त्यापेक्षा अशी तरतूद करून एका अध्यादेशाने सर्वांना गारद करता येते. परदेशात कांदा किलोमागे १ डॉलर, तर आपल्याकडे त्याच्या निम्मा ४० रुपये भाव आहे. तरीही आपल्याला तो महाग वाटतो. अशावेळी सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी कांदा हुंगवावा लागेल, त्याशिवाय पर्याय दिसत नाही.

टॅग्स :onionकांदा