शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा एकत्र निवडणुकीचे धाडस भाजप करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 10:03 IST

महाराष्ट्रात मात्र अशाच एका वेगळ्या राजकीय वळणावर एकत्र  निवडणुका घेण्याचा विचार होऊ शकतो. त्याची चाचपणीदेखील सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटीमुळे निर्माण झालेले वादळ आणि धुसफूस निवडणुका होऊन मतदारांच्या न्यायालयात निकाल होत नाही तोवर चालू राहणार आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपली आहे. भाजपला सलग तिसरा विजय मिळवून हॅटट्रिक साधायची असेल तर उत्तर आणि पश्चिम भारतातून मोठ्या अपेक्षा आहेत. या विभागात भाजपचे वर्चस्व असले तरी बिहारमध्ये जदयू, पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रात शिवसेना या पक्षांची कमी झालेली ताकद खूप परिणाम करून जाणार आहे. केवळ दिल्ली या केंद्रशासित राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) पंजाबमध्ये पाय पसरले.

हरयाणामध्येही या पक्षाचा विस्तार होण्यास संधी आहे. भाजपला पूर्वेकडील राज्यात मर्यादित यश मिळेल. दक्षिणेत  लोकसभेच्या १३२ जागा आहेत. भाजपचा प्रभाव केवळ कर्नाटकपुरता आहे आणि तामिळनाडूत प्रादेशिक पक्ष फक्त अण्णा द्रमुकच सोबत आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात काय करायचे, असा प्रश्न भाजपला भेडसावत आहे. त्यामुळेच लोकसभेबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक घेऊन अधिकाधिक जागा पटकाविता येतील का, याचा गांभीर्याने विचार चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच सर्व प्रदेश विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्यायला हव्यात, अशी सूचना मांडली होती. मात्र, लोकसभेची निवडणूक देश आणि देशासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लढविली जाते. तसे प्रत्येक प्रदेशातील राजकारण नाही. त्या सर्वांची निवडणूक एकत्र घेणे अवघड आहे.

महाराष्ट्रात मात्र अशाच एका वेगळ्या राजकीय वळणावर एकत्र  निवडणुका घेण्याचा विचार होऊ शकतो. त्याची चाचपणीदेखील सुरू आहे. मुंबई आणि ठाणे महापालिकेची निवडणूक होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे राजकीय भवितव्य काय असणार, हे स्पष्ट होणार नाही. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष म्हणजे पाण्यात बसलेल्या म्हशीसारखे आहेत. ती बाहेर आल्याशिवाय पाहता येणार नाही आणि किती दूध देईल, याचा अंदाजही येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे भारतीय परंपरेनुसार कौटुंबिक वारसा आहे. शिंदे शिवसेेनेला भाजपची साथ आहे. नरेंद्र मोदी यांंच्या नेतृत्वाचा करिष्मा आहे. भाजप-शिंदे शिवसेना युतीला एकच मुद्दा सतावत असणार आहे की, शिवसेना हा राजकीय पक्ष मराठी माणसाच्या अस्मितेवर उभा राहिला, वाढला, त्याने अनेक लढाया मराठी माणसांसाठी केल्या. हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर सडेतोड भूमिका मांडली. ही अस्मितेची लाट उभी राहिली तर आपले काय होणार, ही चिंता भाजपला असणार आहे.

शिवसेनेत फाटाफुटीचे राजकारण घडत होते, तेव्हा दिवसातून तीनवेळा प्रसारमाध्यमाशी बोलणारे भाजपचे नेते-प्रवक्ते हे राजकारण पूर्ण होईपर्यंत तोंडावर बोट ठेवून आळीमिळी गूपचिळीसारखे बसून होते. कारण शिवसेनेचे अस्तित्व राहते की नाही, असा लाखमोलाचा प्रश्न उपस्थित होत असताना या परिस्थितीला आपण जबाबदार नव्हतो आणि नाही, हेच भाजपला दाखवून द्यायचे होते. उद्धव ठाकरे कमी वेळा बाहेर पडतात; पण जेव्हा पडतात तेंव्हा त्यांना प्रतिसाद चांगला मिळतो, हे कोकणातील सभेतून दिसून आले आहे. त्याचीच भीती असल्याने नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर लढविल्या जाणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबत महाराष्ट्र विधानसभेचीही निवडणूक घेता आली तर फायद्याचे ठरेल असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. भाजपमध्ये या विषयावर दोन मतप्रवाह दिसतात. एकत्र निवडणुका घेण्याचा मुद्दा मध्यमवर्गीय आणि शहरी मतदारांना भावतो म्हणून नरेंद्र मोदी यांनी चर्चेसाठी मांडला होता.

काही राज्यात तरी विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची संधी असूनही त्यांनी तसे केलेले नाही. अशा पार्श्वभूमीवर देशव्यापी वातावरण निर्मितीत आणि मराठी अस्मितेच्या संभाव्य लाटेवर मात करण्यासाठी एकत्र निवडणुकीची चाचपणी करून पाहिली जात असावी. प्रत्यक्षात शिवसेनेच्या फुटीने मराठी माणसाच्या मनाला वेदना झाल्या आहेत, हे केव्हाही मान्य करावे लागणार आहे. या पक्षाचा कट्टर असा मतदार मर्यादित असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची ताकद त्याच्याकडे निश्चित आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा अंदाज चुकता कामा नये, यासाठी भाजपने चर्चेत हा मुद्दा सोडला असावा, असे दिसते. अन्यथा एकत्र निवडणुकीचे धाडस भाजप करणार नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक