शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गुरू-शिष्य परंपरेचा उगम आणि विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:52 IST

प्राचीन हिंदू धर्माचे ‘गुरू’ हे अविभाज्य अंग असले तरी गुरूंच्या स्मरणार्थ आषाढ महिन्यातील पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा बौद्ध आणि जैन धर्माकडून घेण्यात आली आहे.

- जवाहर सरकारप्राचीन हिंदू धर्माचे ‘गुरू’ हे अविभाज्य अंग असले तरी गुरूंच्या स्मरणार्थ आषाढ महिन्यातील पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा बौद्ध आणि जैन धर्माकडून घेण्यात आली आहे. बालवयात आणि तरुणांच्या ब्रह्मचर्यकाळातसुद्धा गुरू आणि त्यांचे आश्रम किंवा पाठशाळा हे निवासी विद्यालयाचे कर्तव्य पार पाडीत असत. पण गुरुपौर्णिमा केव्हापासून अस्तित्वात आली याविषयी मात्र मतैक्य आढळत नाही. द्रोणाचार्यांसारखे गुरू कौरव, पांडवांना विशिष्ट कौशल्यात पारंगत करायचे, पण त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याची निश्चित तिथी नव्हती आणि शिक्षणाचा ठरावीक कालावधीसुद्धा नव्हता. अन्य आध्यात्मिक गुरूसुद्धा शिष्यांना त्यांच्याकडे प्रवेश देताना खुलेपणा बाळगत होते. पण बौद्ध गुरूंनी मात्र गुरुपौर्णिमेपासून ‘वर्ष’ किंवा पाली भाषेतील ‘वास’ पाळायला सुरुवात केली. त्या काळात तरुण आणि वयोवृद्ध भिक्खूंना मानवी वस्तीचा त्याग करून दूरवर गुहेत किंवा एखाद्या मठात राहावे लागायचे. पण काही अभ्यासक्रम सर्वांसाठी खुले असायचे. त्यात कुणी तप:साधना करीत तर कुणी निसर्गोपचाराचे शिक्षण घेत. गुरुपौर्णिमेला पावसाने सगळा देश व्यापलेला असायचा.बौद्ध धर्माच्या समकालीन असलेल्या जैन धर्माने चातुर्मासाची कल्पना स्वीकारली आणि ती आजतागायत कठोरपणे पाळली जाते. तीर्थंकर महावीरांनी आपले पहिले शिष्य गांधारचे गौतमस्वामी यांना दीक्षा दिली. बुद्ध परंपरेनुसार भगवान बुद्धांनी दिव्य ज्ञानाची प्राप्ती केल्यानंतर एका महिन्याने आपल्या पाच शिष्यांना उपदेश केला. ते धम्म चक्कपवत्तन सूत्त आषाढ पौर्णिमेला संपन्न झाले. ही घटना सारनाथ येथे घडली. त्यानंतर त्यांनी चातुर्मासाचा काळ मूल-गंध-कुटी येथे व्यतीत केला. तेव्हापासून बौद्ध आणि जैन धर्माचे अनुयायी चातुर्मासात मांसाहार व काही खाद्यपदार्थ वर्ज्य करतात. सिंहली लोक त्यांच्या येथील मान्सूनप्रमाणे हा काळ पाळतात. थाई जनता जुलै ते आॅक्टोबर या काळात ‘फान्सा’ पाळतात तर ब्रह्मदेश, व्हिएतनाम आणि कोरिया येथील बौद्ध या काळात स्वत:ला एका जागेत बंदिस्त करतात.या दोन धर्मांतील या परंपरा हिंदू धर्माने स्वीकारल्या, त्या धर्मांचे विचारवंत एकत्र येऊन धर्मचर्चा करीत. हे काम विद्यापीठे आणि मठात चालायचे. पूर्वी धर्माचे स्वरूप असंघटित होते. शंकराचार्यांसह अन्य आचार्यांनी धर्माला निश्चित स्वरूप दिले. ऋग्वेद आणि उपनिषदात गुरूंचा उल्लेख आदरपूर्वक करण्यात आला आहे. पण गुरुपूजा केव्हापासून सुरू झाली याचे स्पष्ट उल्लेख कुठेच आढळत नाहीत. व्यासमुनींची कथा खूप उशिरा अस्तित्वात आली. गुरुपौर्णिमेचे उदात्तीकरण वराह पुराणात आढळते. पण ते पुराणही खूप उशिरा अस्तित्वात आले. तथापि ख्रिस्तपूर्व काळात केव्हा तरी गुरुपौर्णिमा हा सण अस्तित्वात आला असावा याची ठोस कारणे सांगता येतात.

हिंदू धर्मात मठाचे अस्तित्व आढळत नाही. पण त्याने बौद्ध आणि जैन धर्मातून बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या आणि मठाची कल्पनासुद्धा मध्ययुगीन काळात स्वीकारली. चातुर्मासाचे चार महिने श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे ओळखले जात असले तरी पाऊस आणि स्थानिक गरजांचा विचार करून ते कधी-कधी तीन महिनेही असायचे. गुरूंना उपजीविकेसाठी अर्थसाहाय्याची गरज पडायची. त्यासाठी गुरुदक्षिणेची प्रथा उपयोगी पडायची. याशिवाय व्रते, जप, होम यासारख्या परंपरा तत्कालीन शिक्षण व्यवस्थेत होत्या आणि त्या आजही वेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. चौदाव्या आणि सोळाव्या शतकात भक्ती संप्रदाय आपल्या अत्युच्च स्थानावर होता. त्यामुळे हिंदू धर्माचा प्रसार सामान्य लोकांपर्यंत पोहोचला. त्या काळात सर्व जातीचे गुरू अस्तित्वात होते. त्यांच्यामुळे गुरुपौर्णिमेचे स्वरूप सर्वव्यापी होऊ शकले. आजही ते पाहावयास मिळते.गुरुकुल पद्धतीने संगीत आणि नृत्य परंपरांना बळकटी आणली. संगीत आणि नृत्य परंपरेत एकलव्याला स्थान मिळत होते की नाही यावर कधीच वाद झाले नाहीत. त्याचप्रमाणे देशात हजार वर्षे सुफी परंपराही त्याच मार्गाने सुरू राहिली. त्यांच्या खनकामध्ये शेख (मुर्शिद) हेच तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे शिक्षण देत होते. भारतीय उपखंडात मुस्लीम समाज एवढ्या संख्येने का आहे याचे कारण सुफी परंपरेत दडलेले आढळते. संगीताच्या क्षेत्रात गुरूची जागा उस्तादांनी घेतली. पुढे पुढे गुरू-शिष्य परंपरेची जागा विसाव्या शतकात नवाब, महाराजे यांनी घेतली. त्यांचा अस्त झाल्यावर मात्र गुरू-शिष्य परंपरेस कुणी वाली उरला नाही.
गुरूंच्या संदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. राक्षसांनी आणि असुरांनी गुरूंच्या तपोवनांवर आणि गुरुकुलांवर हल्ले करून या परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आर्यपुत्रांना असुरांचा नाश करण्यासाठी हातात शस्त्र धारण करावे लागले. तसे करताना त्यांनी आपल्या साम्राज्याच्या कक्षासुद्धा विस्तारल्या. त्यासाठी त्यांना धोकासुद्धा पत्करावा लागला. पण तो वेगळा विषय आहे. पण या संघर्षामुळे स्थानिकांचा प्रभाव वाढत गेला. त्यात अखेर विजयी व्हायचे ते आर्यपुत्रच. गुरू-शिष्य परंपरा समाजात खोलवर रुजल्या. त्यामुळे वनाधारित शुद्ध भारतीय परंपरांची जागा सांस्कृतिक जीवनशैलीने घेतली. हे काम इतके निष्ठापूर्वक करण्यात आले की त्याचा प्रभाव नंतरची अनेक शतके आणि सहस्रकांतही टिकून राहिला.(आयएएस अधिकारी (सेवानिवृत्त), प्रसार भारतीचे माजी सीईओ)

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा