शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दुष्काळी ब्राझीलमध्ये संत्री बहरतात, भारताचे घोडे कुठे अडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 09:32 IST

सतत दुष्काळ आणि पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असलेल्या ब्राझीलचा शेतकरी संशोधक आणि सरकारच्या साहाय्याने आपली संत्राबाग फुलवतो. हे त्या देशाला कसे जमले?

- राजेश शेगोकार(वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)

ब्राझीलची चर्चा सुरू झाली की, आपल्याला दाेन गाेष्टी आठवतात, एक म्हणजे डीजेच्या तालावर ‘ब्राझील.. ब्राझील..’ हे गाणे ऐकत धुंद हाेणे अन् दुसरे ब्राझीलचे फुटबाॅल प्रेम. पण ब्राझीलची एवढीच ओळख नाही. दक्षिण अमेरिका खंडातील हा देश संत्रा उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे स्थान मिळविण्यासाठी ब्राझीलच्या शेतकऱ्यांचा संघर्ष आणि त्यांना  मिळालेली संशाेधकांची साथ महत्त्वाची  आहे. या देशाला २०१५ ला दुष्काळाचा सामना करावा लागला, त्यानंतर पुन्हा तीन वर्षांपूर्वी दुष्काळाचा फटका बसला. ९० टक्के संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ७५ टक्के संत्र्याची झाडे जळाली. माेठे नुकसान झाले. त्यानंतर ‘फायटाेप्थेरा’ने फळबागांवर आक्रमण केले. यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सिट्रस शेतीकडे पाठ फिरवली; अशा स्थितीत तेथील सरकारने सबसिडी दिली, सिंचनाच्या व्यवस्था वाढविल्या.

ब्राझीलच्या संशाेधन संस्थांनी त्यांचे संशाेधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाेहोचविले. आजारी झाडांचे रूट स्टाॅकच काढून टाकले व फायटाेप्थेरा आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. पाण्याची गरज कमी करण्यासाठी झाडांचा आकार कमी केला. ब्राझीलमध्येही भारताप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष असते. ५०० मीटरपर्यंत खाेदल्यानंतरच पाणी मिळते. अशाही स्थितीत ड्रीप सिंचनाच्या सुविधा विस्तारल्या. तेथील संत्रा उत्पादक तरला व आज जगभरात संत्रा उत्पादनात नावारूपाला आला.

ब्राझीलच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ही यशाेगाथा नागपुरात भरलेल्या जगातील पहिल्या ‘एशियन सिट्रस काँग्रेस-२०२३’मध्ये सहभागी झालेल्या संशाेधकांकडून ऐकायला मिळाली अन् जे ब्राझीलला जमले ते आपल्या भारताला का नाही, असा प्रश्न मनात आला. जगात १५० देशांमध्ये लिंबूवर्गीय फळांची लागवड होते, त्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आंतरराष्ट्रीय मानकाच्या दृष्टीने भारतीय सिट्रसची उत्पादकता व गुणवत्ता फार कच्ची आहे. लिंबूवर्गीय फळांचा आरोग्याशी अत्यंत जवळचा असा संबंध आहे. भारतात २७ विविध प्रकारच्या लिंबूवर्गीय प्रजाती असून, नागपुरी संत्र्याप्रमाणे यातील काही प्रजातींना भौगोलिक संकेतांक (जीआय मानांकन) प्राप्त झालेले आहे. 

हवामान बदलाचा फटका तसेच लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता, गुणवत्ता आणि नवनवीन आजारांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे संत्रा बेल्टचा विस्तार कमी हाेत चालला आहे. संत्रा व माेसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी फळगळती आणि झाडे सुकविणारा फायटाेप्थेरा आजार ही माेठी समस्या ठरली आहे. ही समस्या ब्राझीलप्रमाणेच अमेरिकेतील शेतकऱ्यांसमाेरही हाेती. मात्र फ्लाेरिडा विद्यापीठाच्या संशाेधकांनी ‘बीझेड-नॅनाेटेक्नाॅलाॅजी’च्या तंत्राने या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचे नागपूरच्या एशियन सिट्रस काँग्रेसमध्ये समाेर आले. हवामान बदलामुळे ही लढाई आणखी बिकट हाेणार आहे. ब्राझील असाे की अमेरिका, येथील शेतीमधील संशाेधन हे प्रयाेगशाळेपुरते मर्यादित राहत नाही, ते थेट बांधावर जाते. त्यामुळे  तेथील शेतकरी तरला आहे. केवळ एकाच शेतात संशाेधन पाेहोचविले जात नाही, तर सर्व शेती क्षेत्राचा समावेश केला जाताे. सरकार - संशाेधन संस्था हातात हात घालून चालतात, नाहक सरकारी हस्तक्षेप हाेत नाही.

दर्जेदार उत्पादनासाठी कलमांची गुणवत्ता हवी असते. आपल्या देशात दरवर्षी संत्रा, माेसंबी या लिंबूवर्गीय फळबागांच्या लागवडीसाठी सरासरी १.७० काेटी कलमांची गरज असून, सरासरी ३० लाख दर्जेदार व राेगमुक्त कलमांची निर्मिती केली जाते. ही तफावत माेठी आहे. त्यामुळे आगामी काळात लिंबूवर्गीय फळपिकांसाठी व्यापक अशा धाेरणाची गरज भासणार आहे. एकीकडे सिट्रस काँग्रेस भरली असतानाच दुसरीकडे बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्याच्या आयातीवर ४४० टक्क्यांपर्यंत आयात शुल्कामध्ये वाढ केली होती. वाढते आयात शुल्क व वाहतूक खर्चामुळे संत्र्याची निर्यात अर्ध्यावर आली आहे. देशांतर्गत बाजारातील संत्र्याची मागणी कायम असल्याने दर प्रतिटन ६२ ते ७० हजार रुपयांवरून २० ते २५ हजार रुपये प्रतिटनावर आले आहेत. लागवडीला प्राेत्साहन देताना आयात-निर्यातीचे धाेरण शेतमालाच्या हिताचे असावे, ही अपेक्षा चुकीची नाही.

सिट्रसबाबत भारत-अमेरिका किंवा इतर देशांची परिस्थिती वेगवेगळी असली तरी समस्या एकसारख्या आहेत, हे या सिट्रस काँग्रेसमध्ये जगभरातील १६ देशांमधील १०० पेक्षा अधिक लिंबूवर्गीय फळशास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी केलेल्या मार्गदर्शनात समाेर आले आहे. त्यांचे हे मार्गदर्शन, विचार शास्त्रज्ञ संशाेधकांपुरतेच राहिले, असे होता कामा नये. ज्या विदर्भात ही काँग्रेस झाली, किमान त्या विदर्भातील संत्रा-माेसंबी उत्पादक शेतकऱ्यांना यामध्ये सामावून घेता आले असते तर भविष्यात संशाेधनाची फळे अधिक रसाळ झाली असती. 

टॅग्स :droughtदुष्काळBrazilब्राझील