शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दुष्काळी ब्राझीलमध्ये संत्री बहरतात, भारताचे घोडे कुठे अडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 09:32 IST

सतत दुष्काळ आणि पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असलेल्या ब्राझीलचा शेतकरी संशोधक आणि सरकारच्या साहाय्याने आपली संत्राबाग फुलवतो. हे त्या देशाला कसे जमले?

- राजेश शेगोकार(वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)

ब्राझीलची चर्चा सुरू झाली की, आपल्याला दाेन गाेष्टी आठवतात, एक म्हणजे डीजेच्या तालावर ‘ब्राझील.. ब्राझील..’ हे गाणे ऐकत धुंद हाेणे अन् दुसरे ब्राझीलचे फुटबाॅल प्रेम. पण ब्राझीलची एवढीच ओळख नाही. दक्षिण अमेरिका खंडातील हा देश संत्रा उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे स्थान मिळविण्यासाठी ब्राझीलच्या शेतकऱ्यांचा संघर्ष आणि त्यांना  मिळालेली संशाेधकांची साथ महत्त्वाची  आहे. या देशाला २०१५ ला दुष्काळाचा सामना करावा लागला, त्यानंतर पुन्हा तीन वर्षांपूर्वी दुष्काळाचा फटका बसला. ९० टक्के संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ७५ टक्के संत्र्याची झाडे जळाली. माेठे नुकसान झाले. त्यानंतर ‘फायटाेप्थेरा’ने फळबागांवर आक्रमण केले. यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सिट्रस शेतीकडे पाठ फिरवली; अशा स्थितीत तेथील सरकारने सबसिडी दिली, सिंचनाच्या व्यवस्था वाढविल्या.

ब्राझीलच्या संशाेधन संस्थांनी त्यांचे संशाेधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाेहोचविले. आजारी झाडांचे रूट स्टाॅकच काढून टाकले व फायटाेप्थेरा आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. पाण्याची गरज कमी करण्यासाठी झाडांचा आकार कमी केला. ब्राझीलमध्येही भारताप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष असते. ५०० मीटरपर्यंत खाेदल्यानंतरच पाणी मिळते. अशाही स्थितीत ड्रीप सिंचनाच्या सुविधा विस्तारल्या. तेथील संत्रा उत्पादक तरला व आज जगभरात संत्रा उत्पादनात नावारूपाला आला.

ब्राझीलच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ही यशाेगाथा नागपुरात भरलेल्या जगातील पहिल्या ‘एशियन सिट्रस काँग्रेस-२०२३’मध्ये सहभागी झालेल्या संशाेधकांकडून ऐकायला मिळाली अन् जे ब्राझीलला जमले ते आपल्या भारताला का नाही, असा प्रश्न मनात आला. जगात १५० देशांमध्ये लिंबूवर्गीय फळांची लागवड होते, त्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आंतरराष्ट्रीय मानकाच्या दृष्टीने भारतीय सिट्रसची उत्पादकता व गुणवत्ता फार कच्ची आहे. लिंबूवर्गीय फळांचा आरोग्याशी अत्यंत जवळचा असा संबंध आहे. भारतात २७ विविध प्रकारच्या लिंबूवर्गीय प्रजाती असून, नागपुरी संत्र्याप्रमाणे यातील काही प्रजातींना भौगोलिक संकेतांक (जीआय मानांकन) प्राप्त झालेले आहे. 

हवामान बदलाचा फटका तसेच लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता, गुणवत्ता आणि नवनवीन आजारांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे संत्रा बेल्टचा विस्तार कमी हाेत चालला आहे. संत्रा व माेसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी फळगळती आणि झाडे सुकविणारा फायटाेप्थेरा आजार ही माेठी समस्या ठरली आहे. ही समस्या ब्राझीलप्रमाणेच अमेरिकेतील शेतकऱ्यांसमाेरही हाेती. मात्र फ्लाेरिडा विद्यापीठाच्या संशाेधकांनी ‘बीझेड-नॅनाेटेक्नाॅलाॅजी’च्या तंत्राने या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचे नागपूरच्या एशियन सिट्रस काँग्रेसमध्ये समाेर आले. हवामान बदलामुळे ही लढाई आणखी बिकट हाेणार आहे. ब्राझील असाे की अमेरिका, येथील शेतीमधील संशाेधन हे प्रयाेगशाळेपुरते मर्यादित राहत नाही, ते थेट बांधावर जाते. त्यामुळे  तेथील शेतकरी तरला आहे. केवळ एकाच शेतात संशाेधन पाेहोचविले जात नाही, तर सर्व शेती क्षेत्राचा समावेश केला जाताे. सरकार - संशाेधन संस्था हातात हात घालून चालतात, नाहक सरकारी हस्तक्षेप हाेत नाही.

दर्जेदार उत्पादनासाठी कलमांची गुणवत्ता हवी असते. आपल्या देशात दरवर्षी संत्रा, माेसंबी या लिंबूवर्गीय फळबागांच्या लागवडीसाठी सरासरी १.७० काेटी कलमांची गरज असून, सरासरी ३० लाख दर्जेदार व राेगमुक्त कलमांची निर्मिती केली जाते. ही तफावत माेठी आहे. त्यामुळे आगामी काळात लिंबूवर्गीय फळपिकांसाठी व्यापक अशा धाेरणाची गरज भासणार आहे. एकीकडे सिट्रस काँग्रेस भरली असतानाच दुसरीकडे बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्याच्या आयातीवर ४४० टक्क्यांपर्यंत आयात शुल्कामध्ये वाढ केली होती. वाढते आयात शुल्क व वाहतूक खर्चामुळे संत्र्याची निर्यात अर्ध्यावर आली आहे. देशांतर्गत बाजारातील संत्र्याची मागणी कायम असल्याने दर प्रतिटन ६२ ते ७० हजार रुपयांवरून २० ते २५ हजार रुपये प्रतिटनावर आले आहेत. लागवडीला प्राेत्साहन देताना आयात-निर्यातीचे धाेरण शेतमालाच्या हिताचे असावे, ही अपेक्षा चुकीची नाही.

सिट्रसबाबत भारत-अमेरिका किंवा इतर देशांची परिस्थिती वेगवेगळी असली तरी समस्या एकसारख्या आहेत, हे या सिट्रस काँग्रेसमध्ये जगभरातील १६ देशांमधील १०० पेक्षा अधिक लिंबूवर्गीय फळशास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी केलेल्या मार्गदर्शनात समाेर आले आहे. त्यांचे हे मार्गदर्शन, विचार शास्त्रज्ञ संशाेधकांपुरतेच राहिले, असे होता कामा नये. ज्या विदर्भात ही काँग्रेस झाली, किमान त्या विदर्भातील संत्रा-माेसंबी उत्पादक शेतकऱ्यांना यामध्ये सामावून घेता आले असते तर भविष्यात संशाेधनाची फळे अधिक रसाळ झाली असती. 

टॅग्स :droughtदुष्काळBrazilब्राझील