शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

- या रावजी, बसा भाऊजी!

By सुधीर महाजन | Updated: January 31, 2018 00:42 IST

वसंताची चाहूल लागली आणि राजकीय फड रंगण्यास प्रारंभ झाला. आता लक्ष धुळवडीकडे. सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली.

सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली. याचा अर्थच ढोलकीवर थाप पडताच गणगवळणीने रंग धरला म्हणजे लावणीचा कडका असेल आणि वगाचा उत्तररंग किती उत्सुकता वाढवणार, असे अपेक्षेचे मजले उंचावत आहेत. कुणाच्या इशाºयावर कोण शिटी मारतो, कोण टोपी उडवतो आणि दौलतजादा किती होते, याचीच अटकळ बांधण्यास सुरुवात झाली.शिवसेनेने औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचे पालकमंत्री बदलले. सेनेसाठी औरंगाबादचा गड महत्त्वाचा आणि येथूनच मराठवाड्याची सूत्रे हलतात; पण औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना नांदेडला पाठवले, तर नांदेडचे डॉ. दीपक सावंत यांना औरंगाबादला आणले. दिवाकर रावतेंना उस्मानाबादला पाठविले. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली, शिवाय त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उघड उघड भाजपचे काम करतात. एक जागा जिंकणे ही सेनेसाठी नामुश्की होती, तर औरंगाबादेत खा. चंद्रकांत खैरे आणि रामदास कदमांमधून विस्तवही जात नव्हता.प्रारंभी अडीच वर्षे त्यांनी खैरेंची जागोजागी कोंडी केली; पण वेळ येताच खैरेंनी सगळा हिशेब चुकता करीत कदमांना नांदेडला पाठविण्यास भाग पाडले. शिवाय त्यांची नेतेपदी निवड करून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिला. परभणीत आमदार राहुल पाटील आणि खासदार बंडू जाधव यांच्यातील उघड बेबनावामुळे दिवाकर रावतेंना बदलले. येथे रावते या दोघांमध्ये समेट घडवू शकले नाहीत. राहुल नवघरे हे आदित्य ठाकरेंच्या वर्तुळातील ओळखले जातात आणि सेनेच्या आमदार आणि खासदारांमध्येच एवढी गटबाजी आहे की, विरोधी पक्षांना येथे काही कामच नाही.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेने तुळजापुरातून सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे बीडमध्ये पक्षामधील विसंवाद उघड झाला. ‘हल्लाबोल’च्या नियोजन बैठकीत मुंबईला आणि तुळजापूरला उपस्थित असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये गैरहजर होते. येथे या यात्रेचे सगळे नियोजन संदीप क्षीरसागर या पुतण्याकडे. अजित पवारांनी या धाकट्या पातीलाच समर्थन दिले असल्याने क्षीरसागर घराण्यातील काका-पुतण्याच्या राजकारणाने रंगत आणली. आपलेच घर फोडले म्हणून जयदत्त अण्णांची नाराजी आजची नाही आणि ती उघड आहे.आज मोदी सरकार आपला पाचवा आणि या कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निवडणुका कधी, याचे उत्तर या अर्थसंकल्पातूनच मिळणार, असा अनेकांचा होरा आहे, म्हणून ढोलकीवर थाप पडली.मतदारांची मनधरणी करण्यासाठी तरी प्रारंभी सगळ्याच तंबूत ‘या रावजी, बसा भाऊजी’ ही लावणी पेश करणे सुरू झाले. पुढे सवाल-जवाब झडतील आणि धुळवड सुरू होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र