शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

- या रावजी, बसा भाऊजी!

By सुधीर महाजन | Updated: January 31, 2018 00:42 IST

वसंताची चाहूल लागली आणि राजकीय फड रंगण्यास प्रारंभ झाला. आता लक्ष धुळवडीकडे. सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली.

सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली. याचा अर्थच ढोलकीवर थाप पडताच गणगवळणीने रंग धरला म्हणजे लावणीचा कडका असेल आणि वगाचा उत्तररंग किती उत्सुकता वाढवणार, असे अपेक्षेचे मजले उंचावत आहेत. कुणाच्या इशाºयावर कोण शिटी मारतो, कोण टोपी उडवतो आणि दौलतजादा किती होते, याचीच अटकळ बांधण्यास सुरुवात झाली.शिवसेनेने औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचे पालकमंत्री बदलले. सेनेसाठी औरंगाबादचा गड महत्त्वाचा आणि येथूनच मराठवाड्याची सूत्रे हलतात; पण औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना नांदेडला पाठवले, तर नांदेडचे डॉ. दीपक सावंत यांना औरंगाबादला आणले. दिवाकर रावतेंना उस्मानाबादला पाठविले. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली, शिवाय त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उघड उघड भाजपचे काम करतात. एक जागा जिंकणे ही सेनेसाठी नामुश्की होती, तर औरंगाबादेत खा. चंद्रकांत खैरे आणि रामदास कदमांमधून विस्तवही जात नव्हता.प्रारंभी अडीच वर्षे त्यांनी खैरेंची जागोजागी कोंडी केली; पण वेळ येताच खैरेंनी सगळा हिशेब चुकता करीत कदमांना नांदेडला पाठविण्यास भाग पाडले. शिवाय त्यांची नेतेपदी निवड करून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिला. परभणीत आमदार राहुल पाटील आणि खासदार बंडू जाधव यांच्यातील उघड बेबनावामुळे दिवाकर रावतेंना बदलले. येथे रावते या दोघांमध्ये समेट घडवू शकले नाहीत. राहुल नवघरे हे आदित्य ठाकरेंच्या वर्तुळातील ओळखले जातात आणि सेनेच्या आमदार आणि खासदारांमध्येच एवढी गटबाजी आहे की, विरोधी पक्षांना येथे काही कामच नाही.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेने तुळजापुरातून सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे बीडमध्ये पक्षामधील विसंवाद उघड झाला. ‘हल्लाबोल’च्या नियोजन बैठकीत मुंबईला आणि तुळजापूरला उपस्थित असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये गैरहजर होते. येथे या यात्रेचे सगळे नियोजन संदीप क्षीरसागर या पुतण्याकडे. अजित पवारांनी या धाकट्या पातीलाच समर्थन दिले असल्याने क्षीरसागर घराण्यातील काका-पुतण्याच्या राजकारणाने रंगत आणली. आपलेच घर फोडले म्हणून जयदत्त अण्णांची नाराजी आजची नाही आणि ती उघड आहे.आज मोदी सरकार आपला पाचवा आणि या कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निवडणुका कधी, याचे उत्तर या अर्थसंकल्पातूनच मिळणार, असा अनेकांचा होरा आहे, म्हणून ढोलकीवर थाप पडली.मतदारांची मनधरणी करण्यासाठी तरी प्रारंभी सगळ्याच तंबूत ‘या रावजी, बसा भाऊजी’ ही लावणी पेश करणे सुरू झाले. पुढे सवाल-जवाब झडतील आणि धुळवड सुरू होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र