शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

- या रावजी, बसा भाऊजी!

By सुधीर महाजन | Updated: January 31, 2018 00:42 IST

वसंताची चाहूल लागली आणि राजकीय फड रंगण्यास प्रारंभ झाला. आता लक्ष धुळवडीकडे. सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली.

सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली. याचा अर्थच ढोलकीवर थाप पडताच गणगवळणीने रंग धरला म्हणजे लावणीचा कडका असेल आणि वगाचा उत्तररंग किती उत्सुकता वाढवणार, असे अपेक्षेचे मजले उंचावत आहेत. कुणाच्या इशाºयावर कोण शिटी मारतो, कोण टोपी उडवतो आणि दौलतजादा किती होते, याचीच अटकळ बांधण्यास सुरुवात झाली.शिवसेनेने औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचे पालकमंत्री बदलले. सेनेसाठी औरंगाबादचा गड महत्त्वाचा आणि येथूनच मराठवाड्याची सूत्रे हलतात; पण औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना नांदेडला पाठवले, तर नांदेडचे डॉ. दीपक सावंत यांना औरंगाबादला आणले. दिवाकर रावतेंना उस्मानाबादला पाठविले. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली, शिवाय त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उघड उघड भाजपचे काम करतात. एक जागा जिंकणे ही सेनेसाठी नामुश्की होती, तर औरंगाबादेत खा. चंद्रकांत खैरे आणि रामदास कदमांमधून विस्तवही जात नव्हता.प्रारंभी अडीच वर्षे त्यांनी खैरेंची जागोजागी कोंडी केली; पण वेळ येताच खैरेंनी सगळा हिशेब चुकता करीत कदमांना नांदेडला पाठविण्यास भाग पाडले. शिवाय त्यांची नेतेपदी निवड करून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिला. परभणीत आमदार राहुल पाटील आणि खासदार बंडू जाधव यांच्यातील उघड बेबनावामुळे दिवाकर रावतेंना बदलले. येथे रावते या दोघांमध्ये समेट घडवू शकले नाहीत. राहुल नवघरे हे आदित्य ठाकरेंच्या वर्तुळातील ओळखले जातात आणि सेनेच्या आमदार आणि खासदारांमध्येच एवढी गटबाजी आहे की, विरोधी पक्षांना येथे काही कामच नाही.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेने तुळजापुरातून सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे बीडमध्ये पक्षामधील विसंवाद उघड झाला. ‘हल्लाबोल’च्या नियोजन बैठकीत मुंबईला आणि तुळजापूरला उपस्थित असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये गैरहजर होते. येथे या यात्रेचे सगळे नियोजन संदीप क्षीरसागर या पुतण्याकडे. अजित पवारांनी या धाकट्या पातीलाच समर्थन दिले असल्याने क्षीरसागर घराण्यातील काका-पुतण्याच्या राजकारणाने रंगत आणली. आपलेच घर फोडले म्हणून जयदत्त अण्णांची नाराजी आजची नाही आणि ती उघड आहे.आज मोदी सरकार आपला पाचवा आणि या कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निवडणुका कधी, याचे उत्तर या अर्थसंकल्पातूनच मिळणार, असा अनेकांचा होरा आहे, म्हणून ढोलकीवर थाप पडली.मतदारांची मनधरणी करण्यासाठी तरी प्रारंभी सगळ्याच तंबूत ‘या रावजी, बसा भाऊजी’ ही लावणी पेश करणे सुरू झाले. पुढे सवाल-जवाब झडतील आणि धुळवड सुरू होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र