शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शिर्डी विमानतळाच्या निमित्ताने नगर जिल्ह्याच्या विकासाच्या टेकआॅफला संधी

By सुधीर लंके | Published: September 28, 2017 3:16 AM

एखाद्या राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले असा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याअर्थाने राज्य सरकारचे कौतुक केले पाहिजे.

शिर्डीत विमानाची ट्रायल लँडिंग यशस्वी झाली. नगर जिल्ह्यात पहिले विमान उतरले. १ आॅक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते या विमानतळाचे आता लोकार्पण होईल. एखाद्या राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले असा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याअर्थाने राज्य सरकारचे कौतुक केले पाहिजे.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला. त्यांनी या विमानतळाचे स्वप्न पाहिले होते. नंतर अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात २०१० मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सुरुवातीला दोनशे कोटींचा खर्च झाल्यानंतर मध्यंतरी निधीअभावी काम बंद पडले होते. निधीसाठी आंतरराष्टÑीय स्तरावरील भागीदाराचा शोध सुरू झाला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारने आणखी शंभर कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काम पूर्णत्वास गेले. या विमानतळासाठी साई संस्थाननेही पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून दिले.नगर हा मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणारा जिल्हा. पण, येथे विमान पोहोचायला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे लागली. कोल्हापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या शहरांत विमानतळ आहे. अर्थात तेथे विमाने किती उतरतात? हा भाग वेगळा. पण, निदान सुविधा निर्माण झालेली आहे. नगर जिल्ह्यात तीही सुविधा नव्हती. शिर्डीचे विमानतळ झाले त्याचे श्रेय जिल्ह्यातील राजकारण्यांपेक्षा साईबाबांना द्यावे लागेल. कारण शिर्डीला गर्दी जमते म्हणून विमानतळ करणे अपरिहार्य बनले. नगरपेक्षाही जिल्ह्याबाहेरच्या नागरिकांना या विमानतळाची जास्त आवश्यकता होती. शिर्डीत रेल्वे यापूर्वीच पोहोचलेली आहे. आता विमान उतरले. शिर्डीतून सुरुवातीला देशांतर्गत विमानसेवा सुरू होईल. भविष्यात आंतरराष्टÑीय उड्डाणे होणार आहेत. त्यादृष्टीने धावपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. या विमानतळासाठी कार्गो टर्मिनलची मंजुरीही घेण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात शिर्डीसोबतच नगर जिल्ह्याच्या टेकआॅफसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.विमानतळ आले, पण शिर्डी व जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणखी काही सुविधा निर्माण कराव्या लागतील. खुद्द शिर्डीतील हॉटेल व्यवसाय सध्या अडचणीत आहे. शिर्डीत मंदिराव्यतिरिक्त पर्यटनाच्या सुविधा नसल्याने अनेक भाविक साईसमाधीचे दर्शन घेऊन लगेचच परततात. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. ग्राहकच नसल्याने आमच्या हॉटेल्सच्या खोल्या संस्थानने भाडेतत्त्वावर चालवायला घ्याव्यात असा आग्रह त्यातूनच स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शिर्डीत लेझर शोची निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी याबाबतच्या कल्पना मांडलेल्या आहेत. मात्र, त्यादृष्टीने अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. साईबाबांच्या समाधीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हा शताब्दी महोत्सव १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वीच शिर्डीचा कायापालट अपेक्षित होता. पण तसे घडलेले नाही. विमानतळ आल्याने नगर जिल्हा विभाजनानंतर जिल्ह्याचे नवीन मुख्यालय कोणते राहणार? यादृष्टीनेही शिर्डीकडे लक्ष केंद्रित होऊ शकते.

टॅग्स :Airportविमानतळ