शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

संधीतील असमानतेने मूलभूत हक्क प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:49 IST

स्वातंत्र्याच्या आंदोलनाची परिणती १५ आॅगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळण्यात झाली खरी पण त्यानंतर सुरू झाले हृदयविदारक अमानवी अत्याचार. त्यामुळे झालेल्या जखमा कधीच भरून निघाल्या नाहीत. मात्र त्यातून परस्परांविषयी वाटणारा जो आकस निर्माण झाला तो आजतागायत कायम आहे. ब्रिटिश साम्राज्याला झुकायला लावणारा एक महात्मा आपण त्यामुळे गमावला. मानवी मूल्ये जतन करणा-या महात्मा गांधींची प्रतिगामी विचाराच्या व्यक्तीने हत्या केली.

- कपिल सिब्बल(माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेता)स्वातंत्र्याच्या आंदोलनाची परिणती १५ आॅगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळण्यात झाली खरी पण त्यानंतर सुरू झाले हृदयविदारक अमानवी अत्याचार. त्यामुळे झालेल्या जखमा कधीच भरून निघाल्या नाहीत. मात्र त्यातून परस्परांविषयी वाटणारा जो आकस निर्माण झाला तो आजतागायत कायम आहे. ब्रिटिश साम्राज्याला झुकायला लावणारा एक महात्मा आपण त्यामुळे गमावला. मानवी मूल्ये जतन करणा-या महात्मा गांधींची प्रतिगामी विचाराच्या व्यक्तीने हत्या केली. आजसुद्धा त्या प्रतिगामी शक्ती अधूनमधून आपले डोके वर काढीत असतात. भारत स्वतंत्र झाला खरा पण त्याचा आत्मा एकता आणि विविधता असलेली एकता यांच्या कैचीत अडकला आहे.२६ जानेवारी १९५० रोजी भारत हे प्रजासत्ताक झाले. या प्रजासत्ताकात लोकच सार्वभौम होते. त्यादिवशी आपण राजेशाहीला मूठमाती दिली. लोकांनी स्वत:साठी संविधानाची निर्मिती केली. त्यातून उदारमतवादी लोकशाही निर्माण करण्याचा देशाने प्रयत्न केला. पण त्यातून समानतावादी समाज निर्माण करण्याचे स्वप्न केवळ मृगजळ ठरले. गरीब आणि उपेक्षितांना समानतेची संधी मिळणे कठीण झाले आहे. दुर्बल माता आपल्या मुलांचे पोषण करू शकत नाहीत. ती कुपोषित राहतात. मग समान संधी मिळणे दूरच राहिले. त्यांची गुणवत्तापूर्ण वाढ होत नाही, त्यामुळे शाळेत नापासांची संख्या वाढली आहे. ही मुले एकतर बेरोजगार राहतात किंवा हलके रोजगार करतात. त्यांच्यात कौशल्याचा अभाव असल्याने जीवन जगणे त्यांना कठीण होते. पण ज्यांना सर्वकाही उपलब्ध आहे, ती मुले देशासाठी विकासाचे स्रोत बनतात. देशात आर्थिक असमानता वाढली आहे. ग्रामीण भागात ९३ टक्के लोक वास्तव्य करतात पण त्यांचे मासिक उत्पन्न रु. २१००० पेक्षाही कमी असते. तर देशातील १ टक्का लोक ७३ टक्के संपत्तीचा ताबा घेऊन बसले आहेत. संधीतील असमानता त्यांच्या मूलभूत हक्कांना प्रभावित करीत असते. गरीब माणसे मुकी असतात आणि जे आरडाओरड करतात त्यांची उपेक्षा केली जाते. एकूणच वातावरण जातीय उन्माद वाढविणारे आणि हिंसाचाराला पोषक बनले आहे.कृषी आधारित अर्थकारणाचा कणा असलेला शेतकरी आज संकटात सापडला आहे. कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्येची बातमी दररोज वाचनात येते. पूर आणि दुष्काळ यांनी त्यांच्या आयुष्याला प्रभावित केले आहे. डिजिटल इंडिया आणि भारत-नेट हे मैलाचे दगड समजले जातात. पण ५९ टक्के युवकांनी संगणकावर काम केले नाही आणि ६४ टक्के लोकांनी इंटरनेटचा वापर केला नाही. (आसेरचा २०१७ चा अहवाल). जनता आणि सरकार यांच्यात संबंध उरला नाही. लोकांना बँकेची सेवा पुरविण्यासाठी सरकार रात्रंदिवस परिश्रम करते, लोकांना आधारची सक्ती करते आणि लोक मात्र आशेवर कसेतरी जीवन जगत असतात. खºया भारतापासून समाजाचा वरचा वर्ग दूर राहताना दिसतो. देशाचे आर्थिक इंजिन हळूहळू वाटचाल करीत असून रोजगार उपलब्ध होणे हे स्वप्नच ठरले आहे. त्यातून जातीच्या राजकारणाला प्रोत्साहन मिळत आहे. हरियाणात जाट, गुजरातेत पाटीदार, महाराष्टÑात मराठा हे सरकारी नोकºयात वाटा मिळण्याची मागणी करीत आहेत. वस्तू आणि सेवा कर आणि निश्चलीकरणामुळे अर्थव्यवस्था प्रभावित होणारच होती हे अर्थमंत्री मान्य करीत आहेत. ज्यांचे हातावर पोट असते त्यांच्यासाठी दीर्घ मुदतीनंतर लाभ देणाºया योजना कुचकामी ठरतात.सर्वांचे म्हणणे ऐकले जाते तेव्हाच लोकशाही पद्धत कार्यप्रवण असते. जेव्हा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सर्वमान्य होते तेव्हाच लोकशाहीचे जतन होते. भाषण स्वातंत्र्यावर जेव्हा घाला घातला जातो तेव्हा आपले गणराज्य धोक्यात येते. स्वतंत्र आवाज जेव्हा दाबला जातो, विचार स्वातंत्र्य संपविण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा गणराज्याला धोका निर्माण होतो. आपल्या गणराज्याच्या योग्य प्रवासाची काळजी वाटू लागते.गणराज्याचा पाया हा उदारमतवादी मूल्यांवर अवलंबून असतो. तेथे कायद्याचे राज्य असते. कुणाचेही भय न बाळगता न्यायालये न्यायदान करू शकतात. पण आज उदार विचारांकडे संशयाने बघितले जात आहे. उदार विचारांना राष्टÑविरोधी समजले जात आहे. तपास यंत्रणा कायद्याचे उल्लंघन करताना दिसतात. राजकीय अजेंडाचे पालन करण्यासाठी तपास यंत्रणेकडून दबाव आणला जातो. गणराज्यात एका न्यायाधीशाचे कुटुंब आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगते आणि न्यायव्यवस्था मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. त्यावेळी ज्या मूल्यांची आपण जपणूक करीत असतो तीच मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत असे वाटू लागते.ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध अपील दाखल करताना तपास यंत्रणा मागेपुढे पाहते तेव्हा आपला त्यावर विश्वासच बसत नाही आणि ज्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत, त्यांच्याबाबत मात्र कोलांटउडी घेण्यात येते. हे सारे केंद्रातील सरकार बदलले म्हणून होत आहे. असे गणराज्य संकुचित होते. विशेषत: शासनाकडूनच जेव्हा भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येते!पण हे सर्व असले तरीही आशेला अजूनही जागा आहे. ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व केले तेच केवळ हिरो नाहीत तर ज्या असंख्य अज्ञात लोकांनी त्यांना साथ दिली त्यांचे पोवाडे फारसे कुणी गायिले नाहीत. पण तीच माणसे आजही गणराज्याच्या उदारमतवादी मूल्यांना चिकटून आहेत. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने आजही त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. त्याच आशेचा उत्सव आपण गणराज्यदिनी या २६ जानेवारी २०१८ रोजी साजरा केला!

टॅग्स :Indiaभारत