शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

यावेळीही 'तहात गमावले'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:21 IST

केवळ पाकिस्तान आणि दहशतवादीच नव्हे, तर मोदींनी जगालाही दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन गोष्टी ऐकवल्या.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेली युद्धसदृश स्थिती आता निवळली असली तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात दिलेल्या कठोर इशाऱ्यांनी हे स्पष्ट केले आहे, की भारताची पुन्हा कुरापत काढल्यास, पुन्हा तशी स्थिती निर्माण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. केवळ पाकिस्तान आणि दहशतवादीच नव्हे, तर मोदींनी जगालाही दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन गोष्टी ऐकवल्या. स्वतः दहशतवादाच्या विरोधात शक्तीचा वापर करायचा आणि भारताला मात्र वाटाघाटीतून मार्ग काढण्याचा सल्ला द्यायचा, हे अमेरिकेने यावेळीच नव्हे, तर यापूर्वीही अनेकदा केले आहे. 

मोदींनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचा थेट नामोल्लेख टाळला असला तरी, दहशतवाद आणि चर्चा व व्यापार एकाचवेळी होऊ शकत नाही, हे ठणकावून सांगण्याला ती किनार नक्कीच होती. यापुढे आगळीक केल्यास यापेक्षाही जबर तडाखा देण्यास भारत मागेपुढे बघणार नाही, असा थेट इशाराही मोदींनी पाकिस्तानला दिला. ऊठसूट अण्वस्त्र वापराच्या धमक्यांना भारत यापुढे भीक घालणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. मोदींपूर्वी तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद मालिकेच्या माध्यमातून पाकिस्तानला पार उघडे पाडले. 

भारताच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही, उलट आम्हीच भारताची लढाऊ विमाने पाडली, वायूतळ नष्ट केले, असे खोटेनाटे दावे पाकिस्तानने केले होते. सेनादल अधिकाऱ्यांनी पुराव्यांसह पाकिस्तानचे दात घशात घातले. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सेनादलांनीही पत्रकार परिषदेत त्यांच्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ कथित पुरावे सादर केले. त्यामध्ये समाविष्ट चित्रफिती विविध वॉर गेम्स'मधून घेतलेल्या असल्याचे स्पष्ट झाल्याने, पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारतीय आणि पाकिस्तानी पत्रकार परिषदांची तुलना करून, पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. उभय देशांनी बलप्रयोग थांबविण्याचे मान्य केल्यानंतर, प्रारंभीचे काही तास वगळता नंतर पाकिस्तानने सीमेवर कोणत्याही प्रकारे कळ काढली नसल्याने, तूर्त शांतता आहे; पण ही शांतता नेमकी कशी प्रस्थापित झाली, याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. 

अमेरिकेकडे अत्यंत धोकादायक गुप्त माहिती पोहचली होती आणि त्यामुळे आपण मोदींना पाकिस्तानवरील हल्ले थांबवून चर्चा सुरू करण्याची विनंती केली, या अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या वक्तव्यामुळे, ती गुप्त माहिती नेमकी काय होती, यासंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार आहे, अथवा भारताने पाकिस्तानच्या गुप्त अण्वस्त्र ठिकाणावर केलेल्या हल्ल्यामुळे आण्विक किरणोत्सर्ग सुरू झाला, ही ती माहिती असावी, अशी वंदता आहे. खरेखोटे भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेच्या सर्वोच्च नेतृत्वालाच ठाऊक, पण एक गोष्ट मात्र नक्की, की युद्धविरामाचा निर्णय अत्यंत तातडीने झाला. पाकिस्तानी सेनादले आणि भारतातील कडव्या राष्ट्रवाद्यांच्या काही तो पचनी पडलेला नाही. 

पाकिस्तानी सेनादलांनी अवघ्या काही तासांतच युद्धविराम भंग करून त्यांची नाराजी दर्शवली, तर भारतातील कडव्या राष्ट्रवाद्यांनी समाजमाध्यमांचा सहारा घेतला. 'बांगलादेश युद्धात निर्विवाद विजय मिळवल्यानंतर, ९० हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी युद्धकैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात अवघ्या ५४ भारतीय युद्धकैद्यांची सुटका काव का करून घेता आली नाही' किंवा 'जिंकलेला १५ हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश पाकिस्तानला परत करताना, पाकव्याप्त काश्मीर का परत मिळवला नाही', असे प्रश्न त्यांना यापुढे त्यांच्या भाषेतील छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांना विचारता येणार नाहीत, ही त्यांची सल आहे. नाही पाकव्याप्त काश्मीर; पण किमान मसूद अजहर, हाफिज सईद आणि सलाउद्दीनसारख्या दहशतवादी नेत्यांना तरी युद्धविरामाच्या बदल्यात ताब्यात मागायचे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. 

सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकनंतर काही विरोधी नेत्यांनी पुरावे मागितले होते. ते भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडले होते, तर विरोधकांना निवडणुकांत त्याचा फटका बसला होता. बहुधा त्यामुळेच यावेळी तमाम विरोधी पक्षांनी सरकारला पूर्ण साथ दिली; पण आता समर्थकांच्याच रोषास सरकारला बळी पडावे लागत आहे. युद्धात मिळवून तहात गमावण्याची परंपरा तुम्हीही कायम राखली का, हा समर्थकांकडूनच विचारला जाणारा प्रश्न, सरकारमधील धुरिणांसाठीही अडचणीचा आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान