शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

उघडले स्वर्गाचे दार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:21 IST

मंत्रालयाचा दरवाजा हे आत्महत्या करण्याचे नवे ठिकाण झाले आहे की काय, असा संशय यावा, या गतीने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणारी अडलीनडली जनता येथे आत्महत्येचा प्रयत्न करू लागली आहे.

मंत्रालयाचा दरवाजा हे आत्महत्या करण्याचे नवे ठिकाण झाले आहे की काय, असा संशय यावा, या गतीने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणारी अडलीनडली जनता येथे आत्महत्येचा प्रयत्न करू लागली आहे. जमिनीचा नाममात्र मोबदला मिळाला, म्हणून जानेवारीत धर्मा पाटील या धुळ्यातील ८४ वर्षीय शेतकºयाने विष पिऊन आत्महत्या केली. हे प्रकरण तापल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची तयारी सरकारने दाखवली. त्यामागे त्यांच्या कुटुंबाला न्याय देणे, हा हेतू होता. अन्य लोकांनी त्यापासून प्रेरणा घेणे, हा हेतू निश्चितच नव्हता. परंतु, त्यानंतर लासलगावचे शेतकरी गुलाब शिंगारी, कृषी अधिकारीपदाच्या परीक्षेचा निकाल लागत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेले अविनाश शेटे, सावकारी कर्जाला कंटाळलेल्या उस्मानाबादच्या अलका करंडे आणि बुधवारी जमिनीच्या वादाचा ५० वर्षांनंतर लागलेला निकाल विरोधात गेल्याने बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्याकडे आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. तरीही परीक्षेचा निकाल लागत नाही, येथपासून कोर्टाचा निकाल विरोधात गेला येथपर्यंत, अनेक किरकोळ कारणांकरिता जर लोकांना मृत्यूला कवटाळावे किंवा निदान तसा देखावा करावा, असे वाटत असेल तर सत्ताधारी, विरोधक आणि नोकरशहा यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. दररोज मंत्रालयात हजारो लोक कामाकरिता येतात. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या पातळीवर जनतादरबारासारखे उपक्रम राबवूनही जर प्रश्न सुटत नसतील आणि सर्व समस्यांची उत्तरे मंत्रालयात मिळतील, अशी लोकांची भावना असेल, तर हे सरकारचे मोठे अपयश आहे. सध्या विरोधात बसलेल्यांनी लागलीच याचे राजकारण करण्याचा उतावळेपणा दाखवू नये. सध्याचे विरोधक सत्ताधारी असताना त्यांनीही अनेक प्रश्नांची सोडवणूक न केल्याने ही परिस्थिती चिघळली, हेही तेवढेच खरे आहे. सावकारीविरोधी कायदा करूनही करंडे यांना आत्मदहनाकरिता मंत्रालयापर्यंत धाव का घ्यावी लागली आणि कृषी अधिकारीपदाचा निकाल दीर्घकाळ न लागल्याने शेटे यांच्यावर तीच वेळ का आली, अशा प्रश्नांची उत्तरे सत्ताधारी भाजपाला द्यावीच लागतील. ‘अच्छे दिन’चे पिटले जाणारे ढोल ऐकून आता जनतेचे कान किटले असून आता लोकांचे छोटे प्रश्न का सुटत नाहीत? तलाठी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत खाबूगिरी का सुरू आहे? मंत्री निर्ढावलेले आणि नोकरशहा निर्धास्त, हे चित्र का आहे? या व अशा सवालांचे जबाब देण्याची वेळ सरकारवर आली आहे. मंत्रालयाच्या दरवाजात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºयांवर वेगवेगळ््या मार्गाने कोणत्याही स्वरूपाचा दबाव तर नाही ना, हेही पोलिसांनी तपासण्याची गरज आहे. एकूणच मंत्रालयात प्रवेश करण्याचे दार हे स्वर्गात जाण्याकरिता उघडणारे द्वार न ठरो, हीच अपेक्षा.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय