शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उघडले स्वर्गाचे दार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:21 IST

मंत्रालयाचा दरवाजा हे आत्महत्या करण्याचे नवे ठिकाण झाले आहे की काय, असा संशय यावा, या गतीने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणारी अडलीनडली जनता येथे आत्महत्येचा प्रयत्न करू लागली आहे.

मंत्रालयाचा दरवाजा हे आत्महत्या करण्याचे नवे ठिकाण झाले आहे की काय, असा संशय यावा, या गतीने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणारी अडलीनडली जनता येथे आत्महत्येचा प्रयत्न करू लागली आहे. जमिनीचा नाममात्र मोबदला मिळाला, म्हणून जानेवारीत धर्मा पाटील या धुळ्यातील ८४ वर्षीय शेतकºयाने विष पिऊन आत्महत्या केली. हे प्रकरण तापल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची तयारी सरकारने दाखवली. त्यामागे त्यांच्या कुटुंबाला न्याय देणे, हा हेतू होता. अन्य लोकांनी त्यापासून प्रेरणा घेणे, हा हेतू निश्चितच नव्हता. परंतु, त्यानंतर लासलगावचे शेतकरी गुलाब शिंगारी, कृषी अधिकारीपदाच्या परीक्षेचा निकाल लागत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेले अविनाश शेटे, सावकारी कर्जाला कंटाळलेल्या उस्मानाबादच्या अलका करंडे आणि बुधवारी जमिनीच्या वादाचा ५० वर्षांनंतर लागलेला निकाल विरोधात गेल्याने बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्याकडे आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. तरीही परीक्षेचा निकाल लागत नाही, येथपासून कोर्टाचा निकाल विरोधात गेला येथपर्यंत, अनेक किरकोळ कारणांकरिता जर लोकांना मृत्यूला कवटाळावे किंवा निदान तसा देखावा करावा, असे वाटत असेल तर सत्ताधारी, विरोधक आणि नोकरशहा यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. दररोज मंत्रालयात हजारो लोक कामाकरिता येतात. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या पातळीवर जनतादरबारासारखे उपक्रम राबवूनही जर प्रश्न सुटत नसतील आणि सर्व समस्यांची उत्तरे मंत्रालयात मिळतील, अशी लोकांची भावना असेल, तर हे सरकारचे मोठे अपयश आहे. सध्या विरोधात बसलेल्यांनी लागलीच याचे राजकारण करण्याचा उतावळेपणा दाखवू नये. सध्याचे विरोधक सत्ताधारी असताना त्यांनीही अनेक प्रश्नांची सोडवणूक न केल्याने ही परिस्थिती चिघळली, हेही तेवढेच खरे आहे. सावकारीविरोधी कायदा करूनही करंडे यांना आत्मदहनाकरिता मंत्रालयापर्यंत धाव का घ्यावी लागली आणि कृषी अधिकारीपदाचा निकाल दीर्घकाळ न लागल्याने शेटे यांच्यावर तीच वेळ का आली, अशा प्रश्नांची उत्तरे सत्ताधारी भाजपाला द्यावीच लागतील. ‘अच्छे दिन’चे पिटले जाणारे ढोल ऐकून आता जनतेचे कान किटले असून आता लोकांचे छोटे प्रश्न का सुटत नाहीत? तलाठी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत खाबूगिरी का सुरू आहे? मंत्री निर्ढावलेले आणि नोकरशहा निर्धास्त, हे चित्र का आहे? या व अशा सवालांचे जबाब देण्याची वेळ सरकारवर आली आहे. मंत्रालयाच्या दरवाजात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºयांवर वेगवेगळ््या मार्गाने कोणत्याही स्वरूपाचा दबाव तर नाही ना, हेही पोलिसांनी तपासण्याची गरज आहे. एकूणच मंत्रालयात प्रवेश करण्याचे दार हे स्वर्गात जाण्याकरिता उघडणारे द्वार न ठरो, हीच अपेक्षा.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय