शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

उघडा डोळे, बघा नीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:00 IST

शिक्षणव्यवस्थेत गुणांच्या स्पर्धेला जास्त महत्त्व आले असून शाळांमध्ये विद्यार्थी अक्षरश: परीक्षार्थीच झाले आहेत.

शिक्षणव्यवस्थेत गुणांच्या स्पर्धेला जास्त महत्त्व आले असून शाळांमध्ये विद्यार्थी अक्षरश: परीक्षार्थीच झाले आहेत. शाळेमध्ये प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी चांगले गुण मिळवून बाहेर तर पडू शकतो, मात्र खरोखरच पुस्तकी धडे म्हणजेच ज्ञान होते का हा प्रश्न पालकांनी स्वत:ला विचारण्याची वेळ आली आहे. नागपूर शहरातील तब्बल ३५९ शाळांमध्ये क्रीडांगण नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अनेकांना ही बाब फारशी गंभीर वाटत नसली तरी शैक्षणिक क्षेत्रातील अव्यवस्था व बाजारीकरणाचा भंडाफोड करणारी ही बाब आहे. केवळ नागपूर नव्हे तर राज्यातील अनेक शाळांत असेच चित्र आहे. मुले म्हणजे मातीचा गोळा असतात व त्यांना जसा आकार दिला, तसे ते घडतात. मुलांमधील खेळाडू, कलाकार, लेखक घडण्याची प्रक्रिया ही शालेय जीवनातूनच सुरू होते. मात्र शाळांमध्ये क्रीडांगणच नाही म्हटल्यावर मुलांमधील खेळाडू बाहेर येण्यासाठी फारशी संधीच नसते. मुळात मुलांचे खेळणे तसेच कमी झाले आहेत. सार्वजनिक क्रीडांगणाच्या झालेल्या व्यावसायिकरणामुळे मनमोकळेपणाने खेळण्यासाठी जागा नाही. त्यातच दिवसभर शाळा, कोचिंग क्लास आणि ‘स्मार्टफोन्स’वरील ‘गेम्स’ यामध्ये विद्यार्थी इतके व्यस्त होतात की सायंकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडण्याचे भानदेखील त्यांना राहत नाही. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये ‘लाईफस्टाईल’शी संबंधित आजार, स्थूलता इत्यादी लहानपणापासूनच दिसून येतात. त्यामुळेच कमीत कमी शाळांमध्ये तरी खेळाच्या माध्यमातून त्यांंचा व्यायाम व्हावा व शरीरातील चपळता वाढावी ही अपेक्षा योग्यच आहे. मात्र अनेक ‘जागरूक’ पालक या बाबींकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. अमूक शाळेत प्रवेश मिळाल्यावर आमच्या मुलाला तमूक टक्क्यांहून जास्त गुण मिळतीलच असा त्यांना विश्वास असतो. अशा शाळेत प्रवेशासाठी आकाशपाताळ एक करतात. मात्र तेथे क्रीडांगणासारखी सुविधा आहे की नाही, याला ते महत्त्वही देत नाहीत. त्यामुळे क्षमता व कर्तृत्व असूनदेखील अनेक विद्यार्थी केवळ परीक्षार्थीच बनून राहतात. पालक व शाळांच्या याच उदासीन भूमिकेमुळे सव्वाशे कोटींहून अधिक लोकसंख्या असूनदेखील ‘आॅलिम्पिक’मध्ये देश मागे असतो आणि ‘फुटबॉल’ विश्वचषकात तर प्रवेशदेखील मिळत नाही. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शालेय शिक्षण असले पाहिजे. दुर्दैवाने शाळा, प्रशासन आणि पालक यापैकी कुणालाही त्याची जाण नाही. क्रीडांगणाशिवाय शाळा असणे म्हणजे ‘पायडल’विना सायकल असण्याचाच प्रकार आहे. आताच यावर विचार झाला पाहिजे. पालकांनो ‘उघडा डोळे, बघा नीट’.

टॅग्स :Teacherशिक्षक