शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

माणसे स्वस्थ आहेत तोवरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:57 IST

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत व धनवंत राज्य असल्याचा नवा पुरावा राज्य सरकारने जनतेच्या हाती दिला आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत व धनवंत राज्य असल्याचा नवा पुरावा राज्य सरकारने जनतेच्या हाती दिला आहे. पेट्रोल व डिझेल या जीवनोपयोगी वस्तूंवरचा सर्वाधिक करभार या सरकारने राज्यात लागू केला आहे. मुळात केंद्राचे धोरण रुपयांनी भाववाढ करायची आणि काही थोड्या पैशांची तीत सूट देऊन जनतेला दिलासा देणारे आहे. मात्र किमती आधीच वाढवून ठेवायच्या व त्यात दिवसागणिक एकेक पैशाची सवलत जाहीर करायची हा त्याला हास्यास्पद जोड देणारा प्रकार आहे. बाजार भावात अगोदरच झालेल्या भाववाढीला या धोरणाने जास्तीच्या वाढीचे प्रोत्साहन दिले आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न ५ ते ६ हजारांएवढे आहे ती कुटुंबे कशी जगत असतील याची कल्पना या सरकारला नसावी. ज्या सरकारचा कुटुंब प्रमुखच कुटुंबावाचून राहतो त्याला ती येण्याची शक्यताही नाही. त्यातच महाराष्ट्र सरकारने इंधनावर मोठी करवाढ केली आहे. ‘उजाला उजाला’ अशी मोठी जाहिरात केलेल्या घरगुती गॅसवरील सूटही आता सरकारने थांबविली आहे. स्त्रियांना घरात होणारा धुराचा त्रास आम्हीच थांबविला ही सरकारी जाहिरातही खोटी असल्याचे त्यामुळे साऱ्यांना कळून चुकले आहे. एकीकडे सामान्य माणसाला करवाढीचे लक्ष्य करताना सरकारच्या नवनव्या स्वप्नांची घोषणाबाजी मात्र वाढली आहे. नागपूरहून मुंबईपर्यंतचा समृद्धी मार्ग तयार व्हायला सुरुवात होत असतानाच त्याच्या बाजूने बुलेट ट्रेन नेण्याचा इरादा सरकारने जाहीर केला आहे. समृद्धी मार्गावरील प्रत्येक गाडीचा टोल हजारांच्या पुढे राहील हे मात्र सरकारने जनतेपासून दडविले आहे. बुलेट ट्रेनचे भाडेही हे सरकार लोकांना सांगणार नाही. काही काळापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे भारतात आले व त्यांनी अहमदाबाद व मुंबईदरम्यान बुलेट गाडी चालविण्याचा काही हजार कोटींचा करार भारताशी केला. नंतर त्यांना मोदी वाराणशीला घेऊन गेले. तेथे तीन तास चालणारी गंगेची आरती त्यांना दाखविली. त्यावर एका हिंदी कवीने लिहिले ‘अ‍ॅबे मोदींना म्हणतात, मोदीसाहेब, तुमच्याजवळ आरतीसाठी तीन तास असतील तर पुन्हा बुलेट ट्रेन हवी कशाला’ या कवितेतला उपहास बाजूला ठेवला तरी त्यात दडलेले सत्य मोठे आहे. सरकारला जनतेच्या गरजांचा क्रम ठरविता येत नाही हे ते सत्य आहे. जनतेला स्वस्त बाजार हवा, स्वच्छ कारभार हवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भरपूर व आवाक्याच्या दरातच हवा, तरुणांना नोकºया हव्यात, बेरोजगारी जावी, पदवीधरांनी रस्ते सफाईच्या कामात अडकू नये. इंजिनिअरिंग कॉलेजेसचे बंद पडणे थांबावे आणि काश्मिरात शांतता हवी, देशात आर्थिक सलोखा निर्माण व्हावा. ग्रामीण भागातल्या शेतकºयांच्या आत्महत्या थांबायला हव्यात. मेट्रो व बुलेट नकोत असे नाही. पण ती जनतेची गरज नसून सरकारची आवश्यकता आहे असेच सध्याचे चित्र आहे. या काळात देशात श्रीमंतीही आली. पण ती काही घरापर्यंतच पोहोचली हे वास्तव आहे. देशातील एक टक्का लोक देशातील ७९ टक्के संपत्तीचे मालक आहेत. आणि पुढाºयांच्या पोरांना त्यांच्या कंपन्या एकेका पंधरवड्यात ५० हजारांवरून ८० कोटींपर्यंत नेताना पाहता येत आहेत. यावर पुढारी प्रसन्न, पक्षास मान्यता आणि संघांचा आशीर्वाद यासोबत या मूठभर धनवंतांची साथ सरकारसोबत आहे. तोवर आपल्या आर्थिक धोरणातील अग्रक्रम खºया व वास्तवाच्या पायावर नेण्याची गरज नाही. हे सरकारला वाटत आहे. हे यातले सर्वात मोठे वास्तव आहे. त्याचमुळे कदाचित आताच्या पेट्रोल मंत्र्याने दरदिवशी जाहीर करण्यात येणारे पेट्रोलचे दर जाहीर न करण्याचा ताजा फतवा काढला आहे. ही फसवणूक माध्यमे लोकांच्या ध्यानात आणून देत नसतील, तरी ज्यांना पैसे मोजावे लागतात त्यांना ती समजण्यावाचून राहणार नाही. सबब तोपर्यंत भाववाढ चालू द्या आणि जनतेचा अंत पाहणेही थांबवू नका. आपली माणसे जोवर शाबूत व स्वस्थ आहेत तोवर हे चालायला हरकतही नाही.

टॅग्स :Petrolपेट्रोल