शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

फक्त १४ हजार कोटीच.?

By admin | Updated: June 24, 2014 10:47 IST

स्वित्झर्लंडच्या बहुचर्चित बँकांमध्ये आपल्या उद्योगपतींचे, राजकारण्यांचे, व्यावसायिकांचे आणि खासगी व्यक्तींचे मिळून फक्त १४ हजार कोटी रुपये असल्याचे वृत्त देशाला निराश करणारे आहे.

स्वित्झर्लंडच्या बहुचर्चित व जगभरच्या प्रचाराने गूढ बनविलेल्या बँकांमध्ये आपल्या उद्योगपतींचे, राजकारण्यांचे, व्यावसायिकांचे आणि खासगी व्यक्तींचे मिळून फक्त १४ हजार कोटी रुपये असल्याचे वृत्त देशाला निराश करणारे आहे. विदेशांसाठी व तेथील उद्योगपतींसाठी भारतात काम करणार्‍या एनजीओ नावाच्या आपल्या समाजसेवकांचे वार्षिक उत्पन्न याहून अधिक आहे, ही बाब आणि एकट्या आसाराम बापूला पिळले, तरी २७ हजार कोटी गळतात, हा देशाच्या अर्थमंत्रालयाचा अंदाजही निराशा आणखी गर्तेत नेणारा आहे. गेल्या ५0 वर्षांत या स्विस बँकांची एवढी जबर जाहिरात भारतात आणि जगात झाली, की स्वित्झर्लंड हा सारा देशच विदेशातून आलेल्या काळ्य़ा पैशांनी भरून गेला असावा आणि त्यात भारतीयांचे तसे पैसे अधिक असावेत,असेच अनेकांना वाटत आले. (स्वित्झर्लंड ही जगातली सर्वांत श्रेष्ठ लोकशाही राजवट आहे. दोन महायुद्धे त्या देशाच्या अंगावरून गेली, पण त्याच्या अंगावर त्यांचा साधा ओरखडादेखील उमटला नाही. या युद्धांच्या काळात हा देश गरीब होण्याऐवजी गब्बर झाला, हे त्याचे आणखी मोठे वैशिष्ट्य होय.) आता जाहीर झालेली आकडेवारी त्या सार्‍यावर पाणी फिरविणारी आहे. इंग्लंड, अमेरिका, र्जमनी आणि इतर ५७ देशांचे क्रमांक झाल्यानंतर या आकडेवारीत भारताचा नंबर येतो आणि ‘अरे एवढेच पैसे’ असे आपल्याला म्हणायला लावतो. विदेशी धनाचे भांडवल प्रथम अडवाणींनी केले. मग त्यांच्या पक्षाने त्यात आपले कोरस मिसळले. परिणामी, देशालाही ‘आपले सारे लुटून तिकडे स्वित्झर्लंडमध्ये नेले जात आहे,’ असे एका क्षणी वाटू लागले. त्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध झालेली एक बातमी त्या सार्‍यांची निराशा घालविणारी आहे. जगातले अनेक देश मिळून भारतात २0 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत, ही ती बातमी. त्याहून दिलासा देणारी बाब ही, की प्रत्यक्ष भारतीयांचीच विदेशातील गुंतवणूक आता कित्येक अब्जांच्या पुढे गेली आहे. टाटा आणि मित्तल हे इंग्लंडला सर्वांत मोठा रोजगार पुरविणारे उद्योगपती आहेत. आपल्या देशातील व्यावसायिकांनी, शिक्षणमहर्षींनी, चित्रपट कलावंतांनी, खेळाडूंनी आणि अनेक नामवंतांनी आफ्रिकेपासून स्कॅन्डेनेव्हिएन देशांपर्यंतच्या विशाल भूप्रदेशात खाणी, जमिनी, उद्योग, व्यवसाय आणि मोठाले मॉल्स उघडले आहेत. यातली एक बाब अभिमानाची वाटावी अशीही आहे. २0१0 या एकाच वर्षात विदेशात काम करणार्‍या भारतीय तरुणांनी त्यांच्या मेहनतीचे 
८0 अब्ज डॉलर्स भारतात पाठविले आहेत. या सार्‍यांच्या तुलनेत १४ हजार कोटी ही रक्कम फारच लहान व निराशा आणणारी आहे. एकट्या अंबानींजवळ दीड लाख कोटी आहेत, तर आपल्या स्वदेशी बँकांनी बुडविलेल्या जनतेच्या पैशाची रक्कम २ लाख कोटींहून अधिक आहे. स्विस बँकेमागे एवढा काळ लागलेले लोक नुसते आपल्या बँकांमागे तगादा लावून उभे राहिले असते, तरी या बँका स्विस बँकांहून जास्तीच्या खादाड आणि पचवू आहेत, हे त्यांच्या लक्षात आले असते. तर असो. आता आपले सरकार कामाला लागेल आणि त्या १४ हजार कोटीतला काही पैसा देशात आणेल. असे म्हणण्याचे कारण यातला काही पैसा कायदेशीर असल्याचे सरकारनेच सांगितले आहे. गंमत ही, की या पैशांची चौकशी करण्यावरच आजवर शेकडो कोटींचा खर्च झाला आहे. एवढे सारे करून मिळाले काय? तर निवडणुकीतला विजय. सारे काँग्रेसवाले चोर आहेत, त्यांच्याजवळ काळ्य़ा धनाचे भांडार आहे आणि ते त्यांनी स्विस बँकांमध्ये दडविले आहे, असा सारा प्रचार. या पार्श्‍वभूमीवर स्विस बँकांनी त्यांच्या भारतीय ठेवीदारांची (कायदेशीर व बेकायदेशीर) नावे अजून उघड केली नाहीत. ती तशी होत नाहीत तोवर अनेकांच्या हृदयात धडकी भरणार आहे. त्यात काँग्रेसी, बिगरकाँग्रेसी, भाजपावाले असे सर्वपक्षीय धनवंत राहणार आहेत. आपण (म्हणजे देशातील गरीब) त्यात नाहीत. हे आपल्या गरिबीने आपल्याला दिलेल्या आरोग्याचे व समाधानाचे वरदान आहे. जवळच्या बँकेत ज्यांना जाता येत नाही, ते स्वित्झर्लंडपर्यंंत कसे जाणार? ज्या भाग्यवंतांना तसे जाता आले त्यांच्या नावाची आपण आता वाट पाहायची आहे आणि विदेशातील गुंतवणुकीपेक्षा भारतातील गुंतवणूक किफायतशीर आहे, हे समजून घ्यायचे आहे. विदेशी बँका ठेवींवर व्याज देत नाहीत आणि दिले, तरी ते अत्यल्प असते. आपल्या बँका बुडतात, पण त्या कमालीच्या उदार हातांनी व्याज वाटत असतात, हे किमान भारतीयांना कळले पाहिजे आणि आपली ५0 वर्षांची ओरड वाया गेली, हे भाजपावाल्यांनाही समजले पाहिजे.