शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

मुख्यमंत्र्यांच्या कन्येविरुद्ध एक हजार शेतकरी लढणार निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 09:35 IST

लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणा-या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

- धर्मराज हल्लाळेलोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणा-या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविता या निजामाबाद मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात हळदी आणि ज्वारीच्या किमान आधारभूत किमतीसाठी एक हजार शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावातून पाच शेतक-यांनी अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात तेलंगणा सरकारने शेतकरी हिताच्या महत्त्वपूर्ण योजना समोर आणल्या. रयतू बंधू अर्थात शेतकरी मित्र ही त्यांचीच योजना वर्षामध्ये दोन वेळा प्रत्येक शेतक-याला चार हजार प्रमाणे एकूण आठ हजार रुपये बी-बियाणे व खते खरेदीसाठी मिळणार आहेत. मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांना दोन हजार रुपये देऊ केले. याउलट तेलंगणाने मे २०१८ पासूनच ही योजना अंमलात आणली आहे. परंतु शेतमालाला हमीभाव मिळाला नसल्याने शेतक-यांमध्ये असंतोष असल्याचे निजामाबादमध्ये दिसून येत आहे. विशेषत: हळदी उत्पादक शेतकरी नाराज आहेत. एकरी दीड लाख रुपये खर्च केला. त्या मोबदल्यात २० क्विंटल उत्पादन निघाले अन् त्याला चार ते पाच हजार रुपये भाव मिळाला. अर्थात उत्पादन खर्चही निघाला नाही. हमीभाव आणि लाभ तर दूरच; अशा स्थितीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीच्या मतदारसंघात हजारो शेतक-यांनी उमेदवारी दाखल करून सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्धार केला आहे. शेतकरी हितासह अनेक लोकाभिमुख निर्णयांमुळे केसीआर यांना दुस-यांदा राज्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करता आले. २०१४ च्या तुलनेत यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६३ जागांवरून टीआरएस ८८ जागांवर पोहोचली. शिवाय १७ पैकी ११ मतदारसंघात टीआरएसचे खासदार निवडून आले होते. एकंदर टीआरएसचा राज्यात प्रभाव आहे़ काही मतदारसंघात काँग्रेस जोरदार लढत देईल. फेब्रुवारी महिन्यातच तेलंगणातील निजामाबादमध्ये शेतक-यांचे मोठे आंदोलन झाले होते. ज्वारीला साडेतीन हजार आणि हळदीला पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र सध्या जे भाव मिळाले त्यात खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतक-यांनीच हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार करणे, हे एक मोठे आव्हान आहे. प्रत्यक्षात हे घडले तर देशातील लक्षवेधी लढाई निजामाबादची असेल. हजार उमेदवार म्हणजे किती मतदान यंत्र लागतील आणि आयोगाला किती कसरत करावी लागेल, याचा अंदाज न केलेला बरा. ज्या राज्यात शेतक-यांसाठी रयतु बंधू आहे. पेरणीच्या पूर्वतयारीसाठी प्रत्येकाला आठ हजार रुपये मिळणार आहेत. गरिबांसाठी एक हजार रुपयांची आसरा पेंशन योजना आहे. शेतीला २४ तास वीज आहे. तरीही शेतमालाच्या आधारभूत किमतीसाठी, हमीभावासाठी शेतकरी राज्याच्या नेतृत्वाला आव्हान देत आहेत. अर्थात शेतीचे अर्थकारण केवळ योजनांनी बदलत नाही, तर त्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित आधारभूत किंमत आणि हमीभाव आवश्यक असल्याचे निजामाबादमधल्या शेतक-यांनी लक्षात आणून दिले आहे.

टॅग्स :Telanganaतेलंगणा