शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक देश एक निवडणूक’ घटनाविरोधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 03:54 IST

भारतात काही प्रश्न सातत्याने उपस्थित होत असतात. वन नेशन वन इलेक्शन हा त्यातलाच एक विषय आहे.

- प्रा. उल्हास बापट (लेखक घटनातज्ज्ञ असून गेली अनेक वर्षे घटनेचे अध्यापन करीत आहेत)भारतात काही प्रश्न सातत्याने उपस्थित होत असतात. वन नेशन वन इलेक्शन हा त्यातलाच एक विषय आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचा नुकताच उल्लेख केला. अर्थात, राष्ट्रपतींच्या भाषणातील मुद्दे पंतप्रधानांच्या पसंतीचे असतात, त्यामुळे हा त्यांचाच विचार आहे, असे समजायला हरकत नाही. तसेच सत्ताधारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही काही मुद्दे उपस्थित करीत तशी जाहीर मागणी केली आहे.सन १९५२ ते १९६७ पर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रच होत होत्या. मात्र त्यानंतर काही राज्यांच्या विधानसभा मुदतीआधीच बरखास्त झाल्या व हे चक्र बदलले. राज्यांच्या निवडणुका नंतर होऊ लागल्या. आता पुन्हा एकत्र निवडणूक घ्यायची, असा निर्णय झाला तर काही राज्यांच्या विधानसभा मुदतीआधी बरखास्त कराव्या लागतील किंवा काहींना मुदतवाढ द्यावी लागेल. असा निर्णय त्या राज्यांना मान्य होईल का व तो राज्यघटनेला धरून असेल का, हा प्रश्न त्यातून निर्माण होईल.एकत्र निवडणुकीसारखा निर्णय फार विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. मध्यंतरी मुख्य निवडणूक आयुक्तांनी वेगवेगळ्या राज्यांमधील निवडणूक आयुक्तांची बैठक घेतली. त्यात त्यांनी अशा प्रकारचा निर्णय प्रत्यक्षात राबविणे वास्तवात शक्य नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. निवडणूक आयोगावर त्याचा ताण येईल, असे त्यांनी सांगितले होते.

त्याशिवाय अशी घटनादुरुस्ती कायद्याच्या पाठबळावर टिकेल का, असाही मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनेसंदर्भातील काही निर्णयांकडे या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर पाहावे लागेल. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या बेसिक मुद्द्यांना कोणालाही धक्का लावता येणार नाही, असे स्पष्ट मत नोंदवले आहे. त्याच मुद्द्यावर त्यांनी न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधी केलेली घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली. अशी घटनाबाह्य ठरवलेली घटनादुरुस्ती अमलात आणता येत नाही. घटनेत बदल करताच येणार नाही असे नाही, तो करता येईल; मात्र तो विचारपूर्वक करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. घटनेच्या बेसिक म्हणजे प्राथमिक मुद्द्यांना धक्का लावता येणार नाही, लागला असे सर्वोच्च न्यायालयाला वाटले तर ती दुरुस्ती घटनाबाह्य ठरेल, असाच न्यायालयाच्या म्हणण्याचा अर्थ आहे.
बेसिक मुद्दा काय तर घटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेची मुदत ५ वर्षांची आहे. कलम १७८ नुसार विधानसभांचीही ५ वर्षांचीच आहे. संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्यव्यवस्था, मुक्त व पारदर्शी निवडणुका व न्यायालयीन पुनर्विलोकन हे घटनेतील प्रमुख मुद्दे आहेत. यातील संघराज्यव्यवस्था व संसदीय लोकशाही या दोन मुद्द्यांशी एक राज्य एक निवडणूक ही दुरुस्ती संबंधित आहे. बहुमत गमावले तर राज्य सरकार अल्पमतात जाईल व तिथे निवडणूक घ्यावीच लागेल हे घटनेतच आहे.
केंद्र सरकारचेही असेच आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष त्यांच्या खासदारांनी अचानक पाठिंबा काढून घेतला व अल्पमतात गेला तर तिथे निवडणूक घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. त्या वेळी मग विधानसभेचीही निवडणूक घेणार का, असा प्रश्न यातून निर्माण होईल. म्हणूनच कोणतीही दुरुस्ती विचारपूर्वक करणे अपेक्षित आहे व त्याला एक राज्य एक निवडणूक या दुरुस्तीचा अपवाद करता येणार नाही.
शहा यांनी उपस्थित केलेले मुद्दे उथळ आहेत. दोन वेळा निवडणूक झाल्याने अफाट खर्च होतो, असे त्यांचे मत आहे. बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पाला १ लाख कोटी रुपये खर्च करू शकता, तर लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तो करायलाच हवा. ‘सरकारवरचा ताण वाढतो’ हा त्यांचा मुद्दा उलट ‘एकत्र निवडणुका घेतल्या तर ताण अधिक वाढेल’ या निवडणूक आयोगाच्या मुद्द्यासमोर टिकणारा नाही. विकासकामे ठप्प होतात हे त्यांचे म्हणणेही बरोबर नाही. नव्याने काही विकासकामांच्या घोषणा करायला मनाई असते, जी कामे सुरू आहेत, त्यांना काहीच आडकाठी आणली जात नाही.अध्यक्षीय पद्धत व संसदीय पद्धत यात फरक आहे. बहुमत गमावले की राजीनामा देऊन निवडणूक घ्यायची हे संसदीय लोकशाहीत आहे. अध्यक्षीय निवडणुकीत मात्र त्याची मुदत संपेपर्यंत त्याला पदावर राहता येते. अमेरिकेत घटनादुरुस्ती होते, मात्र तिथे द्विपक्षीय पद्धत आहे, त्यामुळे दोन तृतीयांश मतांनी दुरुस्ती मंजूर होते म्हणजे तिला १०० टक्के पाठिंबा असतो. आपल्याकडे विरोधातील मते सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त असतात, मात्र ती विखुरलेली असल्यामुळे एकत्रित मोजली जात नाहीत. तरीही ती विरोधातील आहेत, हे लक्षात घ्यावेच लागते.
त्यामुळेच ‘एक देश एक निवडणूक’ यावर देशातील नागरिकांना विचारावे लागेल. राजकीय एकमत व्हावे लागेल. निवडणूक आयोगाचे मत काय आहे, पाहावे लागेल व इतके करूनही सर्वोच्च न्यायालयाला काय वाटते, याचाही विचार करावाच लागेल. कारण घटनेच्या रचनेला धक्का लागत असेल तर ती दुरुस्ती मान्य करणार नाही, हे न्यायालयीन आक्रमकतेून दिसलेले आहे. त्यामुळेच या विषयावर राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊन सर्वसंमतीनेच कृती करणे योग्य ठरेल.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाParliamentसंसदRamnath Kovindरामनाथ कोविंदAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी