शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो; पण सुडाची आग विझत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 07:04 IST

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो. काबाडकष्ट करून पोट भरता येते. मैलोनमैल पायपीट करावी लागते, तेव्हा कुठे भाकरीचा चंद्र दिसतो.

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो. काबाडकष्ट करून पोट भरता येते. मैलोनमैल पायपीट करावी लागते, तेव्हा कुठे भाकरीचा चंद्र दिसतो. हे वेदनादायक असतेच, पण अपरिहार्य असते आणि आवाक्यातही. मात्र, पोटाच्या आगीपेक्षा सुडाची आग अधिक भयंकर असते. ती विझत नाही. उलटपक्षी वाढत जाते. अंतिमतः ती सर्वनाश करते. ज्यांचा बदला घेतला जातो, त्यांचा तर नाश होतोच, पण ज्याच्या मनात ही आग पेटते, तोही त्यातच भस्मसात होतो. सुडाच्या या आगीत अनेक साम्राज्ये संपली. राजे-महाराजे संपले.

कित्येक महाल जमीनदोस्त झाले. या आगीतून झोपड्याही सुटत नाहीत. फाटकी, कंगाल आणि उपाशीपोटी झोपणारी माणसंही या आगीत संपून जातात. नाहीतर, पारगावमध्ये असे भयंकर हत्याकांड कशाला घडले असते? ज्या दोन कुटुंबांच्या कलहातून या हत्या झाल्या, ती दोन्ही कुटुंबं काबाडकष्ट करणारी. एकमेकांच्या नात्यातली. हातावरचं पोट. भटकंती करत जगणारी; पण याच सुडाच्या भावनेनं घात केला आणि एक कुटुंब संपून गेलं. दुसरं कुटुंब आता तुरुंगात चाललं. पुणे जिल्ह्यातल्या दौंडजवळच्या पारगावात घडलेल्या या घटनेने सगळेच हादरले आणि हळहळलेही. गेले आठवडाभर हे सुरू होते. संथ वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात एक मृतदेह सापडल्याने गावकरी भयभीत झाले. पंचक्रोशीत या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. ही बातमी आजूबाजूला पोहोचत नाही, तोवर आणखी मृतदेह सापडले. असे सात मृतदेह आठवडाभरात सापडले तरीही ठावठिकाणा समजत नव्हता.

तीन चिमुरड्यांचे मृतदेह दिसल्याने महाराष्ट्र हादरला. नंतर मृतांची ओळख पटली. सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले. आत्महत्या असल्याचा आधी संशय होता. अखेरीस हे हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले. जे आरोपी आहेत, ते एकाच कुटुंबातील. त्यात स्त्री-पुरुष आहेत. ज्यांचे मृत्यू झाले, तेही एकाच कुटुंबातील. त्यात महिला, पुरुष, बालके आहेत. चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सातजणांची हत्या केल्याचे आता समोर आले आहे. मृत मोहन पवार आणि कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा अपघात करून त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्याचा बदला म्हणून हे अख्खे खानदान संपविण्याचे त्याने ठरवले. त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील सातजणांची हत्या केली. नंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकले, असे तपासात समोर आले. या घटनाक्रमाने चक्रावलेल्या पोलिसांनी अगदी अल्पावधीत या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपींना अटकही केली.

शेवटी ‘परफेक्ट क्राइम’ असे काही नसते. आरोपींनी मोठ्या चलाखीने सगळे खून करून भीमा नदीपात्रात मृतदेह फेकून दिले होते. सगळे पुरावे नष्ट केले होते; पण मृतदेहही बोलतात, हे त्यांना ठाऊक नसावे. अखेरीस छडा लागला. पाच आरोपींना अटक झाली. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे पोलिस दलाची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. आज प्रजासत्ताक दिनी कर्तबगार पोलिस अधिकाऱ्यांचे सन्मान होत असताना, हे आणखी आश्वासक आहे. गुन्हेगार एवढ्या लवकर सापडले आणि अशा त्वरेने गजाआड गेले, तर ‘कायद्याच्या राज्या’वरचा लोकांचा विश्वास वाढेल. पण, मूळ मुद्दा वेगळाच आहे.

सूड, बदला, विश्वासघात यांनी माणसाचे एवढे नुकसान करूनही त्या वाटेने माणसे का जातात? समूळ कुटुंब संपवायचे; वंशाला दिवाही उरता कामा नये, अशा अमानुष हेतूने चिमुरड्यांनाही कशी संपवू शकतात? प्रेमाऐवजी द्वेष आणि विखाराची भाषा माणसं कुठून शिकतात? मोठ्यांच्या या वादात तीन चिमुरड्यांनी जीव गमावला, त्याचे काय करायचे?  त्यांचा अपराध असा कोणता होता की त्यांना ही शिक्षा मिळाली? माणूस प्रगत झाला. आधुनिक झाला. त्याने सगळ्या जगावर विजय मिळवला. अन्नसाखळीत अगदी खालच्या टप्प्यावर असणारा माणूस नावाचा प्राणी शीर्षस्थानावर आला. याचे कारण केवळ त्याची बुद्धिमत्ता नाही.

संवाद, सामोपचार, सौहार्द, सकारात्मकता हेही त्याचे मुख्य कारण आहे. माणूस आधुनिक झाला; पण तो ‘माणूस’च उरला नाही तर? सुडाची आग सगळे संपवते, पण ती विझत नाही, हेच त्याला समजले नाही तर? द्वेष आणि विसंवादाने दोन कुटुंबांचा बळी कसा घेतला, ते पारगाव हत्याकांडाने समजले असेल, तर प्रेम आणि सुसंवादाचा रस्ताच खरा, हे पटायला हरकत नाही. संथ वाहणारी भीमा कसलीच खंत करत नसली, तरी एवढे गुपित मात्र ती नक्कीच सांगते आहे!