शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो; पण सुडाची आग विझत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 07:04 IST

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो. काबाडकष्ट करून पोट भरता येते. मैलोनमैल पायपीट करावी लागते, तेव्हा कुठे भाकरीचा चंद्र दिसतो.

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो. काबाडकष्ट करून पोट भरता येते. मैलोनमैल पायपीट करावी लागते, तेव्हा कुठे भाकरीचा चंद्र दिसतो. हे वेदनादायक असतेच, पण अपरिहार्य असते आणि आवाक्यातही. मात्र, पोटाच्या आगीपेक्षा सुडाची आग अधिक भयंकर असते. ती विझत नाही. उलटपक्षी वाढत जाते. अंतिमतः ती सर्वनाश करते. ज्यांचा बदला घेतला जातो, त्यांचा तर नाश होतोच, पण ज्याच्या मनात ही आग पेटते, तोही त्यातच भस्मसात होतो. सुडाच्या या आगीत अनेक साम्राज्ये संपली. राजे-महाराजे संपले.

कित्येक महाल जमीनदोस्त झाले. या आगीतून झोपड्याही सुटत नाहीत. फाटकी, कंगाल आणि उपाशीपोटी झोपणारी माणसंही या आगीत संपून जातात. नाहीतर, पारगावमध्ये असे भयंकर हत्याकांड कशाला घडले असते? ज्या दोन कुटुंबांच्या कलहातून या हत्या झाल्या, ती दोन्ही कुटुंबं काबाडकष्ट करणारी. एकमेकांच्या नात्यातली. हातावरचं पोट. भटकंती करत जगणारी; पण याच सुडाच्या भावनेनं घात केला आणि एक कुटुंब संपून गेलं. दुसरं कुटुंब आता तुरुंगात चाललं. पुणे जिल्ह्यातल्या दौंडजवळच्या पारगावात घडलेल्या या घटनेने सगळेच हादरले आणि हळहळलेही. गेले आठवडाभर हे सुरू होते. संथ वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात एक मृतदेह सापडल्याने गावकरी भयभीत झाले. पंचक्रोशीत या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. ही बातमी आजूबाजूला पोहोचत नाही, तोवर आणखी मृतदेह सापडले. असे सात मृतदेह आठवडाभरात सापडले तरीही ठावठिकाणा समजत नव्हता.

तीन चिमुरड्यांचे मृतदेह दिसल्याने महाराष्ट्र हादरला. नंतर मृतांची ओळख पटली. सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले. आत्महत्या असल्याचा आधी संशय होता. अखेरीस हे हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले. जे आरोपी आहेत, ते एकाच कुटुंबातील. त्यात स्त्री-पुरुष आहेत. ज्यांचे मृत्यू झाले, तेही एकाच कुटुंबातील. त्यात महिला, पुरुष, बालके आहेत. चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सातजणांची हत्या केल्याचे आता समोर आले आहे. मृत मोहन पवार आणि कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा अपघात करून त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्याचा बदला म्हणून हे अख्खे खानदान संपविण्याचे त्याने ठरवले. त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील सातजणांची हत्या केली. नंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकले, असे तपासात समोर आले. या घटनाक्रमाने चक्रावलेल्या पोलिसांनी अगदी अल्पावधीत या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपींना अटकही केली.

शेवटी ‘परफेक्ट क्राइम’ असे काही नसते. आरोपींनी मोठ्या चलाखीने सगळे खून करून भीमा नदीपात्रात मृतदेह फेकून दिले होते. सगळे पुरावे नष्ट केले होते; पण मृतदेहही बोलतात, हे त्यांना ठाऊक नसावे. अखेरीस छडा लागला. पाच आरोपींना अटक झाली. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे पोलिस दलाची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. आज प्रजासत्ताक दिनी कर्तबगार पोलिस अधिकाऱ्यांचे सन्मान होत असताना, हे आणखी आश्वासक आहे. गुन्हेगार एवढ्या लवकर सापडले आणि अशा त्वरेने गजाआड गेले, तर ‘कायद्याच्या राज्या’वरचा लोकांचा विश्वास वाढेल. पण, मूळ मुद्दा वेगळाच आहे.

सूड, बदला, विश्वासघात यांनी माणसाचे एवढे नुकसान करूनही त्या वाटेने माणसे का जातात? समूळ कुटुंब संपवायचे; वंशाला दिवाही उरता कामा नये, अशा अमानुष हेतूने चिमुरड्यांनाही कशी संपवू शकतात? प्रेमाऐवजी द्वेष आणि विखाराची भाषा माणसं कुठून शिकतात? मोठ्यांच्या या वादात तीन चिमुरड्यांनी जीव गमावला, त्याचे काय करायचे?  त्यांचा अपराध असा कोणता होता की त्यांना ही शिक्षा मिळाली? माणूस प्रगत झाला. आधुनिक झाला. त्याने सगळ्या जगावर विजय मिळवला. अन्नसाखळीत अगदी खालच्या टप्प्यावर असणारा माणूस नावाचा प्राणी शीर्षस्थानावर आला. याचे कारण केवळ त्याची बुद्धिमत्ता नाही.

संवाद, सामोपचार, सौहार्द, सकारात्मकता हेही त्याचे मुख्य कारण आहे. माणूस आधुनिक झाला; पण तो ‘माणूस’च उरला नाही तर? सुडाची आग सगळे संपवते, पण ती विझत नाही, हेच त्याला समजले नाही तर? द्वेष आणि विसंवादाने दोन कुटुंबांचा बळी कसा घेतला, ते पारगाव हत्याकांडाने समजले असेल, तर प्रेम आणि सुसंवादाचा रस्ताच खरा, हे पटायला हरकत नाही. संथ वाहणारी भीमा कसलीच खंत करत नसली, तरी एवढे गुपित मात्र ती नक्कीच सांगते आहे!