शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

अरे, किती फेकाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 07:17 IST

कोणी किती फेकायचे याला काही मर्यादा असावी की नाही? पण ज्यांच्या हाती सार्वभौम सत्ता असते त्यांच्या तशा फेकूपणाला मर्यादा तरी कशी असेल आणि ती कोण आखून देईल?

कोणी किती फेकायचे याला काही मर्यादा असावी की नाही? पण ज्यांच्या हाती सार्वभौम सत्ता असते त्यांच्या तशा फेकूपणाला मर्यादा तरी कशी असेल आणि ती कोण आखून देईल? जागतिक बँकेने भारताच्या उत्पन्नाच्या वाढीचा वेग घसरून ५.७ टक्क्यांवर आल्याचे जाहीर केले तेव्हा सरकारातली माणसे म्हणाली, जागतिक बँकेचे आकलन आमच्या दृष्टिकोनाहून वेगळे आहे. नंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनी हा दर आणखी खाली जाणार असल्याचे सप्रमाण भाकीत केले तेव्हा ‘त्यांची प्रमाणे आणि आमचे निकष वेगळे आहेत’ हे सरकारातील पुढा-यांनी सांगितले. पुढच्या जागतिक सर्वेक्षणात यावर्षीच्या आरंभी वाढलेला औद्योगिक उत्पादनाचा दर खाली जाऊन तो ३ टक्क्यावर आला असल्याचे सांगितले. मात्र सरकारने ते सर्वेक्षणच अपु-या माहितीवर आधारले असल्याचे लोकांना सांगितले. ताज्या आकडेवारीनुसार २००८ मध्ये रोजगार भरतीची टक्केवारी ५०, २०१२ मध्ये ५५, २०१४ मध्ये ५२ तर आता २०१७ मध्ये ती १५ टक्क्याच्या खाली गेली आहे. डॉ. मनमोहनसिंग आणि पी. चिदंबरम् हे जोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसल्याचे सांगत होते तोवर ते काँग्रेसचे आहेत असे उत्तर देऊन त्यांच्यावर टीकाखोरीचा आरोप करता येत होता. नंतर यशवंत सिन्हा हे भाजपचेच अर्थमंत्री राहिलेले नेते म्हणाले, चलनबदलाने देशाच्या अर्थकारणाची गाडी घसरली आणि जीएसटीने तिला जमिनीतच रोवून धरले आहे. यावर ‘त्यांची नोकरी (म्हणजे पद) गेले असल्याने त्यांची निराशा बोलत असल्याचे’ देशाला ऐकविले गेले. त्यांना गप्प करायला त्यांच्या अंगावर त्यांचे पोर सोडण्याचा आचरटपणाही सरकारने केला. शेवटी अरुण शौरी या पत्रकार राहिलेल्या भाजपच्याच मंत्र्याने ही अर्थव्यवस्था दिशाहीन असल्याचे व ती देशाला गर्तेत नेणारी असल्याचे म्हटले तेव्हा ‘ही टीकाखोर माणसे सूड भावनेने पछाडली असल्याचे’ सांगून जागतिक संस्थांपासून शौरींपर्यंतच्या साºयांना सरकारने निकालात काढले. सत्तेच्या खुर्चीवर आरूढ असणाºयांना जमिनीवरचे वास्तव जेवढे दिसत नाही तेवढे ते जमिनीवर आलेल्या वा उतरलेल्या लोकांना दिसत असते. या माणसांच्या निष्कर्षांचा आदर करायचा असतो. पण तेवढी सभ्यता दाखविण्याऐवजी त्यांना फटकारणे आणि आपल्या पाठिराख्यांकडून व पगारी ट्रोल्सकडून आपली पाठ थोपटून घेणे अधिक सोपे असते. सरकार सध्या तेच करीत आहे. चलनबदलामुळे देश तसाही ‘कॅशलेस’ झाला आहे. बाजारातल्या वस्तूंना उठाव नाही, दिवाळीच्या जाहिराती मोठ्या आहेत पण मालाला गि-हाईके नाहीत. बांधकामासारखे व्यवसाय मंदीत गेल्याने कामगार घरी बसू लागले आहेत आणि शेतीवरील कर्जाच्या भारातून ती उठतानाच दिसत नाही. जेव्हा सारी अर्थव्यवस्थाच अशी मंदावते तेव्हा जनतेला स्वप्ने दाखवायची असतात. पूर्वीचे ग्रीक हुकूमशहा त्यासाठी जीवघेण्या खेळांचे व स्पर्धांचे आयोजन करीत. आता त्याऐवजी रंगीबेरंगी उत्सवांचे आयोजन दाखवून लोकांना त्यांच्या व्यथांचा विसर पाडता येतो. मेट्रो आणि बुलेट या सामान्य माणसांच्या हाती क्वचितच लागू शकणा-या गाड्यांची आश्वासने लोकांना देता येतात. उद्योग बसले तरी पतंजली वाढलेला दाखवता येतो. इतरांची पोरे दरिद्री झाली तरी पक्षाध्यक्षांचे चिरंजीव त्यांची संपत्ती दोन वर्षात १६ हजार पटींनी वाढवितात हे दाखवता येते. पंतप्रधानांच्या मन की बातमध्ये या गोष्टी येत नाहीत आणि पुढा-यांच्या गर्जनाही पोकळ असतात. मात्र समाजाला समजते ते सरकारला कळायला वेळ लागतो. त्याचे फेकणे सुरूच राहते. ते कधीतरी थांबावे आणि त्याला वास्तवाचा स्पर्श व्हावा. अन्यथा सरकार नावाची यंत्रणाच अविश्वसनीय होऊन जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानGovernmentसरकार