शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अरे, किती फेकाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 07:17 IST

कोणी किती फेकायचे याला काही मर्यादा असावी की नाही? पण ज्यांच्या हाती सार्वभौम सत्ता असते त्यांच्या तशा फेकूपणाला मर्यादा तरी कशी असेल आणि ती कोण आखून देईल?

कोणी किती फेकायचे याला काही मर्यादा असावी की नाही? पण ज्यांच्या हाती सार्वभौम सत्ता असते त्यांच्या तशा फेकूपणाला मर्यादा तरी कशी असेल आणि ती कोण आखून देईल? जागतिक बँकेने भारताच्या उत्पन्नाच्या वाढीचा वेग घसरून ५.७ टक्क्यांवर आल्याचे जाहीर केले तेव्हा सरकारातली माणसे म्हणाली, जागतिक बँकेचे आकलन आमच्या दृष्टिकोनाहून वेगळे आहे. नंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनी हा दर आणखी खाली जाणार असल्याचे सप्रमाण भाकीत केले तेव्हा ‘त्यांची प्रमाणे आणि आमचे निकष वेगळे आहेत’ हे सरकारातील पुढा-यांनी सांगितले. पुढच्या जागतिक सर्वेक्षणात यावर्षीच्या आरंभी वाढलेला औद्योगिक उत्पादनाचा दर खाली जाऊन तो ३ टक्क्यावर आला असल्याचे सांगितले. मात्र सरकारने ते सर्वेक्षणच अपु-या माहितीवर आधारले असल्याचे लोकांना सांगितले. ताज्या आकडेवारीनुसार २००८ मध्ये रोजगार भरतीची टक्केवारी ५०, २०१२ मध्ये ५५, २०१४ मध्ये ५२ तर आता २०१७ मध्ये ती १५ टक्क्याच्या खाली गेली आहे. डॉ. मनमोहनसिंग आणि पी. चिदंबरम् हे जोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसल्याचे सांगत होते तोवर ते काँग्रेसचे आहेत असे उत्तर देऊन त्यांच्यावर टीकाखोरीचा आरोप करता येत होता. नंतर यशवंत सिन्हा हे भाजपचेच अर्थमंत्री राहिलेले नेते म्हणाले, चलनबदलाने देशाच्या अर्थकारणाची गाडी घसरली आणि जीएसटीने तिला जमिनीतच रोवून धरले आहे. यावर ‘त्यांची नोकरी (म्हणजे पद) गेले असल्याने त्यांची निराशा बोलत असल्याचे’ देशाला ऐकविले गेले. त्यांना गप्प करायला त्यांच्या अंगावर त्यांचे पोर सोडण्याचा आचरटपणाही सरकारने केला. शेवटी अरुण शौरी या पत्रकार राहिलेल्या भाजपच्याच मंत्र्याने ही अर्थव्यवस्था दिशाहीन असल्याचे व ती देशाला गर्तेत नेणारी असल्याचे म्हटले तेव्हा ‘ही टीकाखोर माणसे सूड भावनेने पछाडली असल्याचे’ सांगून जागतिक संस्थांपासून शौरींपर्यंतच्या साºयांना सरकारने निकालात काढले. सत्तेच्या खुर्चीवर आरूढ असणाºयांना जमिनीवरचे वास्तव जेवढे दिसत नाही तेवढे ते जमिनीवर आलेल्या वा उतरलेल्या लोकांना दिसत असते. या माणसांच्या निष्कर्षांचा आदर करायचा असतो. पण तेवढी सभ्यता दाखविण्याऐवजी त्यांना फटकारणे आणि आपल्या पाठिराख्यांकडून व पगारी ट्रोल्सकडून आपली पाठ थोपटून घेणे अधिक सोपे असते. सरकार सध्या तेच करीत आहे. चलनबदलामुळे देश तसाही ‘कॅशलेस’ झाला आहे. बाजारातल्या वस्तूंना उठाव नाही, दिवाळीच्या जाहिराती मोठ्या आहेत पण मालाला गि-हाईके नाहीत. बांधकामासारखे व्यवसाय मंदीत गेल्याने कामगार घरी बसू लागले आहेत आणि शेतीवरील कर्जाच्या भारातून ती उठतानाच दिसत नाही. जेव्हा सारी अर्थव्यवस्थाच अशी मंदावते तेव्हा जनतेला स्वप्ने दाखवायची असतात. पूर्वीचे ग्रीक हुकूमशहा त्यासाठी जीवघेण्या खेळांचे व स्पर्धांचे आयोजन करीत. आता त्याऐवजी रंगीबेरंगी उत्सवांचे आयोजन दाखवून लोकांना त्यांच्या व्यथांचा विसर पाडता येतो. मेट्रो आणि बुलेट या सामान्य माणसांच्या हाती क्वचितच लागू शकणा-या गाड्यांची आश्वासने लोकांना देता येतात. उद्योग बसले तरी पतंजली वाढलेला दाखवता येतो. इतरांची पोरे दरिद्री झाली तरी पक्षाध्यक्षांचे चिरंजीव त्यांची संपत्ती दोन वर्षात १६ हजार पटींनी वाढवितात हे दाखवता येते. पंतप्रधानांच्या मन की बातमध्ये या गोष्टी येत नाहीत आणि पुढा-यांच्या गर्जनाही पोकळ असतात. मात्र समाजाला समजते ते सरकारला कळायला वेळ लागतो. त्याचे फेकणे सुरूच राहते. ते कधीतरी थांबावे आणि त्याला वास्तवाचा स्पर्श व्हावा. अन्यथा सरकार नावाची यंत्रणाच अविश्वसनीय होऊन जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानGovernmentसरकार