शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नाठाळ व खोडसाळ

By admin | Updated: January 7, 2016 23:27 IST

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने स्वत:च्या वाढदिवसाची भेट म्हणून जगाला हैड्रोजन बॉम्बची भेट दिल्याचा दावा तेथील सरकारने केला

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने स्वत:च्या वाढदिवसाची भेट म्हणून जगाला हैड्रोजन बॉम्बची भेट दिल्याचा दावा तेथील सरकारने केला असला तरी ज्या बॉम्बची तिथे बुधवारी चाचणी केली गेली तो हैड्रोजन बॉम्बच असल्याबद्दल जगभरातील अनेक राष्ट्रांना आणि तज्ज्ञांना रास्त शंका आहे. हैड्रोजन बॉम्ब अणु बॉम्बच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक संहारक मानला जातो. अर्थात दोन्ही बॉम्ब अंतत: मानवतेच्या विध्वंसालाच कारणीभूत ठरत असल्याने उत्तर कोरियाने केलेली चाचणी भले हैड्रोजन बॉम्बच्या ऐवजी अणुबॉम्बची केली गेली असली तरी त्या राष्ट्राने केलेली आजवरची अशी ही चौथी चाचणी आहे. चीन आणि रशियाची या राष्ट्राशी दोस्ती तर जपान व दक्षिण कोरियाशी दुष्मनी आहे. तसे असले तरी चीन, रशियासकट साऱ्या राष्ट्रांनी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने किम जोंग उन यांच्या नाठाळ खोडसाळपणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करुन निषेधही केला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी केलेल्या तिसऱ्या अणु चाचणीनंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने त्या राष्ट्रावर काही निर्बन्ध लागू केले होते. पण त्यांचा फारसा काही प्रभाव पडला नाही, हेच या चौथ्या चाचणीतून समोर आले आहे. मध्यंतरी इराणने आपला अणु कार्यक्रम पुढ रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हां त्याच्यावर असंख्य निर्बन्ध लागू करुन त्याला चर्चेसाठी समोरासमोर येण्यास बाध्य केले गेले तसाच प्रयोग उत्तर कोरियाबाबत करावा असा काही जागतिक नेत्यांचा सूर असला तरी आजच्या घडीला त्याबाबत एकमत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेने आर्थिक निर्बन्ध लागू केल्यास चीन त्याचा लाभ उठवेल आणि आपले नुकसान होईल अशी अमेरिकेला धास्ती वाटते. म्हणजे व्यापार महत्वाचा ठरतो. अण्वस्त्रांबाबत साऱ्या जगालाच चिंता वाटत असली तरी ही चिंता लोकशाही मानणारी राष्ट्रे, पक्षीय हुकुमशाहीची राष्ट्रे आणि उत्तर कोरियासारखी एकाधिकारशाही असलेली राष्ट्रे यांच्या बाबतीत चढत्या भांजणीतील असते. उत्तर कोरियाच्या बुधवारच्या चाचणीवर भारताची प्रतिक्रिया अन्य राष्ट्रांच्या तुलनेत जरा अधिकच कठोर आणि चिंतेची असण्याचे प्रमुख कारण म्हणजे अण्वस्त्रांबाबत उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घ काळापासून असलेले सहचर्य. पाकिस्तानला उत्तर कोरियानेच चोरुन अणुविज्ञान दिले आहे आणि त्याच्याच आधारे पाकिस्तानने अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे. आज जगात सर्वत्रच अत्यंत असुरक्षिततेचे आणि दहशतवादाचे वातावरण निर्माण झाले असून दहशतवादी संघटनांचे नवनवे अवतार उदयास येत आहेत. उद्या त्यांच्या हाती अशी संहारक अस्त्रे पडली तर संपूर्ण विश्वाचा संहार होण्यास वेळ लागणार नाही.