शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

नाठाळ व खोडसाळ

By admin | Updated: January 7, 2016 23:27 IST

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने स्वत:च्या वाढदिवसाची भेट म्हणून जगाला हैड्रोजन बॉम्बची भेट दिल्याचा दावा तेथील सरकारने केला

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने स्वत:च्या वाढदिवसाची भेट म्हणून जगाला हैड्रोजन बॉम्बची भेट दिल्याचा दावा तेथील सरकारने केला असला तरी ज्या बॉम्बची तिथे बुधवारी चाचणी केली गेली तो हैड्रोजन बॉम्बच असल्याबद्दल जगभरातील अनेक राष्ट्रांना आणि तज्ज्ञांना रास्त शंका आहे. हैड्रोजन बॉम्ब अणु बॉम्बच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक संहारक मानला जातो. अर्थात दोन्ही बॉम्ब अंतत: मानवतेच्या विध्वंसालाच कारणीभूत ठरत असल्याने उत्तर कोरियाने केलेली चाचणी भले हैड्रोजन बॉम्बच्या ऐवजी अणुबॉम्बची केली गेली असली तरी त्या राष्ट्राने केलेली आजवरची अशी ही चौथी चाचणी आहे. चीन आणि रशियाची या राष्ट्राशी दोस्ती तर जपान व दक्षिण कोरियाशी दुष्मनी आहे. तसे असले तरी चीन, रशियासकट साऱ्या राष्ट्रांनी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने किम जोंग उन यांच्या नाठाळ खोडसाळपणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करुन निषेधही केला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी केलेल्या तिसऱ्या अणु चाचणीनंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने त्या राष्ट्रावर काही निर्बन्ध लागू केले होते. पण त्यांचा फारसा काही प्रभाव पडला नाही, हेच या चौथ्या चाचणीतून समोर आले आहे. मध्यंतरी इराणने आपला अणु कार्यक्रम पुढ रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हां त्याच्यावर असंख्य निर्बन्ध लागू करुन त्याला चर्चेसाठी समोरासमोर येण्यास बाध्य केले गेले तसाच प्रयोग उत्तर कोरियाबाबत करावा असा काही जागतिक नेत्यांचा सूर असला तरी आजच्या घडीला त्याबाबत एकमत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेने आर्थिक निर्बन्ध लागू केल्यास चीन त्याचा लाभ उठवेल आणि आपले नुकसान होईल अशी अमेरिकेला धास्ती वाटते. म्हणजे व्यापार महत्वाचा ठरतो. अण्वस्त्रांबाबत साऱ्या जगालाच चिंता वाटत असली तरी ही चिंता लोकशाही मानणारी राष्ट्रे, पक्षीय हुकुमशाहीची राष्ट्रे आणि उत्तर कोरियासारखी एकाधिकारशाही असलेली राष्ट्रे यांच्या बाबतीत चढत्या भांजणीतील असते. उत्तर कोरियाच्या बुधवारच्या चाचणीवर भारताची प्रतिक्रिया अन्य राष्ट्रांच्या तुलनेत जरा अधिकच कठोर आणि चिंतेची असण्याचे प्रमुख कारण म्हणजे अण्वस्त्रांबाबत उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घ काळापासून असलेले सहचर्य. पाकिस्तानला उत्तर कोरियानेच चोरुन अणुविज्ञान दिले आहे आणि त्याच्याच आधारे पाकिस्तानने अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे. आज जगात सर्वत्रच अत्यंत असुरक्षिततेचे आणि दहशतवादाचे वातावरण निर्माण झाले असून दहशतवादी संघटनांचे नवनवे अवतार उदयास येत आहेत. उद्या त्यांच्या हाती अशी संहारक अस्त्रे पडली तर संपूर्ण विश्वाचा संहार होण्यास वेळ लागणार नाही.