शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नाठाळ व खोडसाळ

By admin | Updated: January 7, 2016 23:27 IST

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने स्वत:च्या वाढदिवसाची भेट म्हणून जगाला हैड्रोजन बॉम्बची भेट दिल्याचा दावा तेथील सरकारने केला

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने स्वत:च्या वाढदिवसाची भेट म्हणून जगाला हैड्रोजन बॉम्बची भेट दिल्याचा दावा तेथील सरकारने केला असला तरी ज्या बॉम्बची तिथे बुधवारी चाचणी केली गेली तो हैड्रोजन बॉम्बच असल्याबद्दल जगभरातील अनेक राष्ट्रांना आणि तज्ज्ञांना रास्त शंका आहे. हैड्रोजन बॉम्ब अणु बॉम्बच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक संहारक मानला जातो. अर्थात दोन्ही बॉम्ब अंतत: मानवतेच्या विध्वंसालाच कारणीभूत ठरत असल्याने उत्तर कोरियाने केलेली चाचणी भले हैड्रोजन बॉम्बच्या ऐवजी अणुबॉम्बची केली गेली असली तरी त्या राष्ट्राने केलेली आजवरची अशी ही चौथी चाचणी आहे. चीन आणि रशियाची या राष्ट्राशी दोस्ती तर जपान व दक्षिण कोरियाशी दुष्मनी आहे. तसे असले तरी चीन, रशियासकट साऱ्या राष्ट्रांनी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने किम जोंग उन यांच्या नाठाळ खोडसाळपणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करुन निषेधही केला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी केलेल्या तिसऱ्या अणु चाचणीनंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने त्या राष्ट्रावर काही निर्बन्ध लागू केले होते. पण त्यांचा फारसा काही प्रभाव पडला नाही, हेच या चौथ्या चाचणीतून समोर आले आहे. मध्यंतरी इराणने आपला अणु कार्यक्रम पुढ रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हां त्याच्यावर असंख्य निर्बन्ध लागू करुन त्याला चर्चेसाठी समोरासमोर येण्यास बाध्य केले गेले तसाच प्रयोग उत्तर कोरियाबाबत करावा असा काही जागतिक नेत्यांचा सूर असला तरी आजच्या घडीला त्याबाबत एकमत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेने आर्थिक निर्बन्ध लागू केल्यास चीन त्याचा लाभ उठवेल आणि आपले नुकसान होईल अशी अमेरिकेला धास्ती वाटते. म्हणजे व्यापार महत्वाचा ठरतो. अण्वस्त्रांबाबत साऱ्या जगालाच चिंता वाटत असली तरी ही चिंता लोकशाही मानणारी राष्ट्रे, पक्षीय हुकुमशाहीची राष्ट्रे आणि उत्तर कोरियासारखी एकाधिकारशाही असलेली राष्ट्रे यांच्या बाबतीत चढत्या भांजणीतील असते. उत्तर कोरियाच्या बुधवारच्या चाचणीवर भारताची प्रतिक्रिया अन्य राष्ट्रांच्या तुलनेत जरा अधिकच कठोर आणि चिंतेची असण्याचे प्रमुख कारण म्हणजे अण्वस्त्रांबाबत उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घ काळापासून असलेले सहचर्य. पाकिस्तानला उत्तर कोरियानेच चोरुन अणुविज्ञान दिले आहे आणि त्याच्याच आधारे पाकिस्तानने अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे. आज जगात सर्वत्रच अत्यंत असुरक्षिततेचे आणि दहशतवादाचे वातावरण निर्माण झाले असून दहशतवादी संघटनांचे नवनवे अवतार उदयास येत आहेत. उद्या त्यांच्या हाती अशी संहारक अस्त्रे पडली तर संपूर्ण विश्वाचा संहार होण्यास वेळ लागणार नाही.