शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता मनुस्मृती

By admin | Updated: April 21, 2016 03:53 IST

दोन वर्षांपूर्वी विकासाच्या नावावर भारतीय जनता पक्ष सत्तारुढ झाला खरा; पण प्रत्यक्षात दोन वर्षात विकासापेक्षा असहिष्णुता, गोहत्त्या-बंदी, भारतमाता की जय

दोन वर्षांपूर्वी विकासाच्या नावावर भारतीय जनता पक्ष सत्तारुढ झाला खरा; पण प्रत्यक्षात दोन वर्षात विकासापेक्षा असहिष्णुता, गोहत्त्या-बंदी, भारतमाता की जय, अफजल गुरूची फाशी, अशा गैरलागू मुद्यांचीच जास्त चर्चा झाली. त्यासाठी भाजपा व त्या पक्षाचे निंदक परस्पराना दोष देत आहेत. आता या यादीत मनुस्मृती या आणखी एका मुद्याची भर पडणार की काय, असे वाटू लागले आहे. सध्या देशभर समरसता अभियान चालवित असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सह-प्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांनी मनुस्मृतीचा मुद्दा नव्याने चर्चेत आणला आहे. कोणताही हिंदू मनुस्मृती मानत नाही, उलट हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक मनुस्मृतीला चर्चेत आणू पाहात आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आम्ही मनुस्मृती नव्हे, तर आंबेडकर स्मृती (राज्यघटना) मानतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. संघ मनुस्मृतीऐवजी राज्यघटनेला मानत असेल, तर ते स्वागतार्हच म्हणावे लागेल; पण आता काहीही औचित्य वा निमित्त नसताना मनुस्मृती पुन्हा चर्चेत आणण्यामागचे कारण काय? जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अफझल गुरूच्या फाशीचा निषेध झाल्यानंतर काही दिवसांनी, संघ परिवारातील विद्यार्थी संघटना असलेल्या अ. भा. विद्यार्थी संघटेनेने जेएनयूच्या आवारात मनुस्मृतीचे दहन केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनुस्मृतीची चर्चा सुरू होणे, हा निव्वळ योगायोग म्हणावा, की त्यामागे संघ परिवाराचे काही निश्चित असे तर्कशास्त्र आहे? सध्या देशात पाच राज्यांमधील विधानसभांची निवडणूक सुरू असली तरी, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना वेध लागले आहेत, ते उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे! लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर अवघ्या वर्षभरातच पिछेहाट सुरू झालेल्या भाजपासाठी तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक म्हणजे जीवनमरणाचाच विषय आहे. त्या राज्यात भाजपाला सत्तारुढ समाजवादी पक्षासोबतच मायावतींच्या नेतृत्वातील बहुजन समाज पक्षाशीही टक्कर द्यावी लागणार आहे. दलित मतांचे राजकारण करणाऱ्या मायावतींनी, जेएनयूमधील अभाविपप्रणित मनुस्मृती दहनानंतर मनुस्मृती दहनाची आवश्यकता नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी मायावती तूर्त बौद्ध धर्माचा अंगिकार करणार नसल्याची बातमी आली होती. दहा वर्षांपूर्वी दलित व ब्राह्मण समाजाची अशक्यप्राय वाटणारी युती प्रत्यक्षात घडवून सत्ता हस्तगत करणाऱ्या मायावतींचा आताही तोच प्रयत्न आहे. मनुस्मृती दहनाची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य आणि बौद्ध धर्माचा तूर्त अंगिकार न करणे, हे त्यांचे दोन्ही डावपेच दलित-ब्राह्मण युती घडविण्याशी जोडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दलित मतदारांचा बुद्धिभेद घडविण्यासाठी तर जाणीवपूर्वक मनुस्मृतीचा मुद्दा उकरून काढला जात नाही ना?