शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

आता करा चौकशी

By admin | Updated: October 28, 2015 21:29 IST

भाजपाचे विद्यमान खासदार आणि माजी केन्द्रीय गृहसचिव राजकुमार सिंह यांनी मध्यंतरी एक रहस्योद्घाटन केले आणि

भाजपाचे विद्यमान खासदार आणि माजी केन्द्रीय गृहसचिव राजकुमार सिंह यांनी मध्यंतरी एक रहस्योद्घाटन केले आणि या रहस्यामागचे रहस्य हुडकून काढण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली होती. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे या रहस्यामध्ये मुंबई पोलीस दलातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद कृतीचे रहस्य दडलेले होते. देशाला जवळजवळ दोन दशकांहून अधिक काळ ज्याची प्रतीक्षा आहे, त्या कुख्यात दाऊद इब्राहीमचा पाकिस्तानात घुसून खात्मा करण्याचा व त्यासाठी दाऊदचा कट्टर वैरी छोटा राजन याची मदत घेण्याचा एक गुप्त डाव म्हणे केन्द्र सरकारच्या पातळीवर रचला गेला होता. पण या डावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला आणि त्यातील काही अधिकाऱ्यांनी दाऊदला सावध केले व डाव फसला, असे हे सिंह महोदय म्हणाले होते. याबाबत आपणाकडे अधिकचा तपशील नाही हेही त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री करणार होते. अर्थात ते तेव्हां शक्यही नव्हते. पण आता या छोटा राजनला इंडोनेशियाच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर व त्याची भारतात पाठवणी करण्याची विनंती स्वीकारली जाण्याची शक्यता असल्याने ही चौकशी होऊ शकते. राजनला अटक झाल्यानंतर ज्या विविध कहाण्या प्रसृत केल्या जात आहेत, त्यातील एक कहाणी याच विषयाशी संबंधित आहे. ज्या दिवशी दाऊद आणि पाकिस्तानी क्रिकेटीअर जावेद मियाँदाद परस्परांचे व्याही होणार होते त्याच दिवशीच्या विवाह समारंभात दाऊदचा म्हणे काटा काढला जाणार होता. परंतु राजनच्या ज्या दोघा हस्तकांवर ती जबाबदारी सोपवली होती, त्यांना मुंबई पोलिसांनी मुंबईच्या विमानतळावरच ताब्यात घेतले, अशी कथा प्रसृत झाली आहे. कथेचे सार काढताना, सिंह यांनी हे सारे जाणीवपूर्वक केले गेले असे गृहीत धरले असावे. परिणामी यातील सत्यासत्यता पडताळून पाहाण्याचे जे तेव्हां फडणवीसांच्या मनात होते, ते आता शक्य होऊ शकते. परंतु ज्या पद्धतीने अमेरिकी माजी अध्यक्ष जॉर्ज बुश (धाकली पाती) यांनी ‘गुड तालीबान’ आणि ‘बॅड तालीबान’ अशी वर्गवारी केली होती तशीच भारतातही देशद्रोही गँगस्टर आणि देशप्रेमी गँगस्टर अशी काही तरी विभागणी केली जात असल्याचे जाणवते व छोटा राजनला यातील दुसऱ्या श्रेणीत धरले जाते. त्यामुळे या देशप्रेमीच्या चौकशीच्या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि मग अनायासेच मुंबई पोलीस दलातील कथित देशद्रोही तसेच मोकळे राहू शकतात. ह सारे पाहिल्यानंतर कोणे एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी काढलेल्या उद्गारांची आठवण होते. ‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’!