शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आता भाजपही वेगळा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:58 IST

सारे आयुष्य संघ व भाजपला शिव्या घालण्यात, मोदींना गुजराती म्हणण्यात आणि साऱ्या गुजरात्यांनी मुंबई सोडून चालते व्हावे असा सभ्य सल्ला त्यांना देणारे नारायण राणे यांना त्यांच्या पुत्र-पौत्रांसह आपल्या संघटनेत प्रवेश देणारा भारतीय जनता पक्ष आता कर्मठ राहिला नाही.

सारे आयुष्य संघ व भाजपला शिव्या घालण्यात, मोदींना गुजराती म्हणण्यात आणि साऱ्या गुजरात्यांनी मुंबई सोडून चालते व्हावे असा सभ्य सल्ला त्यांना देणारे नारायण राणे यांना त्यांच्या पुत्र-पौत्रांसह आपल्या संघटनेत प्रवेश देणारा भारतीय जनता पक्ष आता कर्मठ राहिला नाही. पौरोहित्याबाबतचे त्याचे सोवळेपणही आता तेवढेसे अस्पर्श राहिले नाही. महाराष्ट्राचे राज्यपालपद व कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद काँग्रेस पक्षाकडून मिळविण्यात यशस्वी झालेल्या एस. एम. कृष्णा (आता यांचे नावही फारसे कुणाच्या स्मरणात नाही) या सत्पुरुषाला मोदी आणि शहा यांच्यापुढे हात जोडून नम्रपणे उभे राहिलेले छायाचित्रात प्रथम पाहिले तेव्हाच भाजपच्या संस्कृतिकरणाकडून सामाजिकरणाकडे सुरू झालेल्या वाटचालीची झलक देशाला दिसली. नारायण राणे यांच्या प्रवेशाने तर हिंदू धर्माने ईश्वरभक्तीचा अधिकार श्रद्धावानांएवढाच अश्रद्धांना, भाविकांएवढाच अपराध्यांना आणि सावांएवढाच चोरांनाही दिला असल्याचा उदारपणा दाखविला आणि त्याचा प्रत्ययही समाजाला आणून दिला. आणि हो, ते नरेश अग्रवाल यांनी आतापर्यंत मायावतींचा बसप, मुलायमसिंगांचा सप, काँग्रेस आणि याखेरीज अनेक अन्य अनेक पक्षात राहण्याचा व त्यातील सत्तापदे मिळविण्याचा विक्रम केला त्यांनाही राण्यांसोबतच भाजपाने अत्यंत उदार अंत:करणाने आपल्या अंगणातच नव्हे तर दिवाणखान्यात आता प्रवेश दिला. या अग्रवालांनी मोदींना राक्षस म्हटले, त्यांच्या पक्षाला दानवांचा पक्ष म्हटले, जो देशभक्त पाकिस्तानच्या कैदेत यातना भोगतो त्या कुलभूषण जाधवला त्याने देशद्रोही व गुप्तहेर म्हटले शिवाय हिंदू दैवतांची नावे विदेशी मद्यांच्या नावात गुंफून केलेली कविताही त्याने संसदेला ऐकवली. त्यासाठी अरुण जेटलींनी त्याचे शब्द मागे घ्यायला त्याला भाग पाडले. आता तो इसम मोदींच्या आणि योगी आदित्यनाथाच्या मांडीला मांडी लावून पक्षात बसवून आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही पक्षनिष्ठेची प्रवचने ऐकवील. राण्यांच्या गाठीशीही अनेक पक्षांचा अनुभव आहे. ते शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये आले, पुढे बेघर झाले आणि आता अमित शहांच्या आज्ञेवरून त्यांनी स्वाभिमानी महाराष्ट्र पक्ष स्थापन केला. आता तो सारा पूर्वानुभव आणि त्यातील अहंकारांची सारी वस्त्रे उतरून भाजपच्या तिकिटावर ते राज्यसभेत विराजमान होत आहेत. खरे तर त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यायचे होते. पण त्या मंत्रिमंडळात शिवसेना आधीच बसली आहे आणि तिला राण्यांचा प्रवेशच काय पण वारासुद्धा चालणारा नाही. काँग्रेस सोडली आहे आणि भाजपात प्रवेश मिळत नाही अशा ‘घर का ना घाट का’ या अवस्थेत या मानी पुरुषाने आणि त्याच्या स्वाभिमानी पुत्रांनी तरी किती दिवस काढायचे असतात? शेवटी समाजाला येऊ लागलेली त्यांची कीव लक्षात घेऊनच बहुदा भाजपने त्यांना राज्यसभा देऊ केली. तसे करताना त्या पक्षाने देवेंद्र फडणवीसांसमोरील ‘सेना की राणे’ हा पेचही सोडवून घेतला आणि सेनेला असलेली राण्यांची धास्तीही दूर केली. राजकारण म्हणजे धर्मकारण नव्हे. ते त्याच्याच नियमांनी व सोयींनी करायचे असते. त्यात धर्म, न्याय, नीती वगैरेंसारखे मूल्ये आणायची नसतात. एकेकाळी हे काँग्रेसने केले. ‘जे आमच्यात येतात ते आपोआपच शुद्ध आणि पवित्र होतात’ असे माजी रेल्वेमंत्री जगजीवनराम एकदा म्हणाले. तेच सूत्र आता इतर पक्षांनी आत्मसात केले आहे. तरीही भाजपबद्दल इतरांना नसली तरी त्यातल्या काही संघनिष्ठांना त्याच्या पावित्र्याविषयीची आस्था होती. तो अजूनही ‘पार्टी विथ ए डिफरन्स’ आहे असे त्यांना वाटत होते. त्याविषयीचा आग्रहही ते धरत होते. पण भाजपएवढेच आता संघालाही राजकारण चांगले समजू लागले आहे. त्यात निष्ठा म्हणजे सत्तेची निष्ठा असते, सत्याची निष्ठा नसते हे त्यालाही समजले आहे. सबब एस. एम. कृष्णा आले, नरेश अग्रवाल आले आणि राणे सहकुटुंब सहपरिवाराने तरी त्याचे फारसे नवल तो परिवारही आता वाटून घेत नाही. कुणी सांगावे उद्या त्या पक्षात डावेही आलेले दिसतील. तसे ते त्रिपुरात आलेही आहेत. तात्पर्य, आता कोणत्याही पक्षाने दुसºयाला वैचारिक निष्ठा सांगण्याचे कारण उरले नाही.