शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

ही श्रद्धा नव्हे, हा द्वेषच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:05 IST

गुजरातच्या समुद्र किना-यावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा अडीचशे फूट उंचीचा भव्य पुतळा उभा करण्याचे मोदींनी ठरविल्यानंतर आता अयोध्येत प्रभू रामचंद्राचा

गुजरातच्या समुद्र किना-यावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा अडीचशे फूट उंचीचा भव्य पुतळा उभा करण्याचे मोदींनी ठरविल्यानंतर आता अयोध्येत प्रभू रामचंद्राचा तेवढाच मोठा पुतळा उभा करण्याची तयारी त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी चालविली आहे. पुतळे उभारण्याचे एक प्रयोजन त्या महापुरुषांविषयीची पूज्यबुद्धी व श्रद्धा जागविणे हे असले तरी त्याचे दुसरे व आताचे प्रयोजन राजकारण हे आहे. पटेल काय किंवा प्रभू रामचंद्र काय, त्यांची नावे व स्मृती साºया जनमानसाच्या मनावर कोरली आहेत. पण त्यांचे पुतळे लावण्याखेरीज पुढाºयांचे समाधान आताशा होत नाही. ते उभे करण्याखेरीज त्यांच्याकडे पुढारकीचे दुसरे मार्गही फारसे नसतात. त्याचमुळे नरेंद्र मोदींनी सरदारांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला व त्या राष्ट्रीय महापुरुषाचा तो विशालकाय पुतळा बनविण्याचे काम चीन या देशाला देऊन टाकले. योगी आदित्यनाथ लावणार असलेला रामचंद्राचा पुतळा आता भारतात होतो की रावणाच्या लंकेत ते आपण पहायचे आहे. जनसामान्यांचे लक्ष त्यांच्या दैनंदिन प्रश्नांवरून आणि राजकारणाच्या अपयशावरून दूर करण्यासाठी कधी युद्धे केली जातात तर कधी असे पुतळ््यांचे व उत्सवांचे आयोजन केले जाते. पुतळे वा उत्सव हे जोवर श्रद्धेचे भाग असतात तोवर त्यांचे पावित्र्य व शुचिता टिकत असते. जेव्हा ते राजकीय लाभासाठी वा सुडासाठी उभे केले जातात तेव्हा त्यातले पावित्र्यच नव्हे तर सौंदर्यही ओसरले असते. अलेक्झांडरने अथेन्स जिंकले तेव्हा त्या शहराच्या मध्यभागी आपल्या गुरूचा, अ‍ॅरिस्टॉटलचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. अ‍ॅरिस्टॉटलचे विद्यापीठ अथेन्समध्येच असल्याने त्या नगरातील लोकांना स्वाभाविकच तो त्यांचा अपमान वाटला. परिणामी तेव्हा हयात असलेले अ‍ॅरिस्टॉटलचा त्यांनी जो छळ केला त्याला कंटाळून त्याने हेमलॉक हे विष पिऊन वयाच्या ६० व्या वर्षी आत्महत्या केली. आदित्यनाथांचा राम असाच त्यांच्या पक्षाच्या विजयाची खूण म्हणून आणि समाजवादी पक्ष व त्याचे मुस्लीम मतदार यांच्या पराजयाचे चिन्ह म्हणून उभा होईल. हा प्रभू रामचंद्राविषयीची श्रद्धा जागविण्याचा प्रकार नसून अल्पसंख्यकांच्या श्रद्धा डिवचण्याचा प्रकार आहे. त्यातच या योग्याने परवा राज्याच्या पर्यटनस्थळाच्या यादीतून जगप्रसिद्ध ताजमहालचे नाव गाळण्याचा आचरटपणाही केला आहे. मोदींचे सरदारप्रेमही असेच. त्यांच्यावर गांधीजींनी न केलेला अन्याय, केलाच कसा होता हे दाखविण्यासाठी त्यांचा पुतळा आता ते उभा करीत आहेत. देशाच्या फाळणीसाठी गांधीजींना जबाबदार धरणाºया बेजबाबदार मनोवृत्तीच्या संघटनेचे ते प्रतिनिधित्व करतात. गांधी-नेहरू हे फाळणीला जबाबदार आणि सरदार तिला विरोध करणारे असे त्यांचे खोटे मानसचित्र असते. वास्तव हे की पटेल आणि नेहरू हे अखेरच्या क्षणी नाईलाज म्हणून फाळणीला राजी झाले आणि गांधी त्यांच्या त्या निर्णयापासून दूर राहिले होते. मात्र नव्या पिढ्यांना हा इतिहास ठाऊक नसल्याच्या वास्तवाचा फायदा घेऊ इच्छिणाºयांना त्या पिढ्यांच्या मनावर खोटा इतिहास बिंबवता येणे जमणारे आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूची एवढ्या वर्षांनंतर पुन्हा चौकशी करण्याचा केंद्र सरकारचा खटाटोपही अशाच प्रयत्नात बसणारा आहे. मोदी आणि योगी यांच्या या प्रयत्नांकडे अशा दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्यांच्या पुतळ््यांविषयीच्या भावनेत श्रद्धा कमी आणि सूड अधिक आहे. देशकारण कमी आणि राजकारण अधिक आहे. शिवाय त्यात सर्वधर्मसमभावाहून परधर्मद्वेषाची तीव्रताही अधिक आहे. समाजाचे दुहीकरण करण्याच्या या प्रयत्नांबाबत देश व जनतेने जास्तीची सावधानता व डोळसपण स्वीकारणे गरजेचे आहे.