शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मन की नही, जन की बात करो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 04:40 IST

स्वातंत्र्याचा आज साजरा होणारा ७२ वा वाढदिवस हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कारकिर्दीतील अखेरचा स्वातंत्र्यदिन असेल. त्यातील भाषणासाठी त्यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. हे भाषण येती निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच होईल यात शंका नाही.

स्वातंत्र्याचा आज साजरा होणारा ७२ वा वाढदिवस हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कारकिर्दीतील अखेरचा स्वातंत्र्यदिन असेल. त्यातील भाषणासाठी त्यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. हे भाषण येती निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच होईल यात शंका नाही. त्यात नव्या आश्वासनांची खैरात राहील आणि जुन्या आश्वासनांच्या पूर्ततेची हमी असेल. भाषण व आश्वासन ही मोदींची नित्याची बलस्थाने व कमजोरी राहिली आहे. परिणामांची काळजी न करता आश्वासने देण्याची त्यांची खासियत आता सर्वज्ञात झाली आहे. गेल्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाला १५ लक्ष रुपये देण्याचे त्यांचे आश्वासन अजून हवेत आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल हा त्यांचा विश्वास अजून खरा व्हायचा आहे. देशाची शेजारी राष्ट्रांशी आता मैत्री राहिली नाही. नेपाळ, म्यानमार, श्रीलंका व मॉरिशस हे देशही पाकिस्तानसोबत चीनच्या गोटात गेले आणि चीनने लद्दाखमध्ये ताजे आक्रमण केले आहे. चीनशी बोलणी होतात, हास्यविनोदांची देवाणघेवाण होते मात्र प्रत्यक्षात त्या स्नेहबोलीचा परिणाम कुठे दिसत नाही. देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचे सांगितले जात असतानाच रुपयाची किंमत कमी होऊन एका डॉलरला आता ७० रुपये मोजावे लागत आहेत. महागाई वाढली आणि कमी उत्पन्न असणाऱ्यांचे जीवन असह्य झाले. बँका बुडाल्या आणि त्या बुडविणारे सरकारच्या मदतीने विदेशात स्थायिक झालेत. अंबानी व अदानी सारखे एक-दोन उद्योगपती सोडता इतरांचे उद्योगही गतिशील झाल्याचे दिसले नाही. किंगफिशर एअरलाईन आकाशात हरविली, एअर इंडिया जमीनदोस्त झाली तर जेट एअर जमिनीवर उतरण्याच्या तयारीला लागले. याहून गंभीर बाब ही की देशाची ७९ टक्के संपत्ती एक टक्का लोकांच्या हाती तर उरलेल्यांना २१ टक्क्यात समाधान मानावे लागते. सरकार स्थिर राहिले, त्याची भीतीही माध्यमांसकट सर्वत्र राहिली, टीका करणाºया माध्यमांची गळचेपी झाली व ती करणाºयांना घरी बसविण्याचे राजकारण झाले. विचारवंतांच्या हत्या झाल्या आणि अल्पसंख्य व दलितांच्या वाट्याला ‘लिंचिंग’ हे नवेच प्रकरण आले. मुली व स्त्रियांची असुरक्षितता वाढली आणि त्यांची सुरक्षा केंद्रे त्यांच्या शोषणाची केंद्रे बनली. मात्र या साºया अपयशांची चिंता मोदींनी करण्याचे कारण नाही. त्यांचा पक्ष वारकºयांच्या श्रद्धेने त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना संघाचे भगवे वरदान आहे. त्याला बळकटी द्यायला पुन्हा राम मंदिराच्या उभारणीचे राजकारण आहे. त्यांचे प्रचारतंत्र परिणामकारक तर विरोधक एकत्र येण्याची भाषा बोलत असले तरी एकमेकांजवळ येताना न दिसणारे आहेत. काँग्रेसखेरीज बाकीचे विरोधक प्रादेशिक पातळीवरचे आहेत आणि त्यांनी कधीकाळी काँग्रेसशी वैरही केले आहे. राहुल गांधींचा अपवाद वगळता मोदींना थेट आव्हान देणारा दुसरा नेता देशात नाही आणि राहुल गांधींवर सोडायला मोदींजवळ प्रचारकांची मोठी फौज तयार आहे. शिवाय धनवंत सोबत आहेत आणि माध्यमे वळचणीला आली आहेत. उद्योग, अर्थ, परराष्ट्र व्यवहार आणि सामाजिक सुरक्षा या साºया क्षेत्रातील माघारीवर पांघरूण घालता यावे एवढा मोठा धर्मग्रस्तांचा जमावही त्यांच्या सोबत आहे. सबब चिंतेचे कारण नाही. ते जे बोलतील त्यातील खºया खोट्याचा विचार करण्याचे तारतम्य आतासारखे शिल्लक राहिले नाही. म्हणून बोला, नवी आश्वासने द्या, त्यात मेट्रो आणा, बुलेट ट्रेन्स आणा, अगदी त्यात अवकाशयाने आणायलाही हरकत नाही. झालेच तर जगाचे राजकीय नसले तरी यौगिक व आध्यात्मिक नेतृत्व करण्याची भाषा आणा. रुपया डॉलरच्या पातळीवर नेण्याची भाषाही त्यात येणे अडचणीचे नाही. कारण तशीही सरकारी बोली फारशा गांभीर्याने घेणे हे लोकांनीही आता सोडले आहे. तरीही जाता जाता एक सूचना येथे केली पाहिजे. ‘मोदीजी, यापुढे मन की बात सोडा व जन की बात करा’.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnewsबातम्या