शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहर का सिर्फ नाम नही, सुरत बदलनी चाहिए !

By नंदकिशोर पाटील | Updated: February 26, 2023 07:10 IST

जी-२० परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय पाहुणे ‘आम्ही औरंगाबादला जातोय,’ म्हणून निघाले असतील. आता जाताना ते छत्रपती संभाजीनगरातून जातील! हेही एक नवलच!!

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर

इतिहास बदलता येत नसेल तर इतिहासाच्या पाऊलखुणा मिटवून टाका, असे म्हटले जाते. सांस्कृतिक राष्ट्रवादाने प्रेरित झालेली माणसं याबाबत अग्रेसर असतात. प्रतिकं, प्रतिमा आणि पुतळे या सांस्कृतिक बदलांचे लक्ष्य असते. यात आता शहरांच्या नावांचा समावेश झाला आहे. शहरांची नावे बदलण्याचा इतिहास मोठा आहे. त्याचे मूळ ग्रीक संस्कृतीत आढळते. अथेन्स हे ग्रीकच्या राजधानीचे शहर. सुमारे साडेतीन हजार वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेले अथेन्स हे जगातील अतिप्राचीन शहर आहे. राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिकतेचा प्रदीर्घ असा वारसा लाभलेल्या या शहराच्या अथेन्स नावामागे एक रोचक दंतकथा आहे. अथेन्सचे नाव अथेना नावाच्या देवीवरून पडले, असे मानले जाते. अथेना व पोसायडन या दोघांनी या शहराला आपले नाव देण्यात यावे, अशी विनंती केली. त्यासाठी स्पर्धा झाली. पोसायडनने आपल्या त्रिशूलाने जमिनीवर आघात करून एक खाऱ्या पाण्याचा झरा निर्माण केला तर अथेनाने शांती व समृद्धीचे प्रतीक असलेले ऑलिव्हचे झाड निर्माण केले. अथेन्सच्या नागरिकांनी ऑलिव्हचे झाड स्वीकारले व शहराला अथेनाचे नाव दिले. तेच हे अथेन्स! परंतु आज हे शहर देवीच्या नव्हे तर सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉॅटल अशा सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ आणि गणित तज्ज्ञांमुळे जगभर ओळखले जाते. या तत्त्वज्ञांनी आधुनिक काळातील संपूर्ण मानवजातीचे विचारविश्व समृद्ध केले. नंतरच्या काळात अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत आणि खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाच्या अमीट अशा पाऊलखुणा उमटवल्या आहेत. सोळाव्या शतकापासून वसाहतवादास प्रारंभ झाल्यानंतर नव्या राज्यकर्त्यांनी इतिहासावर आपली मोहोर उमटावी, आपल्या नावाची स्मृतिशेष राहावी म्हणून शहरांची, गावांची नावे बदलली. या बदलामागे धार्मिक आणि सांस्कृतिक अजेंडा होताच. यास ब्रिटिशही अपवाद नव्हते. वसाहतवादी ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारातील, सैन्यातील आणि राजघराण्यातील व्यक्तींची नावे दिलीच. शिवाय, चर्चेस आणि धर्मगुरूंची नावे देण्यातही धन्यता मानली. तेव्हा शहराच्या नामांतरामागे हेतू असतोच.

आपल्याकडेही नामांतराचा इतिहास मोठा आहे; पण गेल्या पाच-सहा वर्षांत शहरांची नावे बदलण्याची गती वाढली आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यात आघाडीवर आहेत. नुकतेच त्यांनी अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैजाबादचे नाव अयोध्या करून घेतले आहे. यूपीतील आणखी २५ शहरं नामांतराच्या प्रतीक्षेत आहेत म्हणतात !

नुकतेच महाराष्ट्रातील औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी आणि विद्यमान शिवसेना-भाजप अशा दोन्ही सरकारांची यास मान्यता होती. महाविकास आघाडी सरकार पायउतार होताना झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अशाप्रकारची सर्वसहमती हाही एक दुर्मीळ योग! प्रश्न एवढाच आहे की, केवळ शहरांची नावे बदलून भागणार नाही. त्या शहरांची सुरत बदलली पाहिजे. शिवाय, आंतरराष्ट्रीय जी-२० परिषदेत दोन दिवसांवर असताना औरंगाबादचे नामांतर करण्याची घाई का केली? या परिषदेच्या निमित्ताने शहरात येणारे आंतरराष्ट्रीय पाहुणे ‘आम्ही औरंगाबादला जातोय,’ म्हणून निघाले असतील. आता जाताना ते छत्रपती संभाजीनगरातून जातील! हेही एक नवलच!!

यांनीही केले नामांतरकेवळ भाजपशासित राज्यांतच शहरांचे नामांतर होते असे नाही. कलकत्ताचे कोलकाता, आंध्र प्रदेशमधील राजामुंदरी जिल्ह्याचे राजामहेंद्रवरम, केरळच्या एरिक्कोडला एरिकोड, हरयाणातील गुरगांवचे गुरुग्राम, म्हैसूरचे म्हैसुरु, मंगलोरचे मंगळुरू, बंगलोरचे बेंगळुरू, मद्रासचे चेन्नई, पाँडिचेरीचे पुडुचेरी, ओरिसाचे ओडिशा अशा बिगरभाजपशासित राज्यांची नावेही याआधी बदलण्यात आली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबाद