शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

शहर का सिर्फ नाम नही, सुरत बदलनी चाहिए !

By नंदकिशोर पाटील | Updated: February 26, 2023 07:10 IST

जी-२० परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय पाहुणे ‘आम्ही औरंगाबादला जातोय,’ म्हणून निघाले असतील. आता जाताना ते छत्रपती संभाजीनगरातून जातील! हेही एक नवलच!!

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर

इतिहास बदलता येत नसेल तर इतिहासाच्या पाऊलखुणा मिटवून टाका, असे म्हटले जाते. सांस्कृतिक राष्ट्रवादाने प्रेरित झालेली माणसं याबाबत अग्रेसर असतात. प्रतिकं, प्रतिमा आणि पुतळे या सांस्कृतिक बदलांचे लक्ष्य असते. यात आता शहरांच्या नावांचा समावेश झाला आहे. शहरांची नावे बदलण्याचा इतिहास मोठा आहे. त्याचे मूळ ग्रीक संस्कृतीत आढळते. अथेन्स हे ग्रीकच्या राजधानीचे शहर. सुमारे साडेतीन हजार वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेले अथेन्स हे जगातील अतिप्राचीन शहर आहे. राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिकतेचा प्रदीर्घ असा वारसा लाभलेल्या या शहराच्या अथेन्स नावामागे एक रोचक दंतकथा आहे. अथेन्सचे नाव अथेना नावाच्या देवीवरून पडले, असे मानले जाते. अथेना व पोसायडन या दोघांनी या शहराला आपले नाव देण्यात यावे, अशी विनंती केली. त्यासाठी स्पर्धा झाली. पोसायडनने आपल्या त्रिशूलाने जमिनीवर आघात करून एक खाऱ्या पाण्याचा झरा निर्माण केला तर अथेनाने शांती व समृद्धीचे प्रतीक असलेले ऑलिव्हचे झाड निर्माण केले. अथेन्सच्या नागरिकांनी ऑलिव्हचे झाड स्वीकारले व शहराला अथेनाचे नाव दिले. तेच हे अथेन्स! परंतु आज हे शहर देवीच्या नव्हे तर सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉॅटल अशा सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ आणि गणित तज्ज्ञांमुळे जगभर ओळखले जाते. या तत्त्वज्ञांनी आधुनिक काळातील संपूर्ण मानवजातीचे विचारविश्व समृद्ध केले. नंतरच्या काळात अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत आणि खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाच्या अमीट अशा पाऊलखुणा उमटवल्या आहेत. सोळाव्या शतकापासून वसाहतवादास प्रारंभ झाल्यानंतर नव्या राज्यकर्त्यांनी इतिहासावर आपली मोहोर उमटावी, आपल्या नावाची स्मृतिशेष राहावी म्हणून शहरांची, गावांची नावे बदलली. या बदलामागे धार्मिक आणि सांस्कृतिक अजेंडा होताच. यास ब्रिटिशही अपवाद नव्हते. वसाहतवादी ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारातील, सैन्यातील आणि राजघराण्यातील व्यक्तींची नावे दिलीच. शिवाय, चर्चेस आणि धर्मगुरूंची नावे देण्यातही धन्यता मानली. तेव्हा शहराच्या नामांतरामागे हेतू असतोच.

आपल्याकडेही नामांतराचा इतिहास मोठा आहे; पण गेल्या पाच-सहा वर्षांत शहरांची नावे बदलण्याची गती वाढली आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यात आघाडीवर आहेत. नुकतेच त्यांनी अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैजाबादचे नाव अयोध्या करून घेतले आहे. यूपीतील आणखी २५ शहरं नामांतराच्या प्रतीक्षेत आहेत म्हणतात !

नुकतेच महाराष्ट्रातील औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी आणि विद्यमान शिवसेना-भाजप अशा दोन्ही सरकारांची यास मान्यता होती. महाविकास आघाडी सरकार पायउतार होताना झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अशाप्रकारची सर्वसहमती हाही एक दुर्मीळ योग! प्रश्न एवढाच आहे की, केवळ शहरांची नावे बदलून भागणार नाही. त्या शहरांची सुरत बदलली पाहिजे. शिवाय, आंतरराष्ट्रीय जी-२० परिषदेत दोन दिवसांवर असताना औरंगाबादचे नामांतर करण्याची घाई का केली? या परिषदेच्या निमित्ताने शहरात येणारे आंतरराष्ट्रीय पाहुणे ‘आम्ही औरंगाबादला जातोय,’ म्हणून निघाले असतील. आता जाताना ते छत्रपती संभाजीनगरातून जातील! हेही एक नवलच!!

यांनीही केले नामांतरकेवळ भाजपशासित राज्यांतच शहरांचे नामांतर होते असे नाही. कलकत्ताचे कोलकाता, आंध्र प्रदेशमधील राजामुंदरी जिल्ह्याचे राजामहेंद्रवरम, केरळच्या एरिक्कोडला एरिकोड, हरयाणातील गुरगांवचे गुरुग्राम, म्हैसूरचे म्हैसुरु, मंगलोरचे मंगळुरू, बंगलोरचे बेंगळुरू, मद्रासचे चेन्नई, पाँडिचेरीचे पुडुचेरी, ओरिसाचे ओडिशा अशा बिगरभाजपशासित राज्यांची नावेही याआधी बदलण्यात आली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबाद