शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

नसत्या बाता पुरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:49 IST

माझगाव गोदीत बांधलेली भारतीय बनावटीची आयएनएस कलवरी ही अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. हिंदी महासागरात आढळणाºया विक्राळ अशा ‘टायगर शार्क’ माशावरून या पाणबुडीला ‘कलवरी’ हे नाव देण्यात आले.

माझगाव गोदीत बांधलेली भारतीय बनावटीची आयएनएस कलवरी ही अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. हिंदी महासागरात आढळणाºया विक्राळ अशा ‘टायगर शार्क’ माशावरून या पाणबुडीला ‘कलवरी’ हे नाव देण्यात आले. नावाप्रमाणे घातक क्षमता असणाºया कलवरीमुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत वाढ झाली यात शंका नाही. आयएनएस कलवरी म्हणजे ‘मेक इन इंडिया’चे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुळात २००५ साली भारत आणि फ्रान्सदरम्यान याबाबत अब्जावधींचा करार झाला. त्यानुसार माझगाव गोदीत स्कॉर्पियन श्रेणीतील अत्याधुनिक सहा पाणबुड्या बांधण्याचे नक्की करण्यात आले. २०१३ साली पहिली पाणबुडी दाखल होणे अपेक्षित असताना त्याला चार वर्षांचा विलंब झाला. २००० साली दाखल झालेली ‘सिंधुराष्ट्र’ विचारात घेतल्यास तब्बल १७ वर्षांच्या खंडानंतर एखादी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. नौदलातील वरिष्ठ अधिकाºयांनी, सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी वेळोवेळी या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली होती. स्कॉर्पियनच्या गोपनीय माहितीची गळती किंवा पाणतीरांची कमतरता असले कोणतेही कारण या विलंबामागे नव्हते. तरीही विलंब झालाच. मेक इन इंडियाचे ढोल पिटणाºयांच्या कार्यकाळातही निर्मितीतील विलंबाला चाप बसत नसेल तर हे नेमके कशाचे उत्कृष्ट उदाहरण याचे उत्तर प्रधानमंत्र्यांनी द्यायला हवे होते. प्रदेशातील सर्वांचा विकास आणि सुरक्षेसाठी कलवरी आहे, असे प्रधानमंत्र्यांनी अभिमानाने सांगितले. परंतु, त्याने उर्वरित पाणबुड्या तरी वेळेत मिळतील का, याचे उत्तर मिळत नाही. २०२१पर्यंत उर्वरित पाचही पाणबुड्या ताफ्यात येणे अपेक्षित आहे. आजघडीला चीनकडे ५६ पाणबुड्या आहेत. यातील पाच पाणबुड्या आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. तर, पाकिस्तानकडे सध्या पाच पाणबुड्या असून चीन त्यांना आणखी आठ पाणबुड्या देणार आहे. दोन वर्षांत चीनमध्ये पाणबुडीची निर्मिती होते तर भारताला एक दशकांचा कालावधीही अपुरा पडतो. त्यातही असे काही बांधायचे का? याचा निर्णय घ्यायलाही आमच्या धोरणकर्त्यांना तितकाच कालावधी लागतो हे कटुसत्य मान्य करावे लागेल. भारतीय नौदलाचे स्वरूप बदलत आहे. बदलती राजकीय समीकरणे आणि भौगोलिक परिस्थितीचा भारतीय नौदलाला सामना करावा लागत आहे. त्यासाठी नौदलाने आपल्या धोरणांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी आवश्यक शस्त्रास्त्र आणि सामग्रीचा कालबद्ध पुरवठा अबाधित राहील, याची काळजी सत्ताधाºयांना घ्यावी लागणार आहे. केवळ मेक इन इंडियाचे लेबल चिकटवून ते होणार नाही.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल