शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

नसत्या बाता पुरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:49 IST

माझगाव गोदीत बांधलेली भारतीय बनावटीची आयएनएस कलवरी ही अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. हिंदी महासागरात आढळणाºया विक्राळ अशा ‘टायगर शार्क’ माशावरून या पाणबुडीला ‘कलवरी’ हे नाव देण्यात आले.

माझगाव गोदीत बांधलेली भारतीय बनावटीची आयएनएस कलवरी ही अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. हिंदी महासागरात आढळणाºया विक्राळ अशा ‘टायगर शार्क’ माशावरून या पाणबुडीला ‘कलवरी’ हे नाव देण्यात आले. नावाप्रमाणे घातक क्षमता असणाºया कलवरीमुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत वाढ झाली यात शंका नाही. आयएनएस कलवरी म्हणजे ‘मेक इन इंडिया’चे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुळात २००५ साली भारत आणि फ्रान्सदरम्यान याबाबत अब्जावधींचा करार झाला. त्यानुसार माझगाव गोदीत स्कॉर्पियन श्रेणीतील अत्याधुनिक सहा पाणबुड्या बांधण्याचे नक्की करण्यात आले. २०१३ साली पहिली पाणबुडी दाखल होणे अपेक्षित असताना त्याला चार वर्षांचा विलंब झाला. २००० साली दाखल झालेली ‘सिंधुराष्ट्र’ विचारात घेतल्यास तब्बल १७ वर्षांच्या खंडानंतर एखादी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. नौदलातील वरिष्ठ अधिकाºयांनी, सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी वेळोवेळी या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली होती. स्कॉर्पियनच्या गोपनीय माहितीची गळती किंवा पाणतीरांची कमतरता असले कोणतेही कारण या विलंबामागे नव्हते. तरीही विलंब झालाच. मेक इन इंडियाचे ढोल पिटणाºयांच्या कार्यकाळातही निर्मितीतील विलंबाला चाप बसत नसेल तर हे नेमके कशाचे उत्कृष्ट उदाहरण याचे उत्तर प्रधानमंत्र्यांनी द्यायला हवे होते. प्रदेशातील सर्वांचा विकास आणि सुरक्षेसाठी कलवरी आहे, असे प्रधानमंत्र्यांनी अभिमानाने सांगितले. परंतु, त्याने उर्वरित पाणबुड्या तरी वेळेत मिळतील का, याचे उत्तर मिळत नाही. २०२१पर्यंत उर्वरित पाचही पाणबुड्या ताफ्यात येणे अपेक्षित आहे. आजघडीला चीनकडे ५६ पाणबुड्या आहेत. यातील पाच पाणबुड्या आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. तर, पाकिस्तानकडे सध्या पाच पाणबुड्या असून चीन त्यांना आणखी आठ पाणबुड्या देणार आहे. दोन वर्षांत चीनमध्ये पाणबुडीची निर्मिती होते तर भारताला एक दशकांचा कालावधीही अपुरा पडतो. त्यातही असे काही बांधायचे का? याचा निर्णय घ्यायलाही आमच्या धोरणकर्त्यांना तितकाच कालावधी लागतो हे कटुसत्य मान्य करावे लागेल. भारतीय नौदलाचे स्वरूप बदलत आहे. बदलती राजकीय समीकरणे आणि भौगोलिक परिस्थितीचा भारतीय नौदलाला सामना करावा लागत आहे. त्यासाठी नौदलाने आपल्या धोरणांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी आवश्यक शस्त्रास्त्र आणि सामग्रीचा कालबद्ध पुरवठा अबाधित राहील, याची काळजी सत्ताधाºयांना घ्यावी लागणार आहे. केवळ मेक इन इंडियाचे लेबल चिकटवून ते होणार नाही.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल