शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

बिहार नव्हे... साताराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:26 IST

‘खादीची दहशत’ कितीही मोठी असली तरी लोकशाहीत ‘खाकीचा दरारा’ही महत्त्वाचा असतो.

- वसंत भोसलेसातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते. इथल्या ‘शिव घराण्या’बद्दल प्रत्येक मराठी मनाला नक्कीच अभिमान. इथल्या वारसदारांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्राची नवी पिढी अनुकरणात रमलेली; मात्र गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा धक्का बहुतांश मंडळींना बसलाय. एका किरकोळ टोल नाक्यावरून दोन दिग्गज राजे एकमेकांना भिडावेत. कैक गाड्या फोडल्या जाव्यात. हवेत गोळीबार व्हावा.. यावर राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वासच बसेनासा झालाय. विशेष म्हणजे, या धुमश्चक्रीत एक पोलीस अधिकारीही सापडावा. तोही जखमी व्हावा, हे किती दुर्दैवी?खरे तर, लोकांच्या दृष्टीने ‘टोल नाका’ ही अत्यंत साधी गोष्ट असली तरी राजकीय नेत्यांच्या दृष्टीने कोट्यवधी रुपयांची अंडी देणारी चक्क कोंबडीच. बिचाºया जनतेच्या टोलवर गोळा होणारा पैसा म्हणजे राजकारणात कार्यकर्ते पोसण्यासाठी जणू परवलीचा शब्द बनलाय. आपली बाजू घेऊन राजकीय नेत्यांनी हे ‘आधुनिक लुटारू नाके’ बंद करायला हवेत, या भ्रामक स्वप्नात बिचारी जनता रंगलेली. मात्र याच पार्श्वभूमीवर दोन बडे लोकप्रतिनिधी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात, तेव्हा जनतेचे उघडतात खाडऽऽकन डोळे. साताºयात तर हे दोन बडे नेते केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर तरुण पिढीच्या मनावर राज्य करणारे ‘राजे’. त्यामुळेच गुरुवारच्या घटनेतून सातारकर अद्याप सावरले नसल्याचे स्पष्टपणे जाणवू लागलेय.सातारा जिल्ह्यात काहीही घडले तरी त्याचा ताण तत्काळ प्रशासनावर येतो. रात्री उदयनराजे आनेवाडी टोलनाक्यावर तळ ठोकून होते, तेव्हा साताºयातून शिवेंद्रसिंहराजे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नाक्याकडेच निघाले. या ठिकाणी दोन्ही राजे आपल्या समर्थकांसह आमनेसामने आले असते तर कदाचित अनुचित प्रकार घडू शकला असता, हे ओळखून खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातून शिवेंद्रसिंहराजे यांना नाक्याकडे जाण्यासाठी परावृत्त केले गेले. शेकडो पोलिसांचा फौजफाटा असतानाही एका साध्या टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलले जाऊ शकत नाही, म्हणून दुसºया लोकप्रतिनिधीने आपल्या समर्थकांची ताकद त्या ठिकाणी लावावी... ही घटना कदाचित इतरांच्या दृष्टीने ‘बिहार’सारखी असावी.साता-यात अधूनमधून घडणा-या विचित्र प्रसंगांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाहेरची मंडळी स्पष्टपणे विचारतात की, ‘हा सातारा आहे की बिहार?’ अशा वेळी इथल्या जाज्वल्य इतिहासाचे अन् नयनरम्य निसर्गाचे कौतुक करण्यासाठी सातारकर मंडळी पुढे सरसावतात. मात्र गुरुवारच्या घटनेमुळे परजिल्ह्यातील नागरिकांच्या खोचक प्रश्नाला आपसूकच बळ मिळालेय.असो. ‘सातारा हा सातारा आहे, बिहार नाही !’ हे सिद्ध करण्याची नैतिक जबाबदारी आता पोलीस खात्यावर येऊन पडलीय. ‘खादीची दहशत’ कितीही मोठी असली तरी लोकशाहीत ‘खाकीचा दरारा’ही कसा महत्त्वाचा असतो, हे जगाला दाखवून देण्याची वेळ पुन्हा एकदा प्रशासनावर आलीय. दोन्ही राजेंवर ३०७ कलम लावून पोलिसांनीही आपल्या कणखर भूमिकेची चुणूक दाखविलीय. कारण ही खादी ‘स्टंटबाज’ आहे की ‘कर्तव्यतत्पर’ हे दाखविण्याची हीच योग्य वेळ होती.

टॅग्स :PoliceपोलिसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले