शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

बिहार नव्हे... साताराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:26 IST

‘खादीची दहशत’ कितीही मोठी असली तरी लोकशाहीत ‘खाकीचा दरारा’ही महत्त्वाचा असतो.

- वसंत भोसलेसातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते. इथल्या ‘शिव घराण्या’बद्दल प्रत्येक मराठी मनाला नक्कीच अभिमान. इथल्या वारसदारांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्राची नवी पिढी अनुकरणात रमलेली; मात्र गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा धक्का बहुतांश मंडळींना बसलाय. एका किरकोळ टोल नाक्यावरून दोन दिग्गज राजे एकमेकांना भिडावेत. कैक गाड्या फोडल्या जाव्यात. हवेत गोळीबार व्हावा.. यावर राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वासच बसेनासा झालाय. विशेष म्हणजे, या धुमश्चक्रीत एक पोलीस अधिकारीही सापडावा. तोही जखमी व्हावा, हे किती दुर्दैवी?खरे तर, लोकांच्या दृष्टीने ‘टोल नाका’ ही अत्यंत साधी गोष्ट असली तरी राजकीय नेत्यांच्या दृष्टीने कोट्यवधी रुपयांची अंडी देणारी चक्क कोंबडीच. बिचाºया जनतेच्या टोलवर गोळा होणारा पैसा म्हणजे राजकारणात कार्यकर्ते पोसण्यासाठी जणू परवलीचा शब्द बनलाय. आपली बाजू घेऊन राजकीय नेत्यांनी हे ‘आधुनिक लुटारू नाके’ बंद करायला हवेत, या भ्रामक स्वप्नात बिचारी जनता रंगलेली. मात्र याच पार्श्वभूमीवर दोन बडे लोकप्रतिनिधी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात, तेव्हा जनतेचे उघडतात खाडऽऽकन डोळे. साताºयात तर हे दोन बडे नेते केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर तरुण पिढीच्या मनावर राज्य करणारे ‘राजे’. त्यामुळेच गुरुवारच्या घटनेतून सातारकर अद्याप सावरले नसल्याचे स्पष्टपणे जाणवू लागलेय.सातारा जिल्ह्यात काहीही घडले तरी त्याचा ताण तत्काळ प्रशासनावर येतो. रात्री उदयनराजे आनेवाडी टोलनाक्यावर तळ ठोकून होते, तेव्हा साताºयातून शिवेंद्रसिंहराजे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नाक्याकडेच निघाले. या ठिकाणी दोन्ही राजे आपल्या समर्थकांसह आमनेसामने आले असते तर कदाचित अनुचित प्रकार घडू शकला असता, हे ओळखून खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातून शिवेंद्रसिंहराजे यांना नाक्याकडे जाण्यासाठी परावृत्त केले गेले. शेकडो पोलिसांचा फौजफाटा असतानाही एका साध्या टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलले जाऊ शकत नाही, म्हणून दुसºया लोकप्रतिनिधीने आपल्या समर्थकांची ताकद त्या ठिकाणी लावावी... ही घटना कदाचित इतरांच्या दृष्टीने ‘बिहार’सारखी असावी.साता-यात अधूनमधून घडणा-या विचित्र प्रसंगांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाहेरची मंडळी स्पष्टपणे विचारतात की, ‘हा सातारा आहे की बिहार?’ अशा वेळी इथल्या जाज्वल्य इतिहासाचे अन् नयनरम्य निसर्गाचे कौतुक करण्यासाठी सातारकर मंडळी पुढे सरसावतात. मात्र गुरुवारच्या घटनेमुळे परजिल्ह्यातील नागरिकांच्या खोचक प्रश्नाला आपसूकच बळ मिळालेय.असो. ‘सातारा हा सातारा आहे, बिहार नाही !’ हे सिद्ध करण्याची नैतिक जबाबदारी आता पोलीस खात्यावर येऊन पडलीय. ‘खादीची दहशत’ कितीही मोठी असली तरी लोकशाहीत ‘खाकीचा दरारा’ही कसा महत्त्वाचा असतो, हे जगाला दाखवून देण्याची वेळ पुन्हा एकदा प्रशासनावर आलीय. दोन्ही राजेंवर ३०७ कलम लावून पोलिसांनीही आपल्या कणखर भूमिकेची चुणूक दाखविलीय. कारण ही खादी ‘स्टंटबाज’ आहे की ‘कर्तव्यतत्पर’ हे दाखविण्याची हीच योग्य वेळ होती.

टॅग्स :PoliceपोलिसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले