शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सूट नको, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेतच वाढ हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:23 IST

Income Tax: प्राप्तिकरात ‘सूट’ देण्याची तरतूद रद्द करून प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादाच सर्वांसाठी किमान १० लाख रुपये करणे आवश्यक आहे.

- ॲड. कांतीलाल तातेड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेला सादर करणार आहेत. प्राप्तिकरदात्यांच्या त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करा ही त्यातील प्रमुख मागणी आहे. ज्यांची आर्थिक क्षमता जास्त आहे, त्यांच्याकडून प्राप्तिकर वसूल करणे व ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांना त्यातून वगळणे हा प्राप्तिकर कायद्याचा मूलभूत पाया आहे. 

करदात्यांची आर्थिक क्षमता निश्चित करताना सरकारने करदात्यांचे वास्तव उत्पन्न लक्षात घेणे आवश्यक असते. त्यामुळे प्रचंड वेगाने वाढणाऱ्या महागाईमुळे घटणाऱ्या वास्तव उत्पन्नाचे प्रमाण लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वेळोवेळी वाढ करणे आवश्यक असते; परंतु गेल्या ११ वर्षांत महागाईमध्ये प्रचंड वाढ झालेली असतानादेखील सरकारने प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ न करता जुन्या करप्रणालीच्या बाबतीत ती २.५० लाख रुपयांवरच गोठविलेली आहे. नव्या करप्रणालीत अतिज्येष्ठ प्राप्तिकरदात्यांची प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा प्रत्यक्षात दोन लाख रुपयांनी कमी केली असून, आता सर्व प्राप्तिकरदात्यांसाठी ती मर्यादा तीन लाख रुपये केलेली आहे.

प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत आवश्यक ती वाढ न करण्याची सरकारची कृती घटनेच्या उपोद्घातात नमूद सर्वांना ‘आर्थिक न्याय’ देण्याच्या उद्देशाशी तसेच प्राप्तिकर कायद्याच्या मूलभूत तत्त्वाशी सुसंगत आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

प्रत्यक्ष कर संहितेची छाननी करणाऱ्या तत्कालीन भाजप नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने दि. ९ मार्च, २०१२ रोजी लोकसभेला सादर केलेल्या अहवालात प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये करावी, अशी शिफारस २०१०-११ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीच्या आधारे केली होती. तसेच माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील विरोधी पक्षनेते म्हणून प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये करण्याची मागणी केली होती. १०३व्या घटनादुरुस्तीनुसार आठ लाख रुपयांपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न असणाऱ्यांना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ ठरविण्यात आलेले आहे.

परंतु अशा ‘दुर्बल व्यक्तीं’कडूनही प्राप्तिकराच्या दोन्ही करप्रणालीमध्ये इतर प्राप्तिकरदात्यांप्रमाणेच प्राप्तिकर वसूल केला जातो. वास्तविक प्राप्तिकर हा सधन व्यक्तींकडूनच वसूल करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराने करावयाच्या खर्चाची कमाल मर्यादा एप्रिल १९९६ पूर्वी साडेचार लाख रुपये होती. महागाईमुळे सरकारने ती मर्यादा ९५ लाख रुपये केली. ओबीसी आरक्षणासाठी ‘क्रिमी लेअर’च्या उत्पन्नाची मर्यादा २०१७ मध्ये आठ लाख रुपये केली. मग वाढत्या महागाईच्या आधारावर प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत सरकार वाढ का करीत नाही?

जुन्या करप्रणालीत पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८७(अ) नुसार कमाल १२,५०० रुपयांची सूट मिळत असल्यामुळे त्यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही. परंतु पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या सर्व प्राप्तिकरदात्यांना ‘सूट’ मिळत नसल्यामुळे २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. उदा. प्राप्तिकरदात्याचे उत्पन्न पाच लाख दहा रुपये असले तरी त्यास कलम ८७(अ) ची सूट मिळत नसल्यामुळे त्याला १३००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. म्हणजेच केवळ दहा रुपयांच्या उत्पन्नावर त्यास १३,००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो.

नव्या करप्रणालीतही सात लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना कोणतीही ‘सूट’ मिळत नसल्यामुळे (किरकोळ सवलतीचा विचार करूनही) त्यांना तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. उदा. प्राप्तिकरदात्याचे उत्पन्न ७,२८,००० रुपये असल्यास त्याला केवळ २८ हजार रुपयांच्या जादा उत्पन्नावर २३,७१२ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. 

‘प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादे’त वाढ न करता कलम ८७(अ) अन्वये देण्यात येणाऱ्या ‘सूट’मुळे अनेक विसंगती निर्माण झालेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी ‘सूट’ची तरतूद रद्द करून प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादाच सर्वांसाठी किमान दहा लाख रुपये करणे आवश्यक आहे.    kantilaltated@gmail.com

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सBudgetअर्थसंकल्प 2024