शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

सूट नको, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेतच वाढ हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:23 IST

Income Tax: प्राप्तिकरात ‘सूट’ देण्याची तरतूद रद्द करून प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादाच सर्वांसाठी किमान १० लाख रुपये करणे आवश्यक आहे.

- ॲड. कांतीलाल तातेड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेला सादर करणार आहेत. प्राप्तिकरदात्यांच्या त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करा ही त्यातील प्रमुख मागणी आहे. ज्यांची आर्थिक क्षमता जास्त आहे, त्यांच्याकडून प्राप्तिकर वसूल करणे व ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांना त्यातून वगळणे हा प्राप्तिकर कायद्याचा मूलभूत पाया आहे. 

करदात्यांची आर्थिक क्षमता निश्चित करताना सरकारने करदात्यांचे वास्तव उत्पन्न लक्षात घेणे आवश्यक असते. त्यामुळे प्रचंड वेगाने वाढणाऱ्या महागाईमुळे घटणाऱ्या वास्तव उत्पन्नाचे प्रमाण लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वेळोवेळी वाढ करणे आवश्यक असते; परंतु गेल्या ११ वर्षांत महागाईमध्ये प्रचंड वाढ झालेली असतानादेखील सरकारने प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ न करता जुन्या करप्रणालीच्या बाबतीत ती २.५० लाख रुपयांवरच गोठविलेली आहे. नव्या करप्रणालीत अतिज्येष्ठ प्राप्तिकरदात्यांची प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा प्रत्यक्षात दोन लाख रुपयांनी कमी केली असून, आता सर्व प्राप्तिकरदात्यांसाठी ती मर्यादा तीन लाख रुपये केलेली आहे.

प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत आवश्यक ती वाढ न करण्याची सरकारची कृती घटनेच्या उपोद्घातात नमूद सर्वांना ‘आर्थिक न्याय’ देण्याच्या उद्देशाशी तसेच प्राप्तिकर कायद्याच्या मूलभूत तत्त्वाशी सुसंगत आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

प्रत्यक्ष कर संहितेची छाननी करणाऱ्या तत्कालीन भाजप नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने दि. ९ मार्च, २०१२ रोजी लोकसभेला सादर केलेल्या अहवालात प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये करावी, अशी शिफारस २०१०-११ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीच्या आधारे केली होती. तसेच माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील विरोधी पक्षनेते म्हणून प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये करण्याची मागणी केली होती. १०३व्या घटनादुरुस्तीनुसार आठ लाख रुपयांपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न असणाऱ्यांना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ ठरविण्यात आलेले आहे.

परंतु अशा ‘दुर्बल व्यक्तीं’कडूनही प्राप्तिकराच्या दोन्ही करप्रणालीमध्ये इतर प्राप्तिकरदात्यांप्रमाणेच प्राप्तिकर वसूल केला जातो. वास्तविक प्राप्तिकर हा सधन व्यक्तींकडूनच वसूल करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराने करावयाच्या खर्चाची कमाल मर्यादा एप्रिल १९९६ पूर्वी साडेचार लाख रुपये होती. महागाईमुळे सरकारने ती मर्यादा ९५ लाख रुपये केली. ओबीसी आरक्षणासाठी ‘क्रिमी लेअर’च्या उत्पन्नाची मर्यादा २०१७ मध्ये आठ लाख रुपये केली. मग वाढत्या महागाईच्या आधारावर प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत सरकार वाढ का करीत नाही?

जुन्या करप्रणालीत पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८७(अ) नुसार कमाल १२,५०० रुपयांची सूट मिळत असल्यामुळे त्यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही. परंतु पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या सर्व प्राप्तिकरदात्यांना ‘सूट’ मिळत नसल्यामुळे २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. उदा. प्राप्तिकरदात्याचे उत्पन्न पाच लाख दहा रुपये असले तरी त्यास कलम ८७(अ) ची सूट मिळत नसल्यामुळे त्याला १३००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. म्हणजेच केवळ दहा रुपयांच्या उत्पन्नावर त्यास १३,००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो.

नव्या करप्रणालीतही सात लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना कोणतीही ‘सूट’ मिळत नसल्यामुळे (किरकोळ सवलतीचा विचार करूनही) त्यांना तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. उदा. प्राप्तिकरदात्याचे उत्पन्न ७,२८,००० रुपये असल्यास त्याला केवळ २८ हजार रुपयांच्या जादा उत्पन्नावर २३,७१२ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. 

‘प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादे’त वाढ न करता कलम ८७(अ) अन्वये देण्यात येणाऱ्या ‘सूट’मुळे अनेक विसंगती निर्माण झालेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी ‘सूट’ची तरतूद रद्द करून प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादाच सर्वांसाठी किमान दहा लाख रुपये करणे आवश्यक आहे.    kantilaltated@gmail.com

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सBudgetअर्थसंकल्प 2024