शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया ‘कोष’

By admin | Updated: February 11, 2017 00:21 IST

सोळा डिसेंबर २०१२. संवेदनशील भारतीय माणसाच्या कायम स्मरणात राहिलेला दिवस. याच दिवशी दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर अत्याचार करण्यात आले

सोळा डिसेंबर २०१२. संवेदनशील भारतीय माणसाच्या कायम स्मरणात राहिलेला दिवस. याच दिवशी दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर अत्याचार करण्यात आले आणि या घटनेने अख्खा देश संतापाने पेटून उठला. तत्कालीन सरकारचे आसनही त्यामुळे डळमळीत झाले. लोकांच्या संतापावर फुंकर घालण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही २०१३च्या अर्थसंकल्पात लगोलग ‘निर्भया कोष’ची स्थापना केली. त्यासाठी दरवर्षी तब्बल एक हजार कोटी रुपये या कोषात जमा केले जातात. गेल्या वर्षापर्यंत तीन हजार कोटी रुपये या कोषात जमा झाले होते. यंदाच्या अर्थसंकल्पातही यासाठी मोठी तरतूद करण्यात आली. पण काय आहे वस्तुस्थिती? या निधीचा आजवर किती आणि कसा उपयोग केला गेला? महिलांवरील किती अत्याचार थांबले? किती पीडित महिलांना त्याचा कसा आणि काय उपयोग झाला? महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनीच लोकसभेत लेखी उत्तरात दिलेल्या एका माहितीनुसार पीडित महिलांच्या मदतीसाठी दोनशे कोटी रुपये, महिला अत्याचारांच्या तपासासाठी देशातील पोलीस ठाण्यांना ३२४ कोटी रुपये, महिला अत्याचारांच्या संदर्भात एकाच ठिकाणी त्यांच्या सर्व प्रश्नांना दाद मिळावी यासाठी स्थापन केलेल्या एकल थांबा केंद्रांसाठी (वन स्टॉप सेंटर) १८.५८ कोटी रुपये, महिला हेल्पलाइन प्रकल्पासाठी ६९.४९ कोटी रुपये असा साधारण फक्त ६०० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. ‘निर्भया कोष’ स्थापन झाला, त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, रुग्णालयांमध्ये पीडित महिलांची खास सोय करणार, त्यांच्यावरील उपचारांसाठीही निधी दिला जाणार असे बरेच काही होणार होते? काय झाले या उपाययोजनांचे? महिलांवरील अत्याचारात तर रोज भरच पडते आहे आणि ‘निर्भया कोष’ही असून नसल्यासारखा. यांसदर्भात संपूर्ण देशासाठी एकसूत्री धोरणही नाही. गोव्यासारख्या राज्यात महिला अत्याचारासंदर्भात भरपाई म्हणून दहा लाख रुपये दिले जातात, काही राज्यांत फक्त पन्नास हजार तर काही राज्यांत काहीच नाही. कारण त्यांच्या अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशी तरतूदच नाही! काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एकसूत्री धोरण आखण्याची सूचना केंद्राला केली होती. याचसंदर्भात संसदेने नेमलेल्या समितीनेही कोषातील निधी योग्यपणे वापरला जात नसल्याची तक्रार केली होती. हे प्रकरण आता पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले आहे. कोषातील निधीचा आतापर्यंत कसा वापर करण्यात आला, याचे विवरण देण्याचा आदेश कालच न्यायालयाने केंद्राला दिला आहे. पण त्याचा तरी कितीसा उपयोग होणार? त्यासाठी मुळातच महिलांविषयी सरकारच्याही मनात आदर हवा आणि काही करण्याची मुळातून इच्छाही हवी. नव्या सिंहासनाच्या सत्ताकाळात तर हा आदर दिसणे त्याहूनही मुश्कील. ‘कोषा’तील जाळ्याचा गुंता तेवढा वाढतोय.