शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

निर्भया ‘कोष’

By admin | Updated: February 11, 2017 00:21 IST

सोळा डिसेंबर २०१२. संवेदनशील भारतीय माणसाच्या कायम स्मरणात राहिलेला दिवस. याच दिवशी दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर अत्याचार करण्यात आले

सोळा डिसेंबर २०१२. संवेदनशील भारतीय माणसाच्या कायम स्मरणात राहिलेला दिवस. याच दिवशी दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर अत्याचार करण्यात आले आणि या घटनेने अख्खा देश संतापाने पेटून उठला. तत्कालीन सरकारचे आसनही त्यामुळे डळमळीत झाले. लोकांच्या संतापावर फुंकर घालण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही २०१३च्या अर्थसंकल्पात लगोलग ‘निर्भया कोष’ची स्थापना केली. त्यासाठी दरवर्षी तब्बल एक हजार कोटी रुपये या कोषात जमा केले जातात. गेल्या वर्षापर्यंत तीन हजार कोटी रुपये या कोषात जमा झाले होते. यंदाच्या अर्थसंकल्पातही यासाठी मोठी तरतूद करण्यात आली. पण काय आहे वस्तुस्थिती? या निधीचा आजवर किती आणि कसा उपयोग केला गेला? महिलांवरील किती अत्याचार थांबले? किती पीडित महिलांना त्याचा कसा आणि काय उपयोग झाला? महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनीच लोकसभेत लेखी उत्तरात दिलेल्या एका माहितीनुसार पीडित महिलांच्या मदतीसाठी दोनशे कोटी रुपये, महिला अत्याचारांच्या तपासासाठी देशातील पोलीस ठाण्यांना ३२४ कोटी रुपये, महिला अत्याचारांच्या संदर्भात एकाच ठिकाणी त्यांच्या सर्व प्रश्नांना दाद मिळावी यासाठी स्थापन केलेल्या एकल थांबा केंद्रांसाठी (वन स्टॉप सेंटर) १८.५८ कोटी रुपये, महिला हेल्पलाइन प्रकल्पासाठी ६९.४९ कोटी रुपये असा साधारण फक्त ६०० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. ‘निर्भया कोष’ स्थापन झाला, त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, रुग्णालयांमध्ये पीडित महिलांची खास सोय करणार, त्यांच्यावरील उपचारांसाठीही निधी दिला जाणार असे बरेच काही होणार होते? काय झाले या उपाययोजनांचे? महिलांवरील अत्याचारात तर रोज भरच पडते आहे आणि ‘निर्भया कोष’ही असून नसल्यासारखा. यांसदर्भात संपूर्ण देशासाठी एकसूत्री धोरणही नाही. गोव्यासारख्या राज्यात महिला अत्याचारासंदर्भात भरपाई म्हणून दहा लाख रुपये दिले जातात, काही राज्यांत फक्त पन्नास हजार तर काही राज्यांत काहीच नाही. कारण त्यांच्या अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशी तरतूदच नाही! काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एकसूत्री धोरण आखण्याची सूचना केंद्राला केली होती. याचसंदर्भात संसदेने नेमलेल्या समितीनेही कोषातील निधी योग्यपणे वापरला जात नसल्याची तक्रार केली होती. हे प्रकरण आता पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले आहे. कोषातील निधीचा आतापर्यंत कसा वापर करण्यात आला, याचे विवरण देण्याचा आदेश कालच न्यायालयाने केंद्राला दिला आहे. पण त्याचा तरी कितीसा उपयोग होणार? त्यासाठी मुळातच महिलांविषयी सरकारच्याही मनात आदर हवा आणि काही करण्याची मुळातून इच्छाही हवी. नव्या सिंहासनाच्या सत्ताकाळात तर हा आदर दिसणे त्याहूनही मुश्कील. ‘कोषा’तील जाळ्याचा गुंता तेवढा वाढतोय.