शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
4
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
5
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
6
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
7
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
8
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
9
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
11
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
12
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
13
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
14
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
15
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
16
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
17
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
18
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
19
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
20
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले

नव्या मोटार वाहन कायद्याचे स्वागतच करायला हवे!

By रवी टाले | Updated: September 6, 2019 13:18 IST

ज्यांचा कल नियम व कायद्याचे उल्लंघन करण्याकडे असतो, त्यांना तर कायद्याची भीती वाटलीच पाहिजे.

ठळक मुद्देनव्या कायद्यानुसार आकारण्यात येत असलेले दंड अन्यायकारक असल्याचा टीकाकारांचा सूर आहे.नागरिकांना दंडाची तरतूद कितीही मोठी असली तरी, भीती बाळगण्याचे काही कारणच नाही!जुन्या कायद्याची भीती वाटत नव्हती म्हणूनच तर नवा कायदा करण्याची गरज भासली ना?

नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून, नव्या नियमांची खिल्ली उडविणारे चुटकुले, व्यंगचित्रे, ध्वनिचित्रफिती, मीम यांची समाजमाध्यमांवर अक्षरश: बहार आली आहे. दुसरीकडे प्रसारमाध्यमांमध्ये नव्या नियमांनुसार होत असलेल्या कारवाईच्या बातम्यांना प्रमुख स्थान मिळत आहे. कुणा दुचाकीस्वारास २३ हजार रुपयांचा दंड झाला आणि त्याच्या दुचाकीची किंमतच अवघी १५ हजार रुपये आहे, ट्रॅक्टर चालकास ५९ हजार रुपये दंड झाला, आॅटोरिक्षा चालकास ३२ हजार ५०० रुपये दंड झाला, अशा स्वरुपाच्या बातम्यांचे गत दोन-तीन दिवसांपासून पीक आले आहे.समाजमाध्यमांमध्ये सुरू असलेली करमणूक आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांमागचा एकंदर सूर टीकात्मक आहे. वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल नव्या कायद्यानुसार आकारण्यात येत असलेले दंड अन्यायकारक असल्याचा टीकाकारांचा सूर आहे. टीका करताना या वस्तुस्थितीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे, की शिक्षा ही दोषींनाच होत असते, निर्दोष लोकांना नव्हे! दुसरी गोष्ट म्हणजे प्रणालीमधील भ्रष्ट प्रवृत्तींमुळे अथवा अंगिभूत दोषांमुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा झाली तरी, त्या विरुद्ध दाद मागण्याची बहुस्तरीय व्यवस्था आपल्या देशात अस्तित्वात आहे. त्यामुळे जे कायदे व नियमांचे पालन करतात, अशा नागरिकांना दंडाची तरतूद कितीही मोठी असली तरी, भीती बाळगण्याचे काही कारणच नाही!नव्या कायद्यानुसार आकारण्यात येणारे दंड जबर असल्याची टीका करणाऱ्यांनी, वाहतूक नियमांचा भंग केल्यासाठी विकसित देशांमध्ये आकारण्यात येत असलेल्या दंडाच्या रकमांवर नजर टाकायला हवी. सिट बेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाºयास सिंगापूरमध्ये १२० सिंगापूर डॉलर म्हणजे भारतीय चलनात सुमारे ५५८० रुपये दंड आकारण्यात येतो. त्याच गुन्ह्यासाठी ब्रिटनमध्ये १०० पौंड (सुमारे ८८५० रुपये) दंड आकारला जातो. भारतात आतापर्यंत त्यासाठी १०० रुपये दंड आकारण्यात येत होता, तर नव्या कायद्यानुसार २५०० रुपये दंड होईल. हेल्मेट परिधान न करता दुचाकी दामटण्यासाठी फ्रान्समध्ये १३५ युरो (सुमारे १०,७०० रुपये), तर आॅस्टेÑलियात १०० आॅस्टेÑलियन डॉलर (सुमारे ४९०० रुपये) दंड आकारल्या जातो. भारतात या गुन्ह्यासाठी आतापर्यंत अवघा १०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता दंडाची रक्कम एक हजार रुपये झाली आहे आणि सोबतच चालक परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित होईल. वानगीदाखल ही काही उदाहरणे दिली आहेत. विकसित देशांच्या तुलनेत भारतात आकारले जाणारे दंड अद्यापही कमीच आहेत, हे त्यावरून लक्षात यावे!भारतात अपघातांमध्ये बळी पडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होतो. त्यापैकी बहुतांश लोकांचा काहीही दोष नसतो. वाहतूक नियमांची ऐशीतैशी करीत बेदरकारपणे वाहने हाकणाºया चालकांच्या बेमुर्वतपणाचे ते बळी ठरतात. वाहतूक नियमांचे कठोर पालन झाल्यास अपघातातील बळींची संख्या आटोक्यात आणणे शक्य आहे. नियम अथवा कायद्यांचे पालन एक तर जबाबदारीच्या भावनेतून स्वयंप्रेरणेतून होऊ शकते किंवा शिक्षेच्या भीतीपोटी! जबाबदारीच्या भावनेतून नियमांचे पालन झाले असते, तर जगभर भारतातील वाहतूक व्यवस्था हा हास्यास्पद विषय झालाच नसता. त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी जबर शिक्षेचे प्रावधान असलेला कायदा तयार करणे हाच एकमेव मार्ग होता. कायद्याचे पालन करणाºया प्रामाणिक नागरिकांनी त्याची चिंता करण्याचे काही कारणच नाही. जर कुणी कायद्याचा विरोध करीत असेल, तर त्याची प्रवृत्ती कायदा मोडण्याची आहे हे स्पष्ट आहे. दारू पिऊन वाहन चालविण्यासाठी जुन्या नियमानुसार दोन हजार रुपये दंडाची तरतूद होती. नव्या नियमानुसार दहा हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी दारूवर दोन-चार हजार रुपये खर्च करणाºयास दोन हजार रुपयांच्या दंडाचे काही वाटत नसे; मात्र आता दहा हजार रुपयांच्या दंडासह सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची भीती नक्कीच दारू पिऊन वाहन न चालनिण्यास प्रवृत्त करू शकेल.अर्थात याची दुसरी बाजूही आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भातील नागरिकांची अनास्था हेच अपघातांचे एकमेव कारण नाही. रस्त्यांची दुरवस्था, पायाभूत सुविधांचा अभाव, चुकीच्या ठिकाणी व चुकीच्या पद्धतीने निर्माण करून ठेवलेले गतिरोधक, प्रदीर्घ काळापासून रेंगाळत पडलेली रस्त्यांची कामे, रस्त्यांलगतची अतिक्रमणे इत्यादी अनेक कारणेही अपघातांसाठी कारणीभूत ठरतात. त्यासाठी नागरिकांना जबाबदार ठरविता येणार नाही. सरकारी यंत्रणांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि उत्कृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती व देखभालीसंदर्भातील सरकारी यंत्रणांची अनास्था त्यासाठी कारणीभूत आहे; परंतु सरकारी यंत्रणा अपघातांसाठी एक कारण निर्माण करतात म्हणून नियमांचे पालन न करून दुसºया कारणास आम्ही जन्म देऊ, हा दृष्टिकोनही योग्य नव्हे! शेवटी सुरा टरबुजावर पडला काय, अन् टरबूज सुºयावर पडले काय, परिणाम एकच होणार आहे!अपघातांमध्ये नुकसान सर्वसामान्य नागरिकांचेच होते. एक अपघात एखाद्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यातून उठवू शकतो. अशी उदाहरणे आपल्या आजूबाजूलाच असतात. अपघातास जबाबदार व्यक्तीची चूक त्याच्या स्वत:सह इतरांचाही जीव जाण्यास अथवा कायमस्वरुपी अपंगत्व येण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन कठोरपणे झालेच पाहिजे! ते स्वयंस्फूर्तपणे होत नसेल, तर शिस्तीचा बडगा उचलून करावेच लागेल. नवा मोटार वाहन कायदा त्यासाठीच आहे. नियम व कायद्याचे पालन करणाºया नागरिकांनी त्याची धास्ती बाळगण्याचे अजिबात कारण नाही आणि ज्यांचा कल नियम व कायद्याचे उल्लंघन करण्याकडे असतो, त्यांना तर कायद्याची भीती वाटलीच पाहिजे. जुन्या कायद्याची भीती वाटत नव्हती म्हणूनच तर नवा कायदा करण्याची गरज भासली ना? तो लागू झाल्याबरोबर जर त्याची धास्ती निर्माण झाली असेल, तर उद्देश सफल झाला असे मानून, कायद्याचे पालन करणाºया नागरिकांनी त्याचे स्वागतच करायला हवे!- रवी टाले    ravi.tale@lokmat.com  

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसAkolaअकोलाRto officeआरटीओ ऑफीस