शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

निषेधार्ह संवेदनशून्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:27 IST

इराकमधील मोसुल या शहराजवळ असलेल्या बादोश या खेड्यालगतच्या एका सामूहिक दफनभूमीत ३९ भारतीयांचे मृतदेह सापडले असून त्या साऱ्यांची इराकमधील इसीस या दहशतवादी संघटनेने निर्घृण हत्या केल्याचे आढळले आहे.

इराकमधील मोसुल या शहराजवळ असलेल्या बादोश या खेड्यालगतच्या एका सामूहिक दफनभूमीत ३९ भारतीयांचे मृतदेह सापडले असून त्या साऱ्यांची इराकमधील इसीस या दहशतवादी संघटनेने निर्घृण हत्या केल्याचे आढळले आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाविषयी भारत सरकारने आजवर मौन पाळले. मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूची साधी खबरही मिळू दिली नाही. उलट ही सारी माणसे हयात असल्याच्या भ्रमातच त्यांना ठेवले गेले. ‘इराक सरकारकडून अधिकृतरीत्या यासंबंधीची माहिती येण्याआधी ती जाहीर करणे परराष्टÑ खात्याच्या नियमात बसणारे नाही म्हणून ही गुुप्तता राखली गेली.’ हे परराष्टÑ व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत याविषयीचे दिलेले स्पष्टीकरण कुणालाही मान्य होऊ नये असे आहे. तालिबान, बोको हराम किंवा अल् कायदा यासारख्या अतिरेकी संघटनांच्या हिंसक कारवाया साºया जगाला दूरचित्रवाहिन्यांवर पाहता येतात. बोको हरामने अपहृत केलेल्या तीनशेवर मुलींची त्यांच्या बंदिवासातील छायाचित्रे जगाने अशी पाहिली आहेत. तालिबानांनी अफगाणिस्तानच्या फुटबॉल मैदानावर अनेक दुर्दैवी स्त्रियांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांना मृत्युदंड दिल्याची भीषण चित्रेही भारतासह साºया जगाने पाहिली. या स्थितीत प्रत्यक्ष भारतीय नागरिकांची इराकमध्ये सामूहिक हत्या झाली असल्याची माहिती भारत सरकारला इराक सरकारने सांगितल्यानंतरच समजावी ही बाब जेवढी संशयास्पद तेवढीच आपले परराष्टÑ खाते व त्याचे जगात वावरणारे लोक कमालीचे सुस्त व आपल्याच नागरिकांच्या जीवाविषयी भरपूर बेफिकीर असल्याचे उघड करणारी आहे. ही बाब तुम्ही एवढे दिवस का दडविली आणि मृतांच्या नातेवाईकांना त्याविषयीच्या भ्रमात का ठेवले हा विरोधी पक्षाने सरकारला संसदेत विचारलेला प्रश्न त्यामुळेच रास्त आहे आणि विरोधक आम्हाला बोलू देत नाहीत हा सरकार पक्षाचा कांगावाही त्याचमुळे खोटा व अमान्य होणारा आहे. आता या मृतांचे देह एवढ्या वर्षानंतर त्या सामूहिक दफनभूमीतून उकरून काढण्यात आले असून त्यांची डीएनए तपासणी करण्यात आली आहे. त्यातील एक अपवाद वगळता साºयांची ओळख पटली असून ते मृतदेह देशात आणायला परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री इराकला जात आहेत. तुमच्या घरचा माणूस मारला गेल्याचे वृत्त तब्बल चार वर्षांनी घरच्या लोकांना कळविणे ही बाब सरकारसाठी जेवढी लांच्छनास्पद तेवढीच त्याची बातमी देशापासून एवढा काळ दडवून ठेवण्याचे त्याचे कृत्यही निंद्य आहे. जगातील कोणताही लोकशाही व जागरूक देश आपल्या नागरिकांच्या जीविताबद्दल एवढा बेपर्वा वा निगरगट्ट असणार नाही आणि तसे सरकारही स्वत:ला डोळस म्हणवू शकणार नाही. सरकारांच्या सावध दृष्टीविषयीची एक गोष्ट येथे नोंदविण्याजोगी आहे. दुसºया महायुद्धात मृत्यू पावलेल्या आपल्या हजारो सैनिकांचे मृतदेह वॉशिंग्टनजवळील एका मोठ्या स्मशानभूमीत त्या देशाने पुरले आहेत. त्यातील तीन सैनिकांची ओळख पटू न शकल्याने त्यांच्या नातेवाईकांपर्यंत त्यांची खबर सरकारला पोहचविता आली नाही. तेवढ्यासाठी ते नातेवाईक कधी तरी त्यांचा शोध घेत या स्मशानभूमीत येतील म्हणून त्या सरकारने त्यांची ओळख पटविता यावी म्हणून लष्कराचे एक पथक त्या स्मशानभूमीत ४० वर्षांहून अधिक काळ तैनात ठेवले. ते पथक जॉर्ज बुश (ज्यू.) यांच्या कारकीर्दीतच तेथून काढले गेले. या पार्श्वभूमीवर आपल्या परराष्टÑ खात्याची संवेदनशून्यता निषेधार्ह म्हणावी अशीच आहे.

टॅग्स :ISISइसिस