शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यांवर आधारित मूल्यशिक्षण हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 05:27 IST

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांपैकी एक असा सन्मान अभिमानाने बाळगत असतानाच आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव आहे.

- रमेश पोखरीयाल निशंक(मनुष्यबळ विकासमंत्री)जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांपैकी एक असा सन्मान अभिमानाने बाळगत असतानाच आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव आहे. उत्तम आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातूनच आम्ही नव्या भारताच्या निर्मितीचा पाया रचू शकतो, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्ही सुमारे ३३ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य रेखतो आहोत, याची आम्हाला जाणीव आहे आणि ते भविष्य तेव्हाच निर्माण करता येईल, जेव्हा आम्ही त्यांना अशा शाश्वत मूल्यांची ओळख करून देऊ, जे मानवतेचे आधारस्तंभ आहेत.मला असे वाटते की, जर कोणत्याही व्यक्तीला स्वत: एक प्रतिष्ठित आयुष्य जगायचं असेल, तर त्याची कोणतीही कृती अशी असायला नको, ज्यामुळे इतर कुठल्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठित आयुष्याला हानी पोहोचेल. जर कोणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे असेल, तर त्याला याचीही काळजी घ्यावीच लागेल की, जेव्हा दुसरे कोणी आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडतील, तेव्हा त्यांनी संयम, सहिष्णुता आणि सहनशीलता दाखवत, त्यांचेही विचार ऐकून घ्यायला हवे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगातील बहुतांश लोकशाही देश मूलभूत अधिकारांविषयी खूप बोलतात, व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्यांविषयी मात्र ते गप्प आहेत.आपल्या मुलांना आज हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की, विविधतेने संपन्न असलेला भारत केवळ एक देश नाही, तर पूर्ण उपखंड आहे, ज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या चालीरीती आणि विविध परंपरा आहेत. या विविधरंगी परंपरा आणि संस्कृतीचे जितके दर्शन भारतात होते, तेवढे कदाचितच जगातल्या इतर कोणत्या भागात होत असेल. मानवी संस्कृतीच्या आध्यात्मिक क्षेत्रात भारतीय संस्कृतीने नेहमीच खूप मोठं योगदान दिलं आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी आपण समर्पित वृत्तीनं काम करण्याची गरज आहे. ही संस्कृती म्हणजे आध्यात्माचा सतत वाहणारा असा प्रवाह आहे, ज्याला ऋषी-मुनी, संत आणि सुफी संतांनी आपल्या जीवनमूल्यांनी याची जोपासना केली आहे. आमची संस्कृती आम्हाला एकता, समरसता, सहकार्य, बंधुभाव, सत्य, अहिंसा, त्याग, नम्रता, समानता अशा मूल्यांना आयुष्यात स्थान देत, वसुधैव कुटुंबकमची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा देत असते. मानव समाज आज शरीर - मनाच्या अनेक व्याधींशी लढतो आहे.अशा वेळी हे विचार आणि संस्कारच आपल्याला मार्ग दाखवू शकतात. आपल्या विचारांमुळेच आपण विश्वगुरू बनले आहोत आणि पुन्हा एकदा विचारातूनच आपण विजयी होणार आहोत. वेगाने बदलत असलेल्या आजच्या डिजिटल युगात आपण शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन कशा प्रकारे करू शकतो, हे सर्वात मोठे आव्हान आहे. या नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

मला असं वाटतं की, शालेय शिक्षणाच्या माध्यमातून लहानपणीच आपल्याला आपल्या कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण होते. मला आठवतं, हिमालयाच्या कुशीत दुर्गम भागात असलेल्या माझ्या प्राथमिक शाळेत शिक्षण देण्याआधी आम्हाला एक उत्तम नागरिक बनण्याची शिकवण दिली जात होती. प्रार्थनेच्या वेळी आम्हाला शिकविलं जायचं की, राष्ट्रध्वजाचा सन्मान कशा प्रकारे करायला हवा, राष्ट्रगीताची प्रतिष्ठा कशी जपायला हवी, आसपासचा परिसर स्वच्छ कसा राखायचा, सर्वांशी मिळूनमिसळून प्रेमाने वर्तणूक कशी करायची, हे शिकविलं जाई.आज अत्यंत आव्हानात्मक जागतिक वातावरणात भारताला लोकसंख्याक लाभांशाची शक्ती लाभली आहे, हे आपलं सद्भाग्यच म्हणावे लागेल, आज भारतात सर्वाधिक युवाशक्ती आहे आणि आजच्या वैश्विक प्रतिस्पर्धेच्या युगात हे आपलं बलस्थान सिद्ध झालं आहे. मात्र, त्याच वेळी आपल्यासमोर एक मोठे आव्हान हेही आहे की, या युवाशक्तीच्या ऊर्जेला आपण सकारात्मक आणि सृजनात्मक मार्गाकडे वळवू शकतो. वर्ष २०२२ पर्यंत भारतात काम करणाºया लोकांची संख्या सर्वाधिक असेल. अशा परिस्थितीत हे आवश्यक आहे की, आपण आपल्या तरुण पिढीला गुणवत्तापूर्ण, नावीन्यपूर्ण आणि कौशल्यावर आधारित शिक्षणासह मूल्याधारित शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यात यशस्वी होऊ.भारतीय समाजाचे विविधरंगी धाग्यांनी विणलेले हे वस्त्र अधिक पक्के, अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये शांततापूर्ण सहकार्याची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे आणि हीच शांतता, प्रगतीचे मार्ग अधिक प्रशस्त करत असते. सार्वजनिक आयुष्यात आपल्याला केवळ आपल्या कर्तव्यांची जाणीव असणे पुरेसे नाही, तर शांततेच्या मार्गाने या कर्त्यव्याचे वहन करण्याची इच्छाशक्ती असायला हवी. आपण कुठल्याही जाती-धर्माचे, क्षेत्राताले, भाषेचे असोत, वेगवगेळ्या चालीरीती, परंपरा पाळणारे असोत. मात्र, परिस्थितीमुळे आलेल्या अडचणी सोडविताना आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देत आपण केवळ त्यांचीच मदत करत नाही, तर राष्ट्रनिर्मितीचा पाया मजबूत करत आहोत, हे निर्विवाद सत्य आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र