शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या अर्थावलोकनाचा सकारात्मक विचार करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 06:05 IST

भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या अधिक लोकांना जाणवते आहे ते बँकांचे ढासळलेले आरोग्य आणि बेरोजगारी, आणि यात सुधारणा न होणे. २०१४च्या तुलनेत २०१९च्या अंतापर्यंत बेरोजगारीचा दर ११२ टक्के वाढला आहे

- जीवन तळेगावकरभारतीय अर्थव्यवस्थेत सध्या अधिक लोकांना जाणवते आहे ते बँकांचे ढासळलेले आरोग्य आणि बेरोजगारी, आणि यात सुधारणा न होणे. २०१४च्या तुलनेत २०१९च्या अंतापर्यंत बेरोजगारीचा दर ११२ टक्के वाढला आहे, आणि बँकांच्या अनुत्पादक उत्पन्नाचे ओझे सातपट वाढले आहे. त्यामुळे निराशावादी चित्र तयार होणे स्वाभाविक आहे. याच मुद्द्याला धरून अर्थव्यवस्थेची सध्या खिल्ली उडवली जात आहे. पण, ‘सगळेच चित्र एवढे निराशात्मक आहे का?’ तर या लेखात अर्थव्यवस्थेचा सम्यक दृष्टीने विचार केला आहे. काय चांगले होत आहे, हे जसे दर्शवले आहे, तसेच काय चांगले व्हावे, याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.भारतीय अर्थव्यवस्थेचे गुणात्मक मूल्यमापन या उद्देशाने २०१४ ते २०१९ हा ६ वर्षांचा प्रवास निवडला तर लक्षात येते की, अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या सकारात्मक स्थित्यंतरातून गेली आहे. भांडवलशाही व्यवस्थास्वीकारणारा देश जागतिक घडामोडींनी प्रभावित होतच असतो. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला, पण धक्का मात्र बसला नाही. कारण भारताचे सकल घरेलू उत्पादन ४४ टक्के वाढले आहे (२.०३ ते २.९३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर), आणि दरडोई उत्पन्नात यादरम्यान ३७ टक्के वृद्धी झाली आहे (१,४८६ ते २,०४१ डॉलर), ही समाधानाची बाब आहे. २०१४मध्ये भारताची लोकसंख्या १.२९ अब्ज होती. ती २०१९च्या शेवटी १.३६ अब्ज एवढी झाली. म्हणजे लोकसंख्येत ६ टक्के वृद्धी झाली. भारताच्या लोकसंख्येच्या फक्त २.८ टक्के लोक आयकर भरत होते, ते प्रमाण ४.२ टक्के एवढे झाले. म्हणजे ५० टक्के वृद्धी झाली, याचा अर्थ अधिक लोक आता अर्थव्यवस्थेस हातभार लावत आहेत. सिंगापूरमध्ये हेच प्रमाण ३२ टक्के एवढे आहे. याचा अर्थ करचुकव्या लोकांवर कारवाई करावी लागणार आहे. असे प्रामाणिकपणे झाल्यास शासनाकडे अधिक महसूल गोळा होईल आणि विकासात्मक कामासाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद करता येईल. प्राप्त परिस्थितीत एकूण प्रत्यक्ष करातून शासनाला २०१४मध्ये ६.९६ लाख कोटी रुपये प्राप्त झाले होते, ते २०१९मध्ये ११.१७ लाख कोटीपर्यंत वाढले. म्हणजे त्यात ६० टक्के वृद्धी झाली. अप्रत्यक्ष करांत, ५.४ लाख कोटींचे १२ लाख कोटी झाले म्हणजे १२० टक्के वाढ झाली. पुढील काही वर्षांत प्रत्यक्ष- कर देणारे आणि महसूल कैक पटीने वाढला पाहिजे.अप्रत्यक्ष-कर महसुलापेक्षा प्रत्यक्ष-कर महसुलात होणारी वाढ ही सशक्त अर्थव्यवस्थेचे द्योतक असते. थोडक्यात श्रीमंत आणि गरीब माणूस टूथपेस्टसाठी तेवढेच पैसे मोजतो. कारण अप्रत्यक्ष-कर दोघांनाहीसारखा असतो. खरे तर गरिबाला त्याच्या उत्पन्नाच्या मानाने टूथपेस्ट स्वस्तात मिळायला हवी. पण असे होत नाही. म्हणून याला आपण ‘प्रतिगामी करप्रणाली’ मानतो, ती आता ‘जीएसटी’मुळे सुधारत आहे, यात समाधान मानले पाहिजे. ‘जीएसटी’ प्रणालीमुळे अप्रत्यक्ष-करचुकविणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सगळे व्यवसाय कर-परिघात आले आहेत. तेव्हा अप्रत्यक्ष-कर महसुलात अधिक वाढ होणे अपेक्षित नाही, तर ती आता प्रत्यक्ष-कर महसुलात होणे अपेक्षित आहे, हे निरोगीकरप्रणालीचे द्योतक आहे. मग शासनाला अधिक महसूल कसा मिळणार? तर, त्यासाठी व्यवसायांची गती, त्यांचे उत्पन्न वाढवले पाहिजे. त्यासंबंधी नियमांत बदल केले पाहिजेत. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे.आता, काही चिंतात्मक मुद्दे, भारताचे सकल घरेलू उत्पन्न वाढत असले तरी, त्याचा वृद्धीदर मागील वर्षाच्या तुलनेने घटत चालला आहे. आता आपण जवळजवळ २०१४च्या दराजवळ पोचलो आहोत (५.८ टक्के), यासाठी कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांत निवेश आणि उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे, म्हणजे रोजगार उत्पन्न होतील. यासाठी दुसरा मार्ग नाही. भारतात अजून पायाभूत सुधारणा, महामार्ग-बांधकाम इ. चालूच आहेत.अतिलोकसंख्येच्या आपल्या देशात ते एकाऐवजी तीन शिफ्टमध्ये केल्यास अधिक रोजगार उपलब्ध होऊ शकतो. नवे व्यावसायिक आणि कुशल कामगार निर्माण होण्यास वेळ द्यावा लागणार आहे. दरम्यान, अशा घरगुती 'जुगाडू' उपायांनी बेरोजगारी आटोक्यात येऊ शकते. ‘जुगाड’ हा शब्द उपहासाने वापरला नाही. हा भारतीय व्यवस्थेचा प्राण आहे, आणि भारतीय माणूस एखादे विदेशात महागात होणारे काम, त्यात योग्य ते देशी बदल करून आवश्यकतेप्रमाणे खूपच कमी भांडवलात करू शकतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली अर्थव्यवस्था या ‘अंतर्गत त्रुटींवर’ विजय मिळवण्याची क्षमता बाळगून आहे, आणि म्हणून एक सामान्य नागरिक या नात्याने आपणही आपल्या अर्थव्यवस्थेचा साकल्याने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था