शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आज एक-दोन नव्हे अशा शेकडो भगिरथप्रसादांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 03:40 IST

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. येत्या १९ नोव्हेंबरला त्याची सांगता होईल. इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षात कार्यक्रम घ्यावेत, सामाजिक उपक्रम राबवावेत असे विदर्भातील काँग्रेस नेत्यांना अजिबात वाटत नाही.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. येत्या १९ नोव्हेंबरला त्याची सांगता होईल. इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षात कार्यक्रम घ्यावेत, सामाजिक उपक्रम राबवावेत असे विदर्भातील काँग्रेस नेत्यांना अजिबात वाटत नाही.(पूर्व नागपुरातील दि. १९ नोव्हेंबर २०१६ चा एकमेव कार्यक्रम वगळता) नव्या पिढीला इंदिराजींच्या जीवन कार्याची ओळख व्हावी, यासाठीही हे नेते वर्षभर कुठे राबताना दिसले नाहीत. काँग्रेसच्या पुण्याईवर रंकाचा राव झालेल्या या नेत्यांचा कृतघ्नपणा सामान्य कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारा आहे. विदर्भातील काँग्रेस नेत्यांचे सध्या दोन वर्ग आहेत. एक वर्ग अंतर्गत लाथाळ्यात मग्न तर दुसरा भाजपाशी जुळवून घेण्यात. त्यातील पहिल्याला राहुल, सोनिया गांधींकडे सतत तक्रारीच कराव्याशा वाटतात. दुसºया वर्गातील नेते शिक्षणसंस्था, बँका, बळकावलेल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी गडकरी-फडणवीसांशी संधान साधून आहेत. गडकरींच्या षट्यब्दीपूर्ती समारंभात व्यासपीठावर खुर्ची नसल्याने त्यांना खाली मान घालून परत जावे लागते, तरीही त्यांचा स्वाभिमान दुखावत नाही, एवढे ते मजबूरही असतात.चंद्रपुरात तर आणखी मोठी गंमत आहे. तेथील नेते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कुणी करावे, यासाठी भांडतात. यवतमाळात पक्षाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दहा नेते आणि समोर फक्त पाच कार्यकर्ते उपस्थित असतात. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काँग्रेसची अशी गलितगात्र अवस्था आहे. खरे तर इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवून कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण करता आले असते. लोकांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचे ते परिणामकारक निमित्त होते. पण, तसे काहीच घडलेले नाही. त्याचवेळी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते मात्र दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी करीत आहेत. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी दीनदयालांचे नाव भाजपा आणि संघ परिवाराबाहेर फारसे कुणालाही माहीत नव्हते. पण, आता पद्धतशीरपणे ते जनसामान्यांच्या मनावर बिंबवले जात आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या भाषणात त्यांचा आवर्जून उल्लेख असतो आणि भाजपा कार्यकर्ते त्यांना नित्यनेमाने प्रचारी वंदनही करीत असतात. त्यात चुकीचे काहीच नाही आणि तो टीकेचा विषयही होऊ नये. कारण, दीनदयाल उपाध्याय हे भाजपाचे वैचारिक दैवत आहे. त्यामुळे आपल्या दैवताला अधिक लोकाभिमुख करणे हे भाजपाचे कामच आहे. पण, काँगेसला वंदनीय असलेल्या इंदिराजींच्या जन्मशताब्दीचे काय? अशी जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी काँग्रेस सत्तेवरच असणे आवश्यक असते का? सत्ता नसेल तर आपल्या महापुरुषांना उपेक्षित ठेवायचे का? विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्या मनाला हा प्रश्न कधीतरी विचारायलाच हवा.काँग्रेस आणि विदर्भ हा ऐतिहासिक स्रेहबंध आहे. १९५९ साली नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदी इंदिराजींची निवड झाली होती. याच अधिवेशनात इंदिराजींच्या पुढाकाराने सहकार शेतीचा ठराव मंजूर झाला होता. नागपुरात १८९१ आणि १९२० या वर्षीही काँग्रेसचे अधिवेशन झाले. १८९१ च्या अधिवेशनाने या पक्षाला गरिबांशी अधिक घट्टपणे जोडले. देशातील सामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न २७ रुपये आणि भारतातील इंग्रजांचे मात्र ५७० रुपये ही आर्थिक विषमता नष्ट करण्याचा विचार याच अधिवेशनात रुजला. आणीबाणीनंतरच्या अतिशय वाईट काळात विदर्भातीलच काँग्रेस कार्यकर्ते इंदिराजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यांच्या पुण्याईवरच दगड-धोंड्यांनाही कार्यकर्त्यांनी शेंदूर फासला व ते पुढे आमदार, खासदार, मंत्री झाले. तीच मंडळी आज पक्षाला कृतघ्न झाली आहेत. अशा गढूळ वातावरणात १८९१ च्या काँग्रेस अधिवेशनातील एक आठवण या संधिसाधूंच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरावी, अधिवेशन संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भोजनासाठी आणलेले बटाटे उरले होते. त्यावेळचे नागपूर शहर चिटणीस भगिरथ प्रसाद दुसºया दिवशी बाजारात गेले आणि त्यांनी हे बटाटे विकून त्यातून आलेले ८० रुपये काँग्रेस कमिटीत जमा केले. काही काँग्रेस नेत्यांचे वर्र्तमान बघता ती गोष्ट दंतकथा वाटावी. काँग्रेसला आज एक-दोन नव्हे अशा शेकडो भगिरथप्रसादांची गरज आहे. या दळभद्री नेत्यांना अडगळीत टाकून आता कार्यकर्त्यांनीच ‘भगिरथ’ व्हावे. इंदिराजींच्या जन्मशताब्दीचे तेच मोठे मोल असेल.- गजानन जानभोर

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधी